अमित शाह
अमित शाह यांचा जन्म मुंबईत 22 ऑक्टोबर 1964 मध्ये झाला. वयाच्या 16 व्या वर्षापर्यंत गुजरातमधील मानसा या गावी त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. त्यानंतर त्यांचं कुटुंब अहमदाबादमध्ये स्थायिक झालं. 80च्या दशकातच अमित शाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सामील झाले. नंतर भाजपच्या युवा मोर्चात त्यांनी काम सुरू केलं. लालकृष्ण आडवाणी यांच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातील जबाबदारी अमित शाह यांच्याकडेच असायची. 1997 मध्ये अमित शाह हे भाजपच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष झाले. त्याच वर्षी गुजरातच्या सरखेज विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत अमित शाह उभे राहिले आणि विजयी झाले. इथून त्यांचा संसदीय राजकारणाचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर ते सातत्याने विधानसभेवर निवडून आले. 2010 पर्यंत ते गुजरातच्या विधानसभेत होते. त्यानंतर त्यांचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपदही त्यांच्याकडे आले. सध्या ते केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री आहेत. भाजपचे चाणक्य म्हणूनही त्यांची ओळख आहे.
West Bengal Election 2026 | Amit Shah | पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं; ममता बॅनर्जींची सत्ता…
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या कामगिरीबाबत मोठा दावा केला. पत्रकारांशी संवाद साधताना शाह यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यातील 152 जागांपैकी भाजप सुमारे 110 जागा जिंकत असल्याचा अंदाज पक्षाकडून व्यक्त केला जात आहे. तसेच, राज्यात सध्या सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या सरकारचा पराभव होऊन भाजप सत्तेत येईल, असा दावा त्यांनी केला.
- Harshada Gaikwad
- Updated on: Apr 24, 2026
- 2:53 pm
West Bengal Election 2026 : पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर 152 पैकी भाजप बंगालमध्ये किती जागा जिंकणार? अमित शाह यांचा मोठा दावा
West Bengal Election 2026 : पश्चिम बंगालमध्ये काल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान पार पडलं. रेकॉर्ड मतदान बंगालमध्ये झालय. त्यामुळे भाजपचे नेते उत्साहात आहेत. याआधी बंगालमध्ये कधी इतकं मतदान झालं नव्हतं. अमित शाह यांनी पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर किती जागा जिंकणार? त्या बद्दल मोठा दावा केलाय.
- Dinananth Parab
- Updated on: Apr 24, 2026
- 1:13 pm
Sanjay Raut : मोदींना अपमानित करण्यासाठीच शाहांनी विधेयक आणलं? संजय राऊत यांचा खळबळजनक सवाल
लोकसभेत महिला आरक्षण विधेयक (नारी शक्ती वंदन विधेयक) नामंजूर झाल्याने केंद्राला धक्का बसला आहे. यावरून संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. राऊतांच्या मते, महिलांना आरक्षण देण्याचा सरकारचा मूळ हेतू नव्हता, तर सत्तेसाठी जागा वाढवण्याचे हे 'ढोंग' आणि 'षडयंत्र' होते. त्यांनी भाजपचा मुखवटा फाडत हे महिलांच्या नावावरचे 'शोषण' असल्याचे म्हटले.
- manasi mande
- Updated on: Apr 18, 2026
- 12:33 pm
Rahul Gandhi: महिला आरक्षण विधेयक तर लोकसभेत आपटलं, पण हे ’16 नंबर’ चं काय आहे कोडं? राहुल गांधी भाजपची डोकेदुखी वाढवणार?
Rahul Gandhi Magical 16 Number Puzzle: काल लोकसभेत अपेक्षेप्रमाणे नारी शक्ती वंदन अधिनियम पडले. केंद्र सरकारलाही गणित माहिती होते. पण यामागे भाजपची काय खेळी होती हे लवकरच समोर येईल. तर त्याचवेळी लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाषणातून चिमटे काढता काढता 16 क्रमांकाचे कोडं टाकून एक खेळी खेळली आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Apr 18, 2026
- 10:08 am
उत्तर-दक्षिण वादामुळे देश विभागू देणार नाही, अमित शहांनी संभ्रम पसरवणाऱ्या विरोधकांना सुनावलं
Amit Shah : अमित शाह यांनी म्हटले की, विरोधक महिला आरक्षण विधेयकाबाबत विरोधक भ्रम निर्माण करत आहेत. उत्तर-दक्षिण असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, मात्र आम्ही देशाचे विभाजन होऊ देणार नाही.
