AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीमंती आणि गरीबीसोबत हाताच्या रेषा बदलतात की आयुष्यभर राहतात सेम?

ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, हाताच्या रेषा आयुष्यभर बदलत राहतात, पण हे अचानक होत नाहीत. आपल्या विचार आणि कृतीनुसार रेषेमध्ये बदल होतात. हातावर काही रेषा आणि खुणा अतिशय शुभ मानले जातात आणि सौभाग्याचे लक्षण असतात.

श्रीमंती आणि गरीबीसोबत हाताच्या रेषा बदलतात की आयुष्यभर राहतात सेम?
श्रीमंती आणि गरीबीसोबत हाताच्या रेषा बदलतात की आयुष्यभर राहतात सेम?
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Aug 25, 2021 | 4:05 PM
Share

नवी दिल्ली : भारतात गेल्या कित्येक वर्षांपासून हातावरच्या रेषा पाहून एखाद्याचे भविष्य सांगण्याची परंपरा आहे. हाताच्या रेषा पाहून असे सांगितले जाते की कोणाचे भविष्य किंवा त्याचे भावी आयुष्य कसे असेल. तसेच, या रेषा कधीकधी आयुष्यातील त्रासांबद्दल देखील सूचित करतात. बऱ्याचदा तुमच्यापैकी बरेच लोक असतील ज्यांना असे वाटते की जेव्हा ते गरीब होते तेव्हा रेषा वेगळ्या होत्या किंवा जर रेषा बदलल्या म्हणजे ते श्रीमंत झाले. तुमच्या हाताच्या रेषांचा श्रीमंती आणि गरिबीशी संबंध असतो, पण तुमची परिस्थितीसोबत त्या बदलत नाहीत. (Wealth and poverty change the lines of the hand or last a lifetime)

श्रीमंती किंवा गरीबीनुसार विचारांनी बदलतात रेषा

शतकानुशतके मनुष्य त्याच्या भविष्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहे. स्वत: ला संतुष्ट करण्यासाठी आणि भविष्यातील घटनांबद्दल जाणून घेण्यासाठी तो पंडितांकडून हाताच्या रेषांची चौकशी करतो. जगभरातील लाखो लोक हस्तरेषेवर विश्वास ठेवतात आणि त्यांच्या भविष्याबद्दल आणि त्यांच्या स्वभावाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत राहतात.

वाराणसीचे रहिवासी पंडित अवध राम पांडे यांनी कोरावर लिहिले आहे की हाताच्या रेषांमध्ये बदल होत असतात. तुमच्या हातावरील रेषा बदलतात तसेच त्याचा रंगही बदलतो. हस्तरेषा ज्योतिषांच्या मते शुक्ल पक्षात हाताच्या रेषा दिसू शकतात. ज्याप्रमाणे शुक्ल पक्षात चंद्राचा आकार वाढतो, त्याचप्रमाणे हातावरील रेषाही वाढतात. ज्याप्रमाणे कृष्ण पक्षात चंद्र लहान होऊ लागतो, त्याचप्रमाणे हातांच्या रेषाही लहान होऊ लागतात.

तळहाताचा रंगही बदलतो

ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, हाताच्या रेषा आयुष्यभर बदलत राहतात, पण हे अचानक होत नाहीत. आपल्या विचार आणि कृतीनुसार रेषेमध्ये बदल होतात. हातावर काही रेषा आणि खुणा अतिशय शुभ मानले जातात आणि सौभाग्याचे लक्षण असतात. तर, काही रेषा संघर्ष आणि जीवनातील अडचणी दर्शवतात. हस्तरेषेचा रंग एखाद्या व्यक्तीच्या कर्मांनुसार आणि त्याच्या मनाच्या इच्छेनुसार बदलत राहतो. कोणत्याही मनुष्याच्या जीवनात सकारात्मक विचार केल्याने त्याच्या शरीरात अनेक बदल होतात. विचारानुसार, शरीरात सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागते. या ऊर्जेमुळे, तुमच्या हातात आणि तुमच्या व्यक्तिमत्वात बदल होऊ लागतात.

हाताच्या रेषा पैसे दर्शवतात

हस्तरेषा शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीचे यश आणि अपयश हाताच्या रेषांमध्ये दडलेले असते. हाताच्या रेषा तयार होतात आणि बदलतात. एखादी व्यक्ती ज्या प्रकारची कृती आणि विचार स्वीकारते, त्याचप्रमाणे रेषा देखील बनतात आणि बदलतात. तुमच्या आयुष्यात कधी पैसे येतील किंवा नाही, हे हाताच्या रेषा बघूनही कळते. यासह, हाताच्या अंगठ्यामुळे पैशाच्या बाबतीतही एक विशेष चिन्ह मिळते. हस्तरेषा शास्त्रानुसार, जेव्हा हाताचा अंगठा जमिनीच्या दिशेने वाकलेला असतो आणि अंगठा आणि बोट यांच्यामध्ये अधिक मोकळी जागा असते, तेव्हा अशा व्यक्तीकडे पैसा थांबत नाही. (Wealth and poverty change the lines of the hand or last a lifetime)

इतर बातम्या

IB Recruitment 2021: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 527 पदांवर भरती, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर

Aurangabad Forecast : शहरात पावसाचे ‘लॉकडाऊन’ संपले, पुढील आठवडाही निरभ्र

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?