AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांद्याच्या किमती वाढू नये म्हणून केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आयातीवरील अटींमध्ये सूट

केंद्र सरकारने आज (21 ऑक्टोबर) भारतातील कांद्याचे दर कमी व्हावेत यासाठी कांदा आयातीच्या नियमांमध्ये काही प्रमाणात सूट दिली आहे.

कांद्याच्या किमती वाढू नये म्हणून केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आयातीवरील अटींमध्ये सूट
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Oct 22, 2020 | 12:03 AM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आज (21 ऑक्टोबर) भारतातील कांद्याचे दर कमी व्हावेत यासाठी कांदा आयातीच्या नियमांमध्ये काही प्रमाणात सूट दिली आहे. यामुळे बाहेरील देशांमधून कांदा सहजपणे भारतात येऊन कांद्याच्या किमती कमी करण्यास मदत होणार आहे. याशिवाय केंद्र सरकार कांदा भंडारांमधून (बफर स्टॉक) अधिक प्रमाणात कांदा बाजारात आणणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कांदा दरावर विपरीत परिणाम होणार आहे (Government relaxes important norms for onion import to reduce prices).

केंद्र सरकारने म्हटलं आहे, “कांदा आयातीला सहजसोपं बनवण्यासाठी 21 ऑक्टोबर 2020 रोजी आयातीसाठी प्लांट क्वारंटाईन ऑर्डर, 2003 अंतर्गत फायईटोसेