SSR Case to CBI | मोदी-शाहांचे विश्वासू मनोज शशिधर यांच्या नेतृत्वात सुशांत प्रकरणी सीबीआय तपास, पथकात कोण-कोण?

सीबीआयचे सहसंचालक मनोज शशिधर, डीआयजी गगनदीप गंभीर, एसपी नुपूर प्रसाद, आणि डीएसपी अनिल कुमार यादव अशी सीबीआयची टीम तपास करणार आहे

SSR Case to CBI | मोदी-शाहांचे विश्वासू मनोज शशिधर यांच्या नेतृत्वात सुशांत प्रकरणी सीबीआय तपास, पथकात कोण-कोण?
Follow us
| Updated on: Aug 19, 2020 | 4:49 PM

नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला. आतापर्यंत गोळा केलेले पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. सीबीआयचे सहसंचालक मनोज शशिधर, डीआयजी गगनदीप गंभीर, एसपी नुपूर प्रसाद, आणि डीएसपी अनिल कुमार यादव अशी सीबीआयची टीम उद्या महाराष्ट्रात दाखल होणार आहे. (Sushant Singh Rajput Death Case transferred to CBI who is officer Manoj Shashidhar and CBI SIT Team)

सर्वोच्च न्यायालयाने आज (19 ऑगस्ट) दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालात सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवली. 6 ऑगस्टला एफआयआर नोंदवल्यानंतर सीबीआयने या प्रकरणात विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय मानले जाणारे गुजरात कॅडरचे आयपीएस अधिकारी मनोज शशिधर हे सीबीआय पथकाचे प्रमुख असतील.

महिला आरोपींची चौकशी करण्यात अडचण उद्भवू नये म्हणून गगनदीप गंभीर आणि नुपूर प्रसाद यांनाही चार सदस्यीय एसआयटी पथकात समाविष्ट करण्यात आले आहे. अनिल यादव हे तपास अधिकारी असतील.

कोण आहे एसआयटी पथकात?

1. मनोज शशिधर, सहसंचालक : अमित शाह यांच्याकडून सीबीआयमध्ये नेमणूक

गुजरात कॅडरचे 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी मनोज शशिधर यांची जानेवारीत सीबीआयचे सहसंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने त्यांच्या नावाला मान्यता दिली होती.

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मनोज शशिधर यांनी बरीच महत्त्वाची पदे भूषवली आहेत. सीबीआयमध्ये जाण्यापूर्वी मनोज शशिधर हे गुजरातमध्ये डीजीपी, सीआयडी (इंटेलिजेंस ब्युरो) म्हणून तैनात होते.

सूत्रांच्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन रेड्डी यांना त्यांच्याशी संबंधित खटल्याची चौकशी गैर-तेलुगू-भाषिक सहसंचालकांकडे सोपवावी अशी इच्छा होती. यासंदर्भात त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्रही लिहिले होते. त्यानंतरच गुजरातमधून मनोज शशिधर यांना दिल्लीला बोलावण्यात आले.

यापूर्वी त्यांनी पोलिस आयुक्त (बडोदा), डीसीपी गुन्हे शाखा (अहमदाबाद) आणि सहआयुक्त (अहमदाबाद) यासारख्या संवेदनशील पदांवर काम केले आहे. विशेष बाब म्हणजे आतापर्यंत ते कोणत्याही तपासणीत अपयशी ठरले नाहीत.

मनोज शशिधर यांची पाच वर्षांसाठी सीबीआयमध्ये नियुक्ती झाली आहे. यापूर्वी त्यांनी विजय मल्ल्या प्रकरणाच्या तपासावरही देखरेख ठेवली आहे. उच्च-जोखीम, उच्च-तणावपूर्ण वातावरणात काम करण्यात ते प्रसिद्ध आहेत.

2. गगनदीप गंभीर, डीआयजी : उत्तर प्रदेशमधील अवैध खाण प्रकरणात प्रभावी तपास

बिहारच्या मुझफ्फरनगरमध्ये बालपण, तर पंजाब विद्यापीठात गगनदीप गंभीर यांचे शिक्षण झाले. तिथेही त्या टॉपर राहिल्या आहेत. त्या गुजरात कॅडरच्या 2004 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. सीबीआयमध्ये घोटाळ्यांच्या तपासात मास्टरमाइंड मानल्या जातात.

