अमित शाह
अमित शाह यांचा जन्म मुंबईत 22 ऑक्टोबर 1964 मध्ये झाला. वयाच्या 16 व्या वर्षापर्यंत गुजरातमधील मानसा या गावी त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. त्यानंतर त्यांचं कुटुंब अहमदाबादमध्ये स्थायिक झालं. 80च्या दशकातच अमित शाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सामील झाले. नंतर भाजपच्या युवा मोर्चात त्यांनी काम सुरू केलं. लालकृष्ण आडवाणी यांच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातील जबाबदारी अमित शाह यांच्याकडेच असायची. 1997 मध्ये अमित शाह हे भाजपच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष झाले. त्याच वर्षी गुजरातच्या सरखेज विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत अमित शाह उभे राहिले आणि विजयी झाले. इथून त्यांचा संसदीय राजकारणाचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर ते सातत्याने विधानसभेवर निवडून आले. 2010 पर्यंत ते गुजरातच्या विधानसभेत होते. त्यानंतर त्यांचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपदही त्यांच्याकडे आले. सध्या ते केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री आहेत. भाजपचे चाणक्य म्हणूनही त्यांची ओळख आहे.
Read More17 सप्टेंबरला देशात मोठा राजकीय भूकंप? काय होणार? अखेर संजय राऊत काय म्हणाले?
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी १७ सप्टेंबरला मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली आहे. मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशीच भाजपमध्ये अंतर्गत बंडाळी उफाळली असून, चार मंत्र्यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिल्याने मंत्रिमंडळ विस्तार थांबला आहे. संघाने उपपंतप्रधानपदाची मागणी केल्याने मोदींच्या पतनाची सुरुवात झाली असून, त्यांचे वर्चस्व संपुष्टात येत असल्याचा दावा राऊत यांनी केला.
- भीमराव गवळी
- Updated on: Sep 4, 2026
- 3:17 pm
नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक काय? संजय राऊत यांच्या विधानाने खळबळ
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे की, अमित शाह यांना दिल्लीच्या राजकारणात आणणे ही नरेंद्र मोदींची सर्वात मोठी चूक होती. शाह यांच्या आगमनानंतर भाजप आणि देशाचे अधःपतन सुरू झाले. पहिल्या पाच वर्षांत यंत्रणांचा गैरवापर नव्हता, पण शाह यांच्यामुळे पक्ष फोडणे आणि यंत्रणांचा वापर सुरू झाला, असे राऊत यांनी म्हटले.
- भीमराव गवळी
- Updated on: Sep 4, 2026
- 1:58 pm
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी, पहा खास क्षणाचा व्हिडीओ
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आहेत, ते एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी मुंबईत आल्याचं वृत्त आहे. या विशेष प्रसंगी, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अमित शाह यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा केला. हा क्षण राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला, कारण या घटनेने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील सलोखा आणि जिव्हाळ्याचे संबंध अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.
- प्रिती वेद
- Updated on: Aug 29, 2026
- 5:59 pm
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल, मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्वागत
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते. शाह विमानातून उतरताच त्यांना तिन्ही प्रमुख नेत्यांनी भेटून सत्कार केला.
- प्रिती वेद
- Updated on: Aug 29, 2026
- 5:06 pm
एअरपोर्टवर अमित शाह अन् एकनाथ शिंदेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये एकांतात दहा मिनिटं चर्चा, शिंदेंना मिळालं मोठं आश्वासन
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, आज अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी एअरपोर्टवर एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यामध्ये जवळपास दहा मिनिटं चर्चा झाली आहे. यावेळी अमित शाह यांनी शिंदेंना मोठं आश्वासन दिलं आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Aug 29, 2026
- 3:54 pm
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. ते एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबईत आले आहेत. वीर भवनमध्ये दुपारी १ वाजता कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर शाह दुपारी अडीच वाजता दिल्लीकडे रवाना होतील. त्यांचा हा दौरा पूर्णपणे कौटुंबिक कार्यक्रमापुरता मर्यादित आहे.
- प्रिती वेद
- Updated on: Aug 29, 2026
- 11:31 am
अमित शाह यांनी मराठीची मोहीम केराच्या टोपलीत टाकली; संजय राऊत यांचा घणाघात
संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधत म्हटले की, अमित शाहांनी मराठी भाषा शिकवण्याची मोहीम अक्षरशः केराच्या टोपलीत टाकली. दिल्लीच्या दबावाखाली शिंदे गट काम करत असून, शाहांनी घेतलेल्या या निर्णयावर त्यांनी चकार शब्दही काढला नाही, यावरून त्यांचा पक्ष अमित शाहच चालवतात हे उघड झाले आहे. ही मराठी माणसाची शोकांतिका आहे, असे राऊत म्हणाले.
- भीमराव गवळी
- Updated on: Aug 28, 2026
- 10:34 am
मोठी बातमी ! देशाचं नेतृत्व बदलणार? संघात चर्चा; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
खासदार संजय राऊत यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राऊतांच्या दाव्यानुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघात देशाच्या नेतृत्त्व बदलावर गंभीर चर्चा सुरू आहे. पंतप्रधान मोदींना 'लादले' जात असून, अमित शाह पंतप्रधान होऊ शकत नाहीत. शिवाय, शाहंसोबत काम करण्यास कुणीही तयार नसल्याचा दावाही त्यांनी केला.
- भीमराव गवळी
- Updated on: Aug 26, 2026
- 10:42 am
गुजरातच्या घोटाळेबाज बँकेकडे राज्यातील नागरी बँकांचं नेतृत्त्व, संजय राऊत यांचा गंभीर आरोप
संजय राऊत यांनी गुजरातच्या घोटाळेबाज माधोपुरा बँकेला राष्ट्रीय नागरी सहकारी वित्तीय विकास महामंडळात विलीन करून महाराष्ट्रातील नागरी बँकांचे नेतृत्व दिल्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामागे माधोपुरा बँकेचे घोटाळे लपवण्याचा आणि राज्यातील सहकार चळवळ संपवण्याचा घाट असल्याचा दावा राऊतांनी केला.
- भीमराव गवळी
- Updated on: Aug 21, 2026
- 12:31 pm
महाराष्ट्रातील सहकारी बँकांचं अस्तित्त्वच… बड्या नेत्याचा थेट अमित शहांवर हल्लाबोल, गुजरातमधील…
संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकांचे अस्तित्व नष्ट केल्याचा गंभीर आरोप केला आहे. शहांनी स्थापन केलेल्या नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीमुळे राज्यातील बँकिंग क्षेत्राला मोठा फटका बसेल, असा दावा राऊत यांनी केला. हा सहकार चळवळ मोडून काढण्याचा कट असून, यामागे मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
- प्रिती वेद
- Updated on: Aug 21, 2026
- 10:59 am
धनुष्यबाण चोरणाऱ्या शिंदे, शाह, आयोगावर मकोका लावा; संजय राऊत यांची मोठी मागणी
संजय राऊत यांनी "धनुष्यबाण" चिन्हाच्या चोरीचा गंभीर आरोप करत शिंदे गट, अमित शाह आणि निवडणूक आयोगाच्या आयुक्तांवर मकोका लावण्याची मागणी केली आहे. ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर राऊतांनी ही मोठी मागणी केली. 'धनुष्यबाण' आमचा मुद्देमाल असून, तो चोरल्याचा दावा करत त्यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
- भीमराव गवळी
- Updated on: Aug 21, 2026
- 10:43 am
काँग्रेस पुन्हा तुष्टीकरण करतंय, अमित शाह यांचा हल्लाबोल; वंदे मातरमचा वाद पेटला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसच्या वंदे मातरमच्या दोन कडव्यांच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. काँग्रेस पुन्हा तुष्टीकरणाचे राजकारण करत असून हा देशविरोधी निर्णय आहे असे शाह म्हणाले. १९३७ मधील ऐतिहासिक चुकीची पुनरावृत्ती होत असून यामुळे देशाला मोठे नुकसान झाले आहे. भाजप या निर्णयाचा निषेध करत असून जनतेत जाऊन आवाज उठवेल.
- भीमराव गवळी
- Updated on: Aug 20, 2026
- 12:46 pm