AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित शाह अनपढ… त्यांची ती लेव्हल नाही; शरद पवार यांचा जोरदार हल्लाबोल

अमित शाह यांनी शिर्डी येथील पक्षाच्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला केला होता. त्याला आज मकरसंक्रातीच्या पवित्र दिनी शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

अमित शाह अनपढ... त्यांची ती लेव्हल नाही; शरद पवार यांचा जोरदार हल्लाबोल
| Updated on: Jan 14, 2025 | 1:47 PM
Share

राजकारणात सध्या विरोध पक्षांना काही स्पेसच उरली नाही अशा महाविजय महायुतीला राज्यात मिळाला आहे. यामुळे विरोधी पक्षांना राजकारण करण्यासाठी वावच राहीलेला नाही. त्यामुळे केंद्रात एनडीएच्या सरकारला पाठींबा देऊन आपला पक्षा वाचविणे एवढेच काम आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या हाती राहीले आहे.त्यामुळे ते एनडीएत सहभागी होऊन भाजपाला पाठींबा देतील असे म्हटले जात असताना मकर संक्रातीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

शरद पवार यांनी मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर एक पत्रकार परिषद घेतली आहे या पत्रकार परिषदेत त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार म्हणाले की आम्ही काही अमित शाह यांना कमिटमेंट वगैरे दिलेली नाही. खरं सांगायचं म्हणजे या गृहस्थाशी माझी ओळख देखील नव्हती. एकदा अहमदाबादला गेलो होतो. तिथे नागरी सहकारी बँकांची बैठक होती. तिथे एका बँकेचे संचालक म्हणून त्यांची मला ओळख करून देण्यात आली. त्यापलिकडे माझी त्यांची काही स्पेशल ओळखही नव्हती असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

अमित शाह यांनी शिर्डी येथील अधिवेशनात विरोधी पक्षातील गद्दारांना धडा शिकविला असून पुन्हा अशी गद्दारी कोणी करणार नाही असे म्हटले आहे यावर प्रतिक्रीया देताना शरद पवार म्हणाले की शाह यांची टीका माझ्या काही जिव्हारी लागली नाही. जिव्हारी लागली अशी नोंद घेणारी ती व्यक्तीही नाही. त्यांची ती लेव्हल नाही. लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळी या लोकांची भूमिका वेगळी दिसत होती. निकाल काय लागला माहीत आहे? ना त्यांच्या पक्षाने विधानसभेत अधिक काळजी घेतली. ही गोष्ट मान्य केली. मी जाहीरही बोललो.

अनपढ लोकांना काही माहिती नसते

अमित शाह यांनी शेतकरी आत्महत्या प्रकरणात जोरदार टीका केली होती. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की त्यांना माहीत नाही. या देशात प्रोडक्शनचे रेकॉर्ड माझ्या काळातील आहे. मी कृषीमंत्रीपद सोडलं तेव्हा भारत हा जगातील सर्वात मोठा निर्यातदार होता. तांदूळ निर्यात करणारा भारत जगातील सर्वात मोठा देश होता. हार्टिकल्चरमध्येही भारत सर्वात मोठा देश होता. पण अनपढ लोकांना काही गोष्टी माहीत नसतात. त्यामुळे हे लोक बरळतात. तिकडे अधिक लक्ष देण्याची गरज नाही असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

Follow Us
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज? 'त्या' व्हिडीओचं सत्य काय?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?