AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गेल्या 9 वर्षांपासून पावसाचं प्रमाण घटलं, तापमान वाढलं, भविष्यात मोठा धोका

या संकटाची चाहूल पाच दशकांपूर्वीच जगाला लागली होती, त्यामुळे 5 जून 1972 पासून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातोय. आज आपल्यासमोर कमी झालेल्या पावसाचं प्रमाण सर्वात मोठं संकट आहे.

गेल्या 9 वर्षांपासून पावसाचं प्रमाण घटलं, तापमान वाढलं, भविष्यात मोठा धोका
| Edited By: | Updated on: Jun 26, 2019 | 8:45 PM
Share

नागपूर : जगभरात पर्यावरण संवर्धनासाठी अनेक प्रयत्न केले जातात, पण भारताच्या बाबतीत विचार केला तर वैयक्तिक पातळीवर त्याबाबत फार जागरुकता दिसून येत नाही. याचाच परिणाम म्हणून गेल्या काही वर्षात उष्णता प्रचंड वाढली आहे आणि पावसाचं प्रमाण कमी झालंय. यावर्षी चंद्रपुरात सर्वात विक्रमी तापमान नोंदवण्यात आलंय. त्यामुळे तापमान वाढ, बदलतं हवामान आणि सर्वात चिंताजनक म्हणजे कमी झालेलं पावसाचं प्रमाण. या संकटाची चाहूल पाच दशकांपूर्वीच जगाला लागली होती, त्यामुळे 5 जून 1972 पासून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातोय. आज आपल्यासमोर कमी झालेल्या पावसाचं प्रमाण सर्वात मोठं संकट आहे.

जून महिना संपत आलाय, पण पावसाचं प्रमाण अत्यंत कमी आहे. काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आहे. पर्यावरणाचा ऱ्हास हा मानवी अस्तित्त्वासाठी सर्वात मोठा धोका बनलाय. याचे चटकेही बसायला लागले आहेत. वाढलेल्या तापमानामुळे एकट्या विदर्भात यंदाच्या उन्हाळ्यात 50 पेक्षा जास्त लोकांचा उष्माघाताने मृत्यू झालाय, तर सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचं जगणंच हिरावून घेतलं जातंय. बदलत्या हवामानामुळे देशात आणि जगातही पावसाने आपला मूड बदललाय. गेल्या काही वर्षांत पाऊस उशिराने येतो आणि लवकर निघून जातोय. पावसाचे एकूण दिवस कमी झालेत. शेतीवर अवलंबून असलेल्या देशातील 57 टक्के जनतेला हा सर्वात मोठा धोका आहे.

हवामान बदलामुळे देशात दुष्काळ पाचवीला पुजलेला आहे. कधी गारपीट, कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ. हे बदलतं ऋतूचक्र माणसांपुढे सर्वात मोठं आव्हान आहे.

पावसाचे आकडे, भीषण संकटाची चाहूल

वर्ष – 2012

मराठवाडा- 33 टक्के कमी पाऊस

मध्य महाराष्ट्र – 25 टक्के कमी पाऊस

देशात – 07 टक्के कमी पाऊस

वर्ष – 2014

मराठवाडा – 42 टक्के कमी पाऊस

मध्य महाराष्ट्र –  06 टक्के कमी पाऊस

विदर्भ – 14 टक्के कमी पाऊस

देशात- 12 टक्के कमी पाऊस

वर्ष – 2015

मराठवाडा – 40 टक्के कमी पाऊस

मध्य महाराष्ट्र – 33 टक्के कमी पाऊस

विदर्भ – 11 टक्के कमी पाऊस

देशात – 14 टक्के कमी पाऊस

वर्ष – 2017

मराठवाडा- 06 टक्के कमी पाऊस

विदर्भ – 23 टक्के कमी पाऊस

देशात – 05 टक्के कमी पाऊस

वर्ष – 2018

मराठवाडा – सरासरीच्या 22 टक्के कमी पाऊस

पाच वर्षातील पावसाचे हे आकडे धोक्याची घंटा आहेत. कारण पाचही वर्षे मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि देशातही सरासरीच्या कमी पाऊस पडला. जगाला ग्लोबल वॉर्मिगचा मोठा धोका आहे, याचे चटके आता सोसावे लागत आहेत. गेल्या काही वर्षांत तापमानात मोठी वाढ झाली आहे आणि पावसाचं प्रमाण कमी झालंय.

पावसाचे एकूण दिवसही कमी झाले आहेत. त्याचा मोठा फटका मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यातल्या शेतकऱ्यांना बसतोय. देशात पावसाचं प्रमाण कमी झाल्याची बाब हवामान विभागही मान्य करतो. सततचा दुष्काळ, भूगर्भातील घटलेली पाणीपातळी आणि वाढलेलं तापमान… पर्यावरण बदलाचे हे परिणाम आहेत. त्यामुळे धोका वेळीच लक्षात घेऊन पर्यावरणाच्या रक्षणासाठी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे आणि पावसाच्या पाण्याचा काटेकोर वापरही तेवढाच गरजेचा आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.