AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बिहारमध्ये NDA पुन्हा सत्तेत आल्यास सुशांत मृत्यूप्रकरणातील कारस्थानाचा पर्दाफाश करु’

बिहारमध्ये NDA सत्तेत आल्यानंतर आणखी कुठल्या तपासाची आवश्यकता असेल तर तेही केलं जाईल. | Sushant singh Rajput

'बिहारमध्ये NDA पुन्हा सत्तेत आल्यास सुशांत मृत्यूप्रकरणातील कारस्थानाचा पर्दाफाश करु'
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Nov 07, 2020 | 4:04 PM
Share

पाटणा: बिहारमध्ये पुन्हा एकदा NDAची सत्ता आल्यास आम्ही अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणामागील खऱ्या कारस्थानाचा पर्दाफाश करु, असा दावा भाजप आमदार नीरजकुमार उर्फ बबलु सिंह यांनी केला आहे. नीरजकुमार हे सुशांत सिंह याचे चुलतभाऊ आहेत. बिहारमध्ये सध्या चांगले वातावरण आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA)सरकार पुन्हा बहुमताने सत्तेत येईल. याठिकाणी डबल इंजिनचे सरकार चालते. लोक खुष आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत NDAचा पराभव होणार नाही, असा दावा यावेळी नीरजकुमार यांनी केला. (If NDA come into power again we will solve Sushant singh Rajput case)

नितीशजी 15 वर्षे मुख्यमंत्री आहेत. आणखी पाच वर्षे राहतील. त्यानंतर त्याचे वय 75 वर्षे होईल. मग कुणाला राजकारणात रस असतो. त्यानंतर ते शांतपणे देशसेवा-समाजसेवा करतील. त्यामुळे नितीश कुमार यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगितले. या निवडणुकीत NDA पूर्ण बहुमताने सत्तेत येईल. आम्हाला जवळपास 70 टक्के मते मिळतील, असे नीरजकुमार यांनी सांगितले.

याठिकाणी परिवर्तन करण्याची गरज नाही. लोकांना पुन्हा जंगलराज नको आहे. त्या राजवटीला लोक वैतागले होते. मतदार सतर्क आहेत. जी गर्दी त्यांच्याकडे जमा झाली ती आणली गेली होती, ती केवळ हेलिकॉप्टर बघण्यासाठी व्हायची, अशा शब्दांत नीरजकुमार यांनी तेजस्वी यादव यांची खिल्ली उडविली.

सुशांत बिहारचा मुलगा होता. आमचा कुटुंब सदस्य होता. तो बिहारचा नावारुपाला येणारा कलाकार होता. त्यामुळे त्याच्या मृत्यूमुळे बिहारच्या लोकांमध्ये आक्रोश होता. पण आम्ही हा राजकीय मुद्दा बनवला नाही. आम्ही NDA सोबत आहोत. आणि सुशांतच्या मृत्यू नंतर NDA ला जे करायचे होते ते आम्ही केलं आहे. पुढे जे सरकार अस्तित्वात येईल तेही सुशांतच्या नावावर इथे काही ना काही करेल. सध्या CBI प्रकरणाचा तपास करीत आहे. शेवटी सत्य समोर येईलच, हा विश्वास आम्हाला आहे.

सध्या CBI या प्रकरणाचा तपास करत आहे. आता ED सुद्धा या तपासात सहभागी झाली आहे. एकूणच वेगवेगळ्या पैलुंनी या प्रकरणाचा तपास सुरु आहे. काही संपलेलं नाही. योग्यवेळी सत्य परिस्थिती लोकांसमोर येईल. बिहारमध्ये NDA सत्तेत आल्यानंतर आणखी कुठल्या तपासाची आवश्यकता असेल तर तेही केलं जाईल. या मागे कोणते कारस्थान आहे त्याचा पर्दाफाश होईलच, असा दावा नीरजकुमार यांनी केला.

संबंधित बातम्या:

Bihar Assembly Election 2020 Live : तिसऱ्या टप्प्यात 78 जागांवर दुपारी दोन वाजेपर्यंत 39.31 टक्के मतदान

बिहार निवडणुकीचा सुशांतसिंह प्रकरणाशी घेणं-देणं नाही – देवेंद्र फडणवीस

(If NDA come into power again we will solve Sushant singh Rajput case)

Follow Us
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Aaditya Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप