Corona Virus India | देशात कोरोनाबाधितांचा आकडा 400 पार, महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण

| Updated on: Mar 23, 2020 | 3:05 PM

भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 415 इतकी झाली आहे. यात देशभरातील सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले (Corona Virus India) आहे.

Corona Virus India | देशात कोरोनाबाधितांचा आकडा 400 पार, महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात कोरोना व्हायरसचा हाहा:कार (Corona Virus India) पाहायला मिळत आहे. देशभरात कोरोनाबाधितांची संख्या 433 झाली आहे. तर आतापर्यंत 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 50 पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत (Corona Virus India) आहे. आज (23 मार्च) भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 415 इतकी झाली आहे. यात देशभरातील सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 89 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात मुंबईत सर्वाधिक 39, पुणे 16, पिंपरी चिंचवड 12 रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली.

हेही वाचा : Corona समूह संसर्ग : कोरोना प्रसाराचा तिसरा टप्पा नेमका काय?

महाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्ये 67 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर दिल्लीत 30 आणि उत्तरप्रदेशात 25  कोरोनाग्रस्त रुग्ण पाहायला मिळत आहे.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, बिहार, पंजाब, उत्तराखंड, छत्तीसगड, झारखंड, जम्मू काश्मीर, तेलंगाणा, आंध्रप्रदेश, अरुणाचल प्रदेशात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. यासोबत उत्तरप्रदेशातील 16 जिल्हे 25 मार्चपर्यंत लॉकडाऊन ठेवण्यात येणार (Corona Virus India) आहे.

राज्य कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
(भारतीय)
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
(विदेशी)
डिस्चार्ज मृत्यू
दिल्ली 16121
हरियाणा414
केरळ 3373
राजस्थान2123
तेलंगाणा1091
उत्तर प्रदेश2219
लडाख10
तमिळनाडू31
जम्मू-काश्मीर4
पंजाब61
कर्नाटक1511
महाराष्ट्र5931
आंध्रप्रदेश3
उत्तराखंड 3
ओडिशा2
पश्चिम बंगाल2
छत्तीसगड1
गुजरात9
पाँडेचरी1
चंदीगड5
मध्यप्रदेश 4
हिमाचल प्रदेश2
23638234

संबंधित बातम्या :

मुंबईत कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू, मृतांचा आकडा 3 वर

Corona Virus | जमावबंदी झुगारुन मुलुंड टोलनाक्यावर वाहनांची गर्दी, खासगी वाहनांच्या रांगा

दहा दिवस पुरेसाच रक्तसाठा, अंतर राखून रक्तदान करा, राजेश टोपेंची कळकळीची विनंती