AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित शाह अनपढ… त्यांची ती लेव्हल नाही; शरद पवार यांचा जोरदार हल्लाबोल

अमित शाह यांनी शिर्डी येथील पक्षाच्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला केला होता. त्याला आज मकरसंक्रातीच्या पवित्र दिनी शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

अमित शाह अनपढ... त्यांची ती लेव्हल नाही; शरद पवार यांचा जोरदार हल्लाबोल
| Updated on: Jan 14, 2025 | 1:47 PM
Share

राजकारणात सध्या विरोध पक्षांना काही स्पेसच उरली नाही अशा महाविजय महायुतीला राज्यात मिळाला आहे. यामुळे विरोधी पक्षांना राजकारण करण्यासाठी वावच राहीलेला नाही. त्यामुळे केंद्रात एनडीएच्या सरकारला पाठींबा देऊन आपला पक्षा वाचविणे एवढेच काम आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या हाती राहीले आहे.त्यामुळे ते एनडीएत सहभागी होऊन भाजपाला पाठींबा देतील असे म्हटले जात असताना मकर संक्रातीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

शरद पवार यांनी मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर एक पत्रकार परिषद घेतली आहे या पत्रकार परिषदेत त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार म्हणाले की आम्ही काही अमित शाह यांना कमिटमेंट वगैरे दिलेली नाही. खरं सांगायचं म्हणजे या गृहस्थाशी माझी ओळख देखील नव्हती. एकदा अहमदाबादला गेलो होतो. तिथे नागरी सहकारी बँकांची बैठक होती. तिथे एका बँकेचे संचालक म्हणून त्यांची मला ओळख करून देण्यात आली. त्यापलिकडे माझी त्यांची काही स्पेशल ओळखही नव्हती असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

अमित शाह यांनी शिर्डी येथील अधिवेशनात विरोधी पक्षातील गद्दारांना धडा शिकविला असून पुन्हा अशी गद्दारी कोणी करणार नाही असे म्हटले आहे यावर प्रतिक्रीया देताना शरद पवार म्हणाले की शाह यांची टीका माझ्या काही जिव्हारी लागली नाही. जिव्हारी लागली अशी नोंद घेणारी ती व्यक्तीही नाही. त्यांची ती लेव्हल नाही. लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळी या लोकांची भूमिका वेगळी दिसत होती. निकाल काय लागला माहीत आहे? ना त्यांच्या पक्षाने विधानसभेत अधिक काळजी घेतली. ही गोष्ट मान्य केली. मी जाहीरही बोललो.

अनपढ लोकांना काही माहिती नसते

अमित शाह यांनी शेतकरी आत्महत्या प्रकरणात जोरदार टीका केली होती. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की त्यांना माहीत नाही. या देशात प्रोडक्शनचे रेकॉर्ड माझ्या काळातील आहे. मी कृषीमंत्रीपद सोडलं तेव्हा भारत हा जगातील सर्वात मोठा निर्यातदार होता. तांदूळ निर्यात करणारा भारत जगातील सर्वात मोठा देश होता. हार्टिकल्चरमध्येही भारत सर्वात मोठा देश होता. पण अनपढ लोकांना काही गोष्टी माहीत नसतात. त्यामुळे हे लोक बरळतात. तिकडे अधिक लक्ष देण्याची गरज नाही असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

Follow Us
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा