सरकारी नोकरीसाठी आता एकच फॉर्म, मोदी सरकारचा निर्णय

केंद्र सरकारने नोकर भरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला (Common Eligibility Test).

सरकारी नोकरीसाठी आता एकच फॉर्म, मोदी सरकारचा निर्णय
Follow us
| Updated on: Aug 20, 2020 | 1:05 AM

नवी दिल्ली : केंद्र सरकारने नोकर भरती प्रक्रियेत महत्त्वाचा बदल केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची घोषणा केली. या निर्णयांमध्ये त्यांनी नोकर भरतीबाबत घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली (Common Eligibility Test).

सरकारी नोकरीसाठी राष्ट्रीय निवड आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या आयोगात नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना रेल्वे, बँक यासारख्या सरकारी नोकऱ्यांसाठी एकच परीक्षा (Common Eligibility Test) देऊन गुणवत्ता सिद्ध करता येणार आहे.

सरकारी नोकरीसाठी तरुणांना अनेक प्रकारचे फॉर्म भरुन वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात. मात्र, आता तरुणांना एकच फॉर्म भरुन विवध विभागांसाठी एकच परीक्षा देता येणार आहे. त्यांना फक्त परीक्षेसाठी राष्ट्रीय निवड आयोगामध्ये नाव नोंदणी करावी लागेल. या आयोगाचं मुख्यालय दिल्लीत राहील, अशी माहिती केंद्रीय मंत्री जिंतेद्र सिंह यांनी ‘टीव्ही 9 भारतवर्ष’सोबत बोलताना दिली आहे.

राष्ट्रीय निवड आयोग कसं काम करणार?

आतापर्यंत एखाद्या उमेदवाराने दोन वेगवेगळ्या विभागांमध्ये सरकारी नोकरीसाठी अर्ज केला असेल तर त्याला दोन परीक्षा द्याव्या लागायच्या. बऱ्याचदा या दोन्ही विभागांच्या परीक्षा एकाच तारखेला असायच्या. अशावेळी उमेदवाराला कोणत्याही एकाच परीक्षेला बसता यायचं. मात्र, आता राष्ट्रीय निवड आयोगाच्या एका परीक्षेत उमेदवार उत्तीर्ण झाला तर त्याला पुढच्या बँक आणि रेल्वे सारख्या इतर सरकारी नोकरीसाठी परीक्षा देता येईल.

“राष्ट्रीय निवड आयोगाच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा होतील. विशेष म्हणजे राष्ट्रीय निवड आयोगाच्या एकाच परीक्षेचे गुण पाहून उमेदवाराची दुसऱ्या विभागातही निवड होऊ शकते. त्यासाठी उमेदवाराला वेगवेगळे फॉर्म भरण्याती गरज नाही. या नव्या प्रक्रियेमुळे वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल”, अशी माहिती जिंतेंद्र सिंह यांनी दिली.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.