राजकीय दबावाला गगनदीप गंभीर भीक घालत नाहीत, असे म्हटले जाते. म्हणूनच उत्तर प्रदेशातील अवैध खाण प्रकरणात अखिलेश यादव यांच्या भूमिकेच्या चौकशीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी सृजन घोटाळा आणि पत्रकार उपेंद्र राय प्रकरणाची चौकशीही केली.

गंभीर यांना लहानपणापासूनच पोलिस अधिकारी व्हायचे होते. यूपीएससी परीक्षेत चांगले रँकिंग मिळाल्यानंतरही त्यांनी ‘आयएएस’ऐवजी ‘आयपीएस’ची निवड केली आणि गुजरात कॅडरच्या अधिकारी झाल्या.

3. नुपूर प्रसाद, एसपी : बिहार कनेक्शनमुळे टीमचा भाग

नुपूर प्रसाद 2007 बॅचच्या एजीएमयूटी कॅडरच्या आयपीएस अधिकारी आहेत. बिहारमधील गया जिल्ह्यातील टिकारी येथे राहणाऱ्या नुपूर या सीबीआयच्या कडक महिला अधिकाऱ्यांपैकी एक मानल्या जातात.

बाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठातून नुपूर प्रसाद पदवीधर झाल्या. 2007 मध्ये दिल्ली पोलिसात शाहदराच्या डीसीपी म्हणून त्यांनी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. अलिकडेच त्यांना बढती देऊन सीबीआयकडे पाठवण्यात आले आहे.

4. अनिल कुमार यादव, डीएसपी : व्यापमं घोटाळ्याशी संबंधित व्यक्तींच्या हत्येचा तपास

डीएसपी अनिल कुमार यादव हे मध्य प्रदेशचे आहेत. जेव्हा हत्येच्या गुंतागुंतीच्या चौकशीचा प्रश्न येतो तेव्हा त्यांनी अनेक वेळा आपली क्षमता सिद्ध केली आहे. मध्य प्रदेशच्या व्यापमं घोटाळ्याशी संबंधित लोकांच्या मृत्यूची चौकशी अनिल कुमार यादव यांनी केली आहे.

यादव यांना त्यांच्या कार्याबद्दल 2015 मध्ये प्रजासत्ताक दिनी पोलिस पदक देण्यात आले आहे. सुशांत प्रकरणात त्यांना तपास अधिकारी करण्यात आले आहे. व्यापमंच्या आधी यादव कॉमनवेल्थ घोटाळा आणि ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा यासारख्या हाय-प्रोफाइल प्रकरणांमध्येही ते तपास पथकाचे सदस्य होते.

यादव यांनी यापूर्वी शोपिया प्रकरण तसेच विजय मल्ल्या प्रकरणाची चौकशी केली आहे. यादव यांच्याबरोबर काम केलेल्या एका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केली त्याची हत्या झाली, हे स्पष्ट करण्यात यादव यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल.

सीबीआय तपासाची दिशा कशी असेल?

सीबीआयमधील वरिष्ठ एसपी पदावरुन निवृत्त झालेले मुकेश साहनी यांनी ‘दैनिक भास्कर’ला दिलेल्या माहितीनुसार बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे या प्रकरणाची चौकशी केली जाईल. सीबीआय यापुढे बिहार आणि महाराष्ट्र पोलिसांकडून आतापर्यंतच्या तपासावर आधारित कागदपत्रे गोळा करेल. यात कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर), बँक खात्याचा तपशील यांचा समावेश आहे.

बिहार पोलिसांना आतापर्यंत केवळ सुशांतच्या नातेवाईकांकडूनच जबाब घेण्यात यश आले आहे. रियासह इतरांचे जबाब नोंदवण्यात आले नाहीत. सीबीआय आता हे काम करेल. सीबीआयला सीसीटीव्ही फुटेज, चौकशीचा तपशील, पोस्टमार्टम रिपोर्ट, एफएसएल (फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी) रिपोर्ट मुंबई पोलिसांकडून अहवाल गोळा करावा लागणार आहे. (Sushant Singh Rajput Death Case transferred to CBI who is officer Manoj Shashidhar and CBI SIT Team)

कागदपत्रे जमा केल्यानंतर तपास अधिकारी कृती आराखडा तयार करतील. त्यावर, सीबीआयचे उच्च अधिकारी चौकशीची दिशा काय असेल याचा निर्णय घेतील. यानंतर यादव आपले काम सुरु करतील. यामधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घटनेची पुनरावृत्ती (रीक्रिएशन).

प्रत्येक प्रकरणात, 15 दिवस, 30 दिवसांत, तपास अधिकाऱ्यास प्रगती अहवाल उच्च अधिकाऱ्यांना सादर करावा लागतो. परंतु, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता असे दिसते की प्रत्येक टप्प्यावर उच्च अधिकाऱ्यांमार्फत आढावा घेतला जाईल.

सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की आरोपीचा हेतू सिद्ध केला गेला, तरच आत्महत्येला प्रवृत्त केल्याचे सिद्ध होते. यामुळे, तपासणी पुढे नेताना ही एक आवश्यक अट असेल.

एफआयआरमध्ये आरोप आहे की रिया आणि तिच्या नातेवाईकांनी सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केले. चौकशीमार्फत सीबीआयला हे सिद्ध करावे लागेल की सुशांतने आत्महत्या करावी, हा रियाचा हेतू होता.

प्रत्यक्ष पुराव्यांसोबत परिस्थितीजन्य पुरावे आवश्यक असतील. यासाठी रियाचे नातेवाईक, सुशांतचे मित्र, आप्तेष्ट आणि त्या प्रत्येकाची चौकशी होईल, जो दोघांच्या नात्याबद्दल मोकळेपणाने बोलू शकतो.

सुप्रीम कोर्टाचा निकाल काय?

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची बिहार सरकारची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी कायम ठेवली. वडिलांच्या तक्रारीवरुन सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येसंदर्भात एफआयआर नोंदवण्याचा बिहार पोलिसांना हक्क असल्याचे न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या एकल खंडपीठाने म्हटले. बिहार पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर सर्वसमावेशक असल्याचे सांगत चौकशी सीबीआयला देण्याचे कोर्टाने मान्य केले. मुंबई पोलीस सक्षम असल्याचे सांगत महाराष्ट्र सरकारनेही हा तपास सीबीआयकडे सोपवण्यास विरोध दर्शवला होता.

सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र पोलिसांना खटल्याच्या फाइल्स सीबीआयकडे सोपवण्याचे आणि आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. “सीबीआय चौकशीचे आदेश कोर्टाने दिले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी त्याचे पालन केले पाहिजे आणि मदत केली पाहिजे” असे खंडपीठाने म्हटले. अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूसंदर्भात भविष्यात नोंदवण्यात येणाऱ्या इतर कोणत्याही प्रकरणांचीही चौकशी करण्याचे निर्देशही कोर्टाने सीबीआयला दिले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीची याचिका फेटाळताना कोर्टाने हा आदेश दिला. ही एफआयआर पाटण्याहून मुंबईत हस्तांतरित करुन बिहार पोलिसांकडून होणाऱ्या चौकशीला स्थगिती देण्याची मागणी रियाने केली होती. सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आपल्या मुलाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप रियावर केला आहे.

सुशांतसिंह राजपूत याचा मृतदेह 14 जून रोजी वांद्र्यातील राहत्या घरी सापडला होता. सुशांतच्या अनैसर्गिक मृत्यूबद्दल मुंबई पोलिस कारवाई करत असताना त्याच्या वडिलांनी 25 जुलै रोजी रिया चक्रवर्ती आणि इतर पाच जणांविरोधात पाटणा येथील राजीव नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

संबंधित बातम्या :

मुंबई पोलिसांना सुप्रीम कोर्टाचा धक्का, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

सत्यमेव जयते ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयावर, पार्थ पवार यांची प्रतिक्रिया

ठाकरे सरकारची दादागिरी संपेल, सोमय्यांचा हल्लाबोल, राणे ते शेलार, विरोधकांचा घणाघात

मुंबई पोलिसांविरोधात षडयंत्र, सीबीआय तपासाच्या निकालानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

पार्थ पवारांची मागणी आजोबांना आवडली का, यावर बोलणार नाही, पण… : देवेंद्र फडणवीस

तपास कुणीही केला, तरी सत्य हे सत्यच; रिया सीबीआय चौकशीस तयार, वकिलांची प्रतिक्रिया

(Sushant Singh Rajput Death Case transferred to CBI who is officer Manoj Shashidhar and CBI SIT Team)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.