AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Virus | जमावबंदी झुगारुन मुलुंड टोलनाक्यावर वाहनांची गर्दी, खासगी वाहनांच्या रांगा

मुलुंडमधील आनंद नगर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात चार चाकी गाड्यांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत (People Rush Mulund Maharashtra LockDown) आहे.

Corona Virus | जमावबंदी झुगारुन मुलुंड टोलनाक्यावर वाहनांची गर्दी, खासगी वाहनांच्या रांगा
| Updated on: Mar 23, 2020 | 11:41 AM
Share

मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत (People Rush Mulund Maharashtra LockDown) आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात जमावबंदीचे आदेश दिले आहे. मात्र हे आदेश झुगारुन अनेक नागरिक घराबाहेर पडल्याचे पाहायला मिळत आहे. मुलुंडमधील आनंद नगर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात चार चाकी गाड्यांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

मुलुंडमधील आनंद टोल नाक्यावर आज (23 मार्च) सकाळच्या सुमारास (People Rush Mulund Maharashtra LockDown) प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. या टोलनाक्यावर चार चाकी वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. यात अनेक वाहन ही खाजगी असून हे सर्व नागरिक कामासाठी घराबाहेर पडले आहे.

मात्र मुंबई पोलिसांनी सजग राहत जे लोक अत्यावश्यक सेवेचा भाग आहेत, त्यांनाच मुंबईच्या दिशेने सोडत आहेत. तर इतर गाड्यांना परत माघारी पाठवत आहे.

तर दुसरीकडे मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवर बाहेरच्या राज्यातून कामानिमित्ताने आलेल्या तरुणांची गर्दी पाहायला मिळत आहे. सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या बंद झाल्याने या नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे.

यातील अनेक प्रवाशांनी आक्रमक पावित्रा धारण करत आम्ही आता खाणार काय, कुठे जाणार? असे अनेक प्रश्नही नागरिक विचारत आहे.

कोरोनाबाधितांचा आकडा 74 वरुन 89 वर

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाच्या 15 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मुंबईत 14, तर पुण्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 74 वरुन 89 वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे आणखी एका कोरोना रुग्णाचा बळी गेला आहे. फिलिपिन्सवरुन आलेल्या नागरिकाचा आज (23 मार्च) मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात जमावबंदी

‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 31 मार्चपर्यंत अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. जनता कर्फ्यूची वेळ संपलेली असली, तरी आता स्वयंशिस्त पाळण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रात कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू झाली असून त्यानुसार पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र फिरता येणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यूनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली.

त्यानंतर आज सकाळी 5 ते 31 मार्चपर्यंत महाराष्ट्रात जमावबंदी लागू करण्यात आली. तसेच, जर कोणी नियमांचं उल्लंघन केलं तर त्याच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाणार (People Rush Mulund Maharashtra LockDown) आहे.

Follow Us
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.