AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 14 | ‘कर्णधार’पदासाठी जबरदस्त खेळी, राहुल वैद्य-रुबिना दिलैकमध्ये चुरशीचा सामना!

'बिग बॉस'च्या घरात ‘कर्णधारपदा’साठीचा टास्क सर्वात महत्त्वाचा असतो. यामुळे स्पर्धकाला नॉमिनेशनमधून सुरक्षित होण्याची संधी देखील मिळते.

Bigg Boss 14 | ‘कर्णधार’पदासाठी जबरदस्त खेळी, राहुल वैद्य-रुबिना दिलैकमध्ये चुरशीचा सामना!
| Updated on: Dec 07, 2020 | 5:27 PM
Share

मुंबई : ‘बिग बॉस’च्या घरात ‘कर्णधारपदा’साठीचा टास्क सर्वात महत्त्वाचा असतो. यामुळे स्पर्धकाला नॉमिनेशनमधून सुरक्षित होण्याची संधी देखील मिळते. गेल्या आठवड्यात अली गोनी ‘बिग बॉस 14’च्या घराचा कर्णधार होता. या आठवड्यात त्याच्या कर्णधारपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. आता बिग बॉसने कर्णधारपदासाठी एक नवीन टास्क दिला आहे. या टास्कमध्ये रुबिना दिलैक (Rubina Dilaik) आणि राहुल वैद्य (Rahul Vaidya) यांच्या दरम्यान चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे (Bigg Boss 14 new week captaincy task between Rahul Vaidya and Rubina Dilaik).

या दरम्यान राहुल आणि रुबिनामध्ये देखील वाद पाहायला मिळाला. राहुल वैद्य अभिनव शुक्लाला टास्क दरम्यान रुबिनाचा चमचा म्हणून संबोधतो. यानंतर अभिनव आणि राहुल यांच्यात वाद सुरू झाले. यामुळे रुबिना राहुलवर भडकणार आहे.

नवा ‘कॅप्टन’सी टास्क

नवा कर्णधार निवडण्यासाठी बिग बॉसने दिलेल्या टास्कचे नाव होते ‘एक था राजा एक थी रानी’. या टास्कमध्ये रुबिना आणि राहुल एकमेकांचे प्रतिस्पर्धी असणार आहेत. बाकी घरातील उर्वरित सदस्य या राजा आणि राणीचे सेवक असणार आहेत. या सेवकांना दोघांसाठी काम करावे लागणार आहे. त्याबदल्यात त्यांना पैसे मिळणार आहेत. रुबिना आणि राहुल यांच्या सेवकांना त्यांच्यासाठी दिलेल्या कागदातून बदामाचे आकार कापायचे होते. यासाठी रुबिनाला लाल तर राहुलला काळा रंग देण्यात आला होता. स्पर्धकांना हा टास्क करताना प्रतिस्पर्धी टीमला रोखायचे आहे. ज्या टीमकडे जास्त बदाम आणि पैसे जमा होणार ती टीम जिंकणार आहे (Bigg Boss 14 new week captaincy task between Rahul Vaidya and Rubina Dilaik).

कविता-एजाजची दुष्मनी

एजाज खान (Eijaz Khan) आणि कविता कौशिक (Kavita Kaushik) यांच्यातील मैत्री आता दुष्मनीत बदलली आहे. घरात कविता कौशिक आणि एजाज खान यांच्यात जोरदार वाद पाहायला मिळाला आहे. कविता आणि एजाज खान यांच्यात किचनमध्ये सुरू झालेल्या वादाला हिंसक वळण मिळाले. एजाज कविताच्या जवळ जाऊन भांडू लागताच कविताने एजाजला सरळ ढकलेले आहे. त्यानंतर एजाजने कविताला घराबाहेर काढण्याची मागणी केली होती. मात्र, एजाजची ही मागणी ‘बिग बॉस’ ने फेटाळली. कविताला केवळ समज देण्यात आली.

एक वाद शमतो तोच कविताने पुन्हा एकदा नव्या वादाची नांदी सुरू केली. स्वयंपाकघरातील काउंटर स्वच्छ नसल्यामुळे कविता कौशिकने जास्मीनला बोल लगावले. यावरून सकाळी सकाळी जास्मीन आणि कविता यांच्यात भांडण सुरू झाले. कविता जास्मीनशी भांडताना पाहून अली तिच्या समर्थनार्थ पुढे आला. पुन्हा एकदा घरात जोरदार घमासान सुरू झाले.

(Bigg Boss 14 new week captaincy task between Rahul Vaidya and Rubina Dilaik)

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.