- बापू गायकवाड
- Updated on: Apr 17, 2026
- 9:32 pm
Delimitation: दक्षिणेतील राज्यांवर अन्याय? देशाची सूत्रं उत्तर भारताकडे? लोकसभेत अमित शाहांचे उत्तर काय?
Lok Sabha Seats in South State After Delimitation: आज देशासाठी ऐतिहासिक दिवस आहे. महिला आरक्षण बिलासह लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ पूनर्रचना विधेयकावर आज मतदान होत आहे. पण दक्षिणेतील राज्यांवर खरंच उत्तर भारतातील राज्य भारी ठरणार आहे का?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Apr 17, 2026
- 9:25 am
महिलांसाठी आनंदाची बातमी! दरमहा 3000 रुपये मिळणार, अमित शहांची मोठी घोषणा
BJP Manifesto : भारतीय जनता पार्टीने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर आणि आरोग्य सुविधांवर भर देण्यात आला आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Apr 10, 2026
- 6:53 pm
Naxalist : 2 जिल्हे, 1 टॉप कमांडर उरला, देशातून नक्षली चळवळीचा असा झाला खात्मा, 13 वर्षात कमाल, 180 जिल्ह्यातून नक्षलवाद हद्दपार, इनसाईड स्टोरी वाचली का?
Naxalite Movement Inside Story: नक्षलवादी चळवळ भारतात इतिहास जमा झाली आहे. आदिवासींचे हक्क संरक्षणापासून ते त्यांचेच दमन आणि शोषण करत भारताच्या अखंडतेला नख लावण्याचा प्रयत्न या 13 वर्षांत हाणून पाडण्यात आला. 2013 मध्ये 182 नक्षलग्रस्त जिल्हे होते, आज त्यांची संख्या छत्तीसगडमधील विजापूर आणि सुकमा जिल्ह्यापर्यंत मर्यादीत झाली आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Apr 1, 2026
- 10:10 am
Devendra Fadnavis : ते तर जनतेलाही माहीत, आसामसह पाच राज्यांच्या निवडणूक काँग्रेस जिंकणार? मुख्यमंत्र्यांचा मोठा बॉम्बगोळा, काय काढला चिमटा?
Devendra Fadnavis on Congress: तामिळनाडू, केरळ, पुदुच्चेरी, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेस खातं उघडणार का? आसाम दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा काढला चिमटा? काँग्रेस प्रत्युत्तर देणार?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Mar 31, 2026
- 11:58 am
Amit Shah | मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही – अमित शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आसाममधील एका कार्यक्रमात बोलताना 1962 च्या चीन-भारत युद्धाचा संदर्भ देत माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली. 9 एप्रिल 1962 रोजी नेहरूंनी आसामला “टाटा बाय-बाय” म्हटल्याचा उल्लेख करत शाह म्हणाले की, “जवाहरजी, ही तुमची वैयक्तिक भूमी नव्हती, तर भारतमातेचा अविभाज्य भाग असलेले आसाम आहे.”
- Harshada Gaikwad
- Updated on: Mar 29, 2026
- 5:25 pm
Sanjay Raut | संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. राऊत म्हणाले की, “2026 वर्ष संपण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या पदावर नसतील, असे सर्वत्र बोलले जात आहे.” तसेच, अमित शाह यांच्या भवितव्याबाबतही अनिश्चितता असल्याचे त्यांनी सूचित केले.
- Harshada Gaikwad
- Updated on: Mar 23, 2026
- 9:07 pm
US – Iran – Isarel War | लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार? तीन समितीचा वॉच
इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचा परिणाम भारतातही जाणवत आहे. महाराष्ट्रात गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिक आणि व्यवसायिकांना त्रास होत आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेत आज दुपारी साडेचार वाजता गॅस तुटवड्याच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी या संदर्भात विधानसभेत साडेचार वाजता भाष्य करतील, तर पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतील.
- Harshada Gaikwad
- Updated on: Mar 12, 2026
- 3:22 pm