अहिराणी कविता, कथाकथन आणि मौखिक साहित्य, बोलीभाषेच्या जागरसाठी दिग्गजांची मांदियाळी

अहिराणी भाषेचे नामांकित साहित्यिक, ज्यांनी अहिराणी भाषेसाठी आपलं आयुष्य वाहून घेतले त्यांचं अप्रतिम असं साहित्य सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावं, हा यामागचा महत्त्वाचा उद्देश असल्याचं कवी रमेश धनगर यांनी 'टीव्ही 9 मराठी'शी बोलताना सांगितलं (Ahirani language Literature).

अहिराणी कविता, कथाकथन आणि मौखिक साहित्य, बोलीभाषेच्या जागरसाठी दिग्गजांची मांदियाळी
Follow us
| Updated on: May 24, 2020 | 12:35 PM

मुंबई : राज्यभरात लॉकडाऊनदरम्यान अहिराणी भाषिक नागरिकांचं मनोरंजन व्हावं (Ahirani language Literature), अहिराणीचा गोडवा निर्माण व्हावा आणि संस्कृतीचा प्रचार-प्रसार व्हावा या उद्देशाने फेसबुकवर ‘अहिराणी बोली’ नावाचं फेसबुक पेज सुरु करण्यात आलं आहे. जळगावच्या भडगाव तालुक्याचे साहित्यिक रमेश धनगर यांनी या फेसबुक पेजची निर्मिती केली. अनेक दिग्गज साहित्यिकांनी या उपक्रमात पुढाकार घेतला आहे (Ahirani language Literature).

या फेसबुक पेजला अहिराणी भाषेत ‘माननं पान’ म्हणजेच सन्मानाचं पान असंही संबोधलं जात आहे. या पेजवर दररोज एक ते दीड तास अहिराणी भाषिक प्रेक्षकांना कविता, कथाकथन आणि गाणी यांची मेजवानी चाखायला मिळत आहे.

विशेष म्हणजे दिग्गजांचं फेसबुक लाईव्ह सुरु असताना कुणी पेजवर आलं तर ती व्यक्ती जवळपास तासभर पेजवर खिळून राहते. अहिराणी भाषेत अवीट असा गोडवा आहे. याच मधाळ गोडपणामुळे दोन कोटी अहिराणी भाषिकांना एकत्र आणण्याचा हा रमेश धनगर यांचा प्रांजळ प्रयत्न आहे.

सन्मानाच्या मानलं जाणाऱ्या या फेसबुक पेजवर आतापर्यंत अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. यामध्ये मालेगावचे ज्येष्ठ साहित्यिक एस. के. बापू पाटील, डॉ. रमेश सुर्यवंशी, कमलाकर आबा देसले, सुनिल गायकवाड, अशोक शिंदे, कल्याणचे प्रशांत मोरे, नाशिकच्या सुनिता पाटील, मोहन पाटील, अहिराणी चित्रपट अभिनेते विजय पवार यांचा समावेश आहे.

अहिराणी भाषेचे नामांकित साहित्यिक, ज्यांनी अहिराणी भाषेसाठी आपलं आयुष्य वाहून घेतले त्यांचं अप्रतिम असं साहित्य सोशल मीडियाच्या माध्यमातून अहिराणी भाषिक लोकांपर्यंत पोहोचावं, हा यामागचा महत्त्वाचा उद्देश असल्याचं कवी रमेश धनगर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना सांगितलं (Ahirani language Literature).

“लॉकडाऊनदरम्यान लाखो नागरिक सोशल मीडियावर सक्रिय आहेत. सोशल मीडिया हे एक प्रभावी आणि सहजच उपलब्ध होणारं असं माध्यम आहे. या माध्यमामार्फत आपण हजारो खान्देशी आणि अहिराणी भाषिक लोकांपर्यंत बोलीभाषेचा गोडवा निर्माण करु शकतो, या विचारातून फेसबुकवर ‘अहिराणी बोली’ नावाचं पेज सुरु केलं”, असं रमेश धनगर यांनी सांगितलं.

“अहिराणी भाषेत जात्यावरची गाणी, लग्नाची गाणी, आखाजीची गाणी अशा अनेक स्वरुपातील अमाप असं मौखिक साहित्य आहे. या मौखिक साहित्याचं जतन आणि संवर्धन करुन नव्या साहित्याचा उदय करण्याचा ध्यास खान्देशातील अनेक ज्येष्ठ अहिराणी साहित्यिकांनी घेतला आहे. या साहित्यिकांना अहिराणी भाषिक जनतेनं डोक्यावर घेणं अपेक्षित आहे”, अशी प्रतिक्रिया खान्देश हीत संग्रामचे प्रवक्ते सुरेश पाटील यांनी दिली.

रमेश धनगर यांच्या या उपक्रमात ज्येष्ठ साहित्यिक बापूसाहेब हटकर, प्रा. सदाशिव सुर्यवंशी, खानदेश हीत संग्रामचे प्रवक्ते सुरेश पाटील, लेखिका लतिका चौधरी, कवी ज्ञानेश्वर भामरे, नाशिकचे अजय बिरारी, विना बागूल, अमळनेरचे तहसीलदार सुदाम महाजन, मालेगावचे ज्येष्ठ पत्रकार नाना महाजन असे शेकडो अहिराणी साहित्यिक जोडले गेले आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.