AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जनता कर्फ्यूदरम्यान क्रिकेट खेळणं महागात, कल्याणमध्ये 9 जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल

कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी देशात आज (22 मार्च) सकाळी सात वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू (Janta Curfew Cricket Player Fir register)  म्हणजे एकप्रकारची संचारबदी लागू करण्यात आली आहे.

जनता कर्फ्यूदरम्यान क्रिकेट खेळणं महागात, कल्याणमध्ये 9 जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल
| Edited By: | Updated on: Mar 22, 2020 | 8:40 PM
Share

मुंबई : कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी देशात आज (22 मार्च) सकाळी सात वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू (Janta Curfew Cricket Player Fir register)  म्हणजे एकप्रकारची संचारबदी लागू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्री मोदींनी देशातील नागरिकांना जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे. जनता कर्फ्यूदरम्यान कल्याणमध्ये क्रिकेट खेळणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण पश्चिमेतील काळा तलाव (Janta Curfew Cricket Player Fir register)   या ठिकाणी जनता कर्फ्यू दरम्यान काही जण क्रिकेट खेळत होते. जनता कर्फ्यूदरम्यान सर्व नागरिकांना घरात राहा अशा सूचना दिल्या आहे. त्या पार्श्वभूमीवर कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी क्रिकेट खेळणाऱ्या 9  जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.

या सर्वांवर भादवी 128, 269, 270, 290 मुंबई पोलीस एक्ट 37(3)135, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा सण 2005 चे कलम 51 (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपूर्ण देशात कोरोना विरोधात जनता कर्फ्यू पाळला जात आहे. देशासह राज्यातील मोठी शहरं ते ग्रामीण भागातही सर्व नागरिक हा कर्फ्यू त्यांची नैतिक जबाबदारी म्हणून पाळत आहेत. राज्यातील प्रत्येक रस्त्यावर शुकशुकाट पसरला आहे.

कोरोनाला हरवायचं असेल, इतरांशी संपर्क टाळणे याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे, अत्यावश्यक सुविधा पुरवणारे सोडता इतर सर्व नागरिकांनी स्वत:ला एका दिवसासाठी क्वारंटाईन केलं आहे.

आज जनता कर्फ्यू

कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता देशात आज सकाळी सात वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांना एक दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं आहे. जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर आज दिवसभर अन्नधान्य, दूध, औषधे यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं आणि कार्यालयांना टाळं असणार (Janta Curfew Cricket Player Fir register)   आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.