AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona : कोरोनामुळे कापूस निर्यात ठप्प, शेतकऱ्यांचे नुकसान

चीनमध्ये कोरोना व्हायरस पसरल्यामुळे चीन सरकारने 80 टक्के आयात-निर्यात थांबवली (Cotton export stop due to corona) आहे.

Corona : कोरोनामुळे कापूस निर्यात ठप्प, शेतकऱ्यांचे नुकसान
संग्रहित
| Edited By: | Updated on: Mar 11, 2020 | 9:22 PM
Share

जळगाव : चीनमध्ये कोरोना व्हायरस पसरल्यामुळे चीन सरकारने 80 टक्के आयात-निर्यात थांबवली (Cotton export stop due to corona) आहे. त्यामुळे भारताकडून येणारी कापसाचीही निर्यात चीनने थांबवल्यामुळे 3 लाख गाठी भारताकडे पडून आहेत. निर्यात थांबल्यामुळे सीसीआयने देखील जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र बंद केले आहेत. शासकीय खरेदी बंद झाल्याने व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पुन्हा लूट सुरु झाली आहे. शेतकऱ्यांनाही नाईलाजास्तव हमीभावापेक्षा तब्बल 500 रुपये कमी दराने कापूस विक्री करावा लागत (Cotton export stop due to corona) आहे.

चीन हा भारताचा प्रमुख कापूस निर्यातदार देश आहे. दरवर्षी भारताकडून 12 ते 15 लाख गाठी चीनला निर्यात होतात. यंदा जानेवारीपर्यंत 6 लाख गाठींची निर्यात चीनमध्ये झाली आहे. मात्र, कोरोना व्हायरसचे वाढत असलेले प्रमाण यामुळे चीनमधून येणारा माल आणि भारतातून जाणारा माल देखील चीन सरकारने थांबवला आहे. त्यामुळे कापसाची पुर्णपणे निर्यात थांबली आहे.

भारताकडे चीनला पाठविण्यात येणाऱ्या 3 लाख गाठी पडून आहेत. भारतासह अमेरिका आणि इतर देशातील निर्यात थांबवल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात देखील त्याचा परिणाम होत आहे. आधीच अमेरिका आणि चीनच्या ट्रेडवॉरमुळे चीनमधील निर्यातीवर परिणाम झाला होता.

अचानक केंद्र बंद करण्याचा फतवा

सीसीआयचे केंद्र दरवर्षी मार्च-एप्रिलपर्यंत सुरु राहत असतात. मात्र, 30 जानेवारी रोजी सीसीआयने तातडीने 5 फेब्रुवारीपर्यंत कापूस खरेदी थांबवण्याचे पत्र काढले. तसेच पुढील आदेश येईपर्यंत खरेदी सुरु करू नये असेही सीसीआय प्रशासनाने पत्रात म्हटले आहे. कापूस खरेदी थांबविण्याबाबतचे कोणतेही कारण सीसीआयने दिलेले नाही.

हमीभावात 100 रुपयांची घट

आंतरराष्ट्रीय बाजारात पसरलेल्या मंदीचा परिणाम कापसाच्या भावावर देखील झाला आहे. लाखो गाठी भारताच्या बाजारातच पडून असल्याने आठवडाभरात हमीभावात 100 रुपयांची घट झाली आहे. शासनाने कापसाचा हमीभाव 5550 इतका निश्चित केला होता. मात्र, सध्या 5450 इतक्या भावाने कापसाची खरेदी होत आहे. सीसीआयने जरी खरेदी थांबवली असली तरी मात्र पणन महासंघाचे खरेदी केंद्र सुरु आहेत.

सीसीआयचे केंद्र बंद होताच व्यापारी-एजंट सक्रीय

आतापर्यंत जिनिंग किंवा शासकीय खरेदी केंद्रावर 15 लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. अद्याप 50 टक्के माल शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे. त्यातच शासकीय खरेदी थांबल्यामुळे आता ती पुन्हा सुरु होईल की नाही ? याबाबत साशंकता आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना खासगी जिनिंग आणि व्यापाऱ्यांना माल देण्याशिवाय पर्याय नाही. अशा परिस्थितीत व्यापाऱ्याकडून 4700 ते 4800 रुपये प्रतिक्विंटल कापूस खरेदी केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे तब्बल 500 ते 600 रुपयांचे नुकसान होत आहे.

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.