AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Golden Sparrow | भारत पुन्हा सोने की चिडिया, यंदा 20 हजार किलो सोन्यासाठी होणार खोदाखोदी; प्रकरण काय?

केंद्रीय खनिजकर्म उद्योगाच्या आकडेवारीनुसार सध्या भारतातील सोन्याच्या खाणीत एकूण 70.1 टन सोने आहे. यातील 88 टक्के सोने हे एकट्या कर्नाटकात आहे. आंध्र प्रदेशात 12 टक्के आणि झारखंडमध्ये 0.1 टक्के सोने आहे.

Golden Sparrow | भारत पुन्हा सोने की चिडिया, यंदा 20 हजार किलो सोन्यासाठी होणार खोदाखोदी; प्रकरण काय?
gold
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Mar 27, 2022 | 1:13 PM
Share

नवी दिल्लीः कधी काळी भारतातून सोन्याचा धूर निघायचा, असे म्हटले जायचे. आता याच अतिशय लोकप्रिय असणाऱ्या आणि अनेकांच्या गळ्यातले ताईत झालेल्या सोन्याच्या (Gold) उत्खननात आत्मनिर्भर होण्यासाठी भारताने (India) जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. या वर्षी तब्बल 20 हजार किलो सोने खोदून काढण्यात येणार आहे. केंद्रीय खनिजकर्म उद्योगाच्या आकडेवारीनुसार सध्या भारतातील सोन्याच्या खाणीत एकूण 70.1 टन सोने आहे. यातील 88 टक्के सोने हे एकट्या कर्नाटकात (Karnataka) आहे. आंध्र प्रदेशात 12 टक्के आणि झारखंडमध्ये 0.1 टक्के सोने आहे. देशात पहिल्यांदा सोन्याचे उत्खनन कर्नाटकमध्ये 1947 साली झाले. तेव्हा हट्टी गोल्ड माइनमधून सोने काढण्यात आले. या खाणीतून आतापर्यंत तब्बल 84 टन सोने काढण्यात आले आहे. जगात सर्वात जास्त सोने खरेदी भारत आणि चीनमध्ये केली जाते. एकूण जागतिक सोन्याच्या खरेदीपैकी या दोन देशात 57 टक्के खरेदी होते. तर गेल्या वर्षी भारतात तब्बल अडीच ट्रिलियन डॉलर सोन्याची खरेदी झाली. एखाद्या जागी सोन्याचा शोध लागला म्हणजे लगेच ते बाजारात येते असे नाही. त्यावर प्रक्रिया केली जाते. सोने शुद्ध करून ग्राहकांपर्यंत पोहचवले जाते.

कसे होते सोन्याचे उत्खनन?

सोने सापडले की त्या जागेचे संपादन केले जाते. यंत्राच्या सहाय्याने तिथे खोदकाम होते. जमिनीच्या खोलवर किमान साडेतीन किलोमीटरपर्यंत खोदाखोद करावी लागते. तेव्हा कुठे सोने असलेले खडक सापडतात. हे खडक फोडले जातातत. ते जमिनीतून वर काढतात. हे खडक जवळच्या प्रकल्पात नेऊन त्यांचे बारीक तुकडे केले जातात. या तुकड्यातून सोने वेगळे केले जाते. ही खूप वेळखावू आणि अतिशय किचकट अशी प्रक्रिया असते.

कशी वाढते किंमत?

सोने असलेले खडक सायनाइड, कार्बनच्या मिश्रणात भिजवून ठेवतात. त्यात खडक विरघळतो आणि कच्चे सोने दृष्टीस पडते. हे सोने उच्च तापमानात वितळवतात. यातून कार्बन निघून जाते. मग शुद्ध सोने दिसते. सोन्याची शुद्धता ही या प्रक्रियेवरच ठरते. या सोन्याचे बारीक कण उत्पादन प्रकल्पात पाठवतात. त्याची बिस्कीटे, चीप, वीट अशी गरजेनुसार निर्मिती केली जाते. एकंदर सोन्याचे साठे सापडण्यापासून ते हाती येईपर्यंत बराच काळ जावा लागतो. त्यामुळे आपसुकच त्याची किंमतही वाढते.

इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली