अमित शाह
अमित शाह यांचा जन्म मुंबईत 22 ऑक्टोबर 1964 मध्ये झाला. वयाच्या 16 व्या वर्षापर्यंत गुजरातमधील मानसा या गावी त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. त्यानंतर त्यांचं कुटुंब अहमदाबादमध्ये स्थायिक झालं. 80च्या दशकातच अमित शाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सामील झाले. नंतर भाजपच्या युवा मोर्चात त्यांनी काम सुरू केलं. लालकृष्ण आडवाणी यांच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातील जबाबदारी अमित शाह यांच्याकडेच असायची. 1997 मध्ये अमित शाह हे भाजपच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष झाले. त्याच वर्षी गुजरातच्या सरखेज विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत अमित शाह उभे राहिले आणि विजयी झाले. इथून त्यांचा संसदीय राजकारणाचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर ते सातत्याने विधानसभेवर निवडून आले. 2010 पर्यंत ते गुजरातच्या विधानसभेत होते. त्यानंतर त्यांचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपदही त्यांच्याकडे आले. सध्या ते केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री आहेत. भाजपचे चाणक्य म्हणूनही त्यांची ओळख आहे.
अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर 4 पोलिसांची हत्या… माओवादांना किती रुपयांचं बक्षीस? NIA च्या खुलाशाने मोठी खळबळ
Maoists Killed Four Police: झारखंडमध्ये 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दौऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्यानंतर चार पोलिसांची हत्या करण्यात आली. माओवाद्यांनी ही क्रूरकृत्य करणाऱ्या नक्षलवाद्यांना इतके बक्षीस दिले होते. NIA च्या तपासात ही बाब समोर आली आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jun 2, 2026
- 10:01 am
पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट… फडणवीसांनी काय केली मोठी मागणी? शेतकर्यांना काय होणार फायदा?
Devendra Fadnavis Meets PM Modi: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्लीत तळ ठोकून आहेत. काल त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. तर आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती त्यांनी ट्वीट करून दिली.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: May 28, 2026
- 1:17 pm
tv9 Marathi Special Report | कांद्यावर दिल्ली दरबारात मोठा फैसला! अमित शाहांचा 10 लाख टन खरेदीला ग्रीन सिग्नल?
कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जवळपास पाऊण तास चाललेल्या बैठकीत केंद्र सरकारकडून सकारात्मक भूमिका घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: May 28, 2026
- 10:02 am
कांद्यासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; अर्ध मंत्रिमंडळ दिल्लीत, केंद्र सरकारचा दिलासा काय?
Relief on Onion And Sugarcane Crisis: कांदा उत्पादक आणि ऊस उत्पादक शेतकरी नाराज आहेत. काल परवा नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रात शेतकर्यांनी मोठे आंदोलन केले. काल झालेल्या बैठकीनंतर केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: May 28, 2026
- 8:35 am
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला उधाण, म्हणाले भविष्यात…
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची गुप्त भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या भेटीमागचे कारण काय आणि दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर आज प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी या भेटीला दुजोरा दिला. इतकेच नाही तर या बाबत एक मोठं विधान केलं.
- प्रिती वेद
- Updated on: May 26, 2026
- 5:29 pm
Eknath Shinde | एकनाथ शिंदे नाराज? दिल्लीत शिंदे-शाहांची गुप्त भेट…. भेटीमागचं कारण काय?
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपावरून तणाव वाढताना दिसत आहे. जळगावसह ठाणे, छत्रपती संभाजीनगर आणि इतर काही ठिकाणी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. या सर्व घडामोडींमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्ली दौरा करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची गुप्त भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: May 26, 2026
- 9:47 am
बिरसा मुंडा यांच्या ‘उलगुलान’नंतरचा हा सर्वात मोठा आदिवासी मेळावा, लाल किल्ल्यावरून अमित शहांचे विधान
अमित शाह यांनी दिल्लीतील लाल किल्ला मैदानावर आयोजित भव्य जनजातीय सांस्कृतिक समागमात सुमारे 1.5 लाख आदिवासी बांधवांना संबोधित केले. यावेळी त्यांनी बिसरा मुंडा यांच्या कार्याचा गौरव केला.
- बापू गायकवाड
- Updated on: May 24, 2026
- 10:54 pm
Sanjay Raut : भ्रष्टाचाऱ्यांना सत्ता देण्याची परंपरा भाजपने कायम राखली.. सुवेंदू अधिकारींच्या मुख्यमंत्रीपदावरून राऊतांचा सणसणीत टोला
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत सत्ता स्थापन केली आहे. सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, मात्र यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. राऊत यांनी सुवेंदू अधिकारी यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा संदर्भ देत, भाजप भ्रष्टाचाऱ्यांना सत्ता देत असल्याची टीका केली.
- manasi mande
- Updated on: May 9, 2026
- 10:50 am
Maharashtra News LIVE :वारकरी संप्रदायाबाबत व्यक्तव्य करणं चुकीचं – आमदार महेश लांडगे
Maharashtra News LIVE : सुवेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित असतील. तर नाशिकमधील टीसीएस कंपनीतील केसमधील निदा खानला अटक करण्यात आली असून तिला नाशिकमध्ये आणण्यात आलं आहे, तिची कसून चौकशी सुरू असून महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. यासह देश-विदेश,मनोरंजन, क्रीडा, राजकारण क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचता येतील. दिवसभर फॉलो करा हा ब्लॉग.
- manasi mande
- Updated on: May 18, 2026
- 11:11 pm
Explain West Bengal: चुप्पेचाप फुले छाप! भाजपने असा केला बंगालचा गड सर, अशा घातल्या 200 जागा खिशात
West Bengal Historic Victory of BJP: पाय रोवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपने अखेर पश्चिम बंगालचे मैदाना मारलेच. पण हा प्रवास काही एका दिवसाचा अथवा पाच वर्षांचा नक्कीच नव्हता. गेल्या 28 वर्षांपासून त्यासाठी कसून प्रयत्न सुरू होते. यंदा 'चुप्पेचाप फुले छाप' या एका नाऱ्याने कमाल केली.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: May 6, 2026
- 9:42 am
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपने मोठी मुसंडी मारल्याचं दिसून येतंय. सुरुवातीच्या कलांपासूनच भाजपच्या विजयाचे चिन्ह दिसत होते. आता बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
- प्रिती वेद
- Updated on: May 5, 2026
- 4:16 pm
West Bengal | मोठी बातमी! पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? 9 मे रोजी नवीन सरकारचा शपथविधी
पश्चिम बंगालमध्ये भाजपाने मोठा विजय मिळवला आहे. मात्र, मुख्यमंत्री पदासाठी पक्षाने अजूनही कोणता चेहरा घोषित केलेला नाही. पंतप्रधान मोदी यांनी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे आभार मानत त्यांचे अभिनंदन केले आहे. आता लवकरच बंगालचे मुख्यमंत्री कोण हे ठरवलं जाणार आहे.
- प्रिती वेद
- Updated on: May 5, 2026
- 1:13 pm