AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Babri Verdict | 28 वर्षांच्या बाबरी खटला निकालानंतर निवृत्त, न्यायमूर्ती सुरेंद्र कुमार यादव यांची कारकीर्द

बाबरी विद्ध्वंस प्रकरणाचा (Babri Demolition Case) निकाल देणारे सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे (CBI Special Court) न्यायमूर्ती सुरेंद्र कुमार यादव (Surendra Kumar Yadav) आज निवृत्त होत आहेत.

Babri Verdict | 28 वर्षांच्या बाबरी खटला निकालानंतर निवृत्त, न्यायमूर्ती सुरेंद्र कुमार यादव यांची कारकीर्द
| Updated on: Sep 30, 2020 | 1:20 PM
Share

लखनौ : बाबरी विद्ध्वंस प्रकरणाचा (Babri Demolition Case) निकाल देणारे सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे (CBI Special Court) न्यायमूर्ती सुरेंद्र कुमार यादव (Surendra Kumar Yadav) आज निवृत्त होत आहेत. त्यांनी आपली निवृत्तीच्या आधी या ऐतिहासिक प्रकरणावर निकाल सुनावला (CBI special court judge Surendra Kumar Yadav retired after Babri verdict). या प्रकरणी न्यायमूर्ती एस. के. यादव यांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे.

सुरेंद्र कुमार यादव मागील वर्षी 30 सप्टेंबरलाच निवृत्त होणार होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने 19 जुलै रोजी त्यांच्या कार्यकाळात वाढ केली. त्यानुसार बाबरी मशीद विद्ध्वंस प्रकरणाचा निकाल सुनावणीपर्यंत हा कार्यकाळ वाढवण्यात आला. उत्तर प्रदेश सरकारने देखील अधिसुचना काढत न्यायमूर्ती यादव यांचा कार्यकाळ वाढवला होता.

न्यायमूर्ती एस. के. यादव मुळचे जौनपूरचे रहिवासी

सुरेंद्र कुमार यादव पूर्व उत्तर प्रदेशमधील जौनपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या वडिलांचं नाव रामकृष्ण यादव आहे. सुरेंद्र कुमार यादव 31 वर्षांचे असतानाच राज्य न्याय सेवेत निवडले गेले. त्यांनी सर्वात प्रथम फैजाबादमध्ये अॅडिशनल मुंसिफ पदावर कामाला सुरुवात केली. त्यांचा हा प्रवास पुढे गाजीपूर, हरदोई, सुल्तानपूर, इटावा, गोरखपूरमार्गे उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ जिल्ह्याच्या न्यायमूर्तींपर्यंत पोहचला.

न्यायमूर्ती यादव यांच्याकडून सुरक्षेची मागणी

दरम्यान, या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान, न्यायमूर्ती यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत सुरक्षा व्यवस्थेची मागणी केली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला यादव यांच्या सुरक्षेच्या मागणीकडे लक्ष देण्यास सांगत याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले. तसेच दोन आठवड्यांमध्ये सरकारला यावर उत्तर देण्याचे निर्देश दिले होते.

संबंधित बातम्या :

Babri Case | बाबरी विद्ध्वंस पूर्वनियोजित नव्हे, उत्स्फूर्त प्रतिक्रिया, अडवाणींसह सर्व आरोपी दोषमुक्त

Babri Masjid Demolition : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी 28 वर्षात नेमकं काय घडलं?

Saamana Editorial : “बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा अभिमान”, सामनातून बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा

संबंधित व्हिडीओ :

CBI special court judge Surendra Kumar Yadav retired after Babri verdict

Follow Us
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.