सातारा : “कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. यामुळे सर्व ठिकाणी एकदम शिथीलता देणे योग्य राहणार नाही. टप्प्याटप्प्याने शिथीलता देणे गरजेचे आहे,” असे मत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. 10 ते 2 दरम्यान शिथिलता दिली, मग तेव्हा कोरोना होत नाही का? असा प्रश्नही उदयनराजे भोसलेंनी उपस्थित केला. (Udayanraje Bhosale On Corona and Lockdown)
उदयनराजे यांनी आज सातारा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कोरोना काळातील उपाययोजना आणि लॉकडाऊन शिथील करण्याबाबत चर्चा केली.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
“कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नव्हे. सर्वच ठिकाणी एकदम शिथीलता देणे योग्य राहणार नाही. टप्प्याटप्प्याने शिथीलता देणे गरजेचे आहे. तसेच 10 ते 2 या वेळेत शिथीलता दिली म्हणजे या वेळेत कोरोना नसतो का?” असा मिश्किल टिप्पणीही उदयनराजे यांनी केली.
“शंभर वर्षातून एकदा अशा पद्धतीने कोरोनासारखी परिस्थिती उद्भवते. या परिस्थितीला सामोरे जाण्याकरिता ही एक शिकवण आहे. लॉकडाऊनमुळे लोकांना रोजगार नाहीत. त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे लवकरात लवकर यावर लस निघावी अशी ईश्वराला त्यांनी प्रार्थना केली,” असे उदयनराजे म्हणाले. (Udayanraje Bhosale On Corona and Lockdown)
उदयनराजेंच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागण्या
संबंधित बातम्या :
युद्ध असो वा नैसर्गिक आपत्ती निवडणुका घेतल्याच पाहिजे, न्यायालयाने आदेश काढावा : प्रकाश आंबेडकर
राज्यात आतापर्यंत 8232 पोलिसांना कोरोना, 93 पोलिसांचा मृत्यू