AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनलॉकची घाई नको, राज्यात कोरोनाची दुसरी लाटही येऊ शकते : मुख्यमंत्री

"देशात जूनपासून मिशन बिगेन सुरु करण्यात आलं असलं तरी महाराष्ट्रात अनलॉक करण्याची घाई करणार नाही", असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे (CM Uddhav Thackeray on Unlock).

अनलॉकची घाई नको, राज्यात कोरोनाची दुसरी लाटही येऊ शकते : मुख्यमंत्री
| Updated on: Aug 24, 2020 | 9:04 PM
Share

ठाणे : “देशात जूनपासून ‘मिशन बिगेन’ सुरु करण्यात आलं असलं तरी महाराष्ट्रात अनलॉक करण्याची घाई करणार नाही”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे (CM Uddhav Thackeray on Unlock). “आधी सर्व सुरु करायचं आणि नंतर बंद करण्याची वेळ येऊ नये त्यामुळे खात्री झाल्याशिवाय अनलॉकचा निर्णय घेतला जाणार नाही”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

“कोरोना नियंत्रणात येतोय ही चांगली बाब असली तरी कौतुकाचे बळी पडू नका. कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, हा जगाचा अनुभव असल्याने गाफीलही राहू नका”, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना केलं (CM Uddhav Thackeray on Unlock).

हेही वाचा : केंद्राच्या नव्या सूचना, मात्र महाराष्ट्रात ई-पासमध्ये सवलत नाही, सक्ती कायम : अनिल देशमुख

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (24 ऑगस्ट) ठाणे महापालिका मुख्यालयाच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, तीनही महापालिकांचे आयुक्त आणि सर्व अधिकारी उपस्थित होते.

या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना एमएमआर रिजनमधील महापालिका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करत असलेल्या उपाययोजनांवर समाधान व्यक्त केलं.

“देशात कोरोनाविरोधात जी लढाई सुरु आहे त्यात महाराष्ट्र कुठेही मागे नाही. एमएमआर रिजनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही वाढतच होती. मात्र गेल्या महिनाभरात डॉक्टर, नर्स, पोलीस, शासकीय आणि पालिका यंत्रणांनी चांगल्या पद्धतीने मुकाबला केला. या सर्व यंत्रणाचा मला अभिमान आहे”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

“गणपती उत्सव सुरु झाला आहे. दीड दिवसांच्या गणपतीचे विसजर्न झाले. पण आधी एक प्रश्न नेहमी विचारला जायचा, उत्सव कसा होणार? विसजर्न कसे होणार? मात्र सर्वधर्मीयांनी सामाजिक जाणीवेतून उत्सव साजरे केले”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.