AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतून गावी परतला, घरी न जाता थेट शेतात जाऊन राहिला, तरीही कोरोना पॉझिटिव्ह निघाला

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेकजण गावी जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढताना (Dhule Corona Patient Chain Breaker) दिसत आहे.

मुंबईतून गावी परतला, घरी न जाता थेट शेतात जाऊन राहिला, तरीही कोरोना पॉझिटिव्ह निघाला
| Updated on: May 11, 2020 | 3:11 PM
Share

धुळे : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत (Dhule Corona Patient Chain Breaker) आहे. तसेच बरं होऊन घरी जाणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. कोरोनाने सुरुवातीला मुंबई आणि पुणे या ठिकाणी विळखा घातला. त्यानंतर मुंबई आणि पुण्याहून अनेक लोक गावाकडे येण्यास निघाले. लॉकडाऊन असतानाही अनेकांनी चालत गाव गाठलं. यात शहरातून आलेल्या काहींना कोरोनाची लागण झाली. मात्र मुंबईतून धुळ्यात परतलेल्या एका तरुणाच्या दक्षतेमुळे संपूर्ण गावाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला नाही.

धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यात डांगुर्णे गावातील एक तरुण मुंबईतून आला (Dhule Corona Patient Chain Breaker) होता. मात्र या तरुणाने घरी न जाता आपल्या शेतात राहण्याचा निर्णय घेतला. हा तरुण उच्चशिक्षित असून तो एका कंपनीत कामाला आहे. त्यामुळे त्याला संसर्गाचा परिणाम माहिती होता. त्यानुसार त्याने कुटुंबाला न भेटता शेतातच वास्तव्य केलं.

तो तरुण शेतात राहत असताना तीन दिवसांनी त्याला त्रास होऊ लागला. त्यानंतर त्याने स्वत: हून दवाखाना गाठला. श्री भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज या ठिकाण गेल्यानंतर त्याची स्वॅब टेस्ट घेण्यात आली. या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मात्र मुंबईतून आल्यानंतर या तरुणाने शेतात वास्तव्य केल्याने गावात इतर कोणालाही कोरोनाचा संसर्ग झाला नाही.

या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर दहा दिवसांनी या तरुणाने कोरोनावर मात केली आहे. तो पूर्णपणे ठणठणीत बरा झाला.

दरम्यान या तरुणाच्या दक्षतापूर्वक घेतलेल्या निर्णयामुळे त्याच्यासह संपूर्ण कुटुंबाचं कौतुक केलं जात आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अक्षय तृतीया सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पण अक्षय तृतीयाच्या दिवशीही हा मुलगा शेतातच होता. या दिवशी कोणीही त्या भेटण्यासाठी गेले नव्हते.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेकजण गावी जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे.

धुळे जिल्ह्यात आतापर्यंत साखरी, शिंदखेडा, शिरपूर आणि धुळे तालुक्यातील शिरपूर तालुका कोरोना मुक्त झाला आहे. तर शिंदखेडा तालुक्यातील तीन पैकी दोन रुग्ण ठणठणीत बरे होऊन आपल्या गावी परतले आहेत. त्याशिवाय चिमठाणे गावातील एकाला कोरोनाची लागण झाल्याने सध्या ते उपचार घेत (Dhule Corona Patient Chain Breaker) आहेत.

संबंधित बातम्या : 

17 मेनंतर काय? पंतप्रधान सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार, पाचव्यांदा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा

सोलापुरात 16 पोलिसांना कोरोनाची लागण, जिल्ह्यातील आकडा 250 वर

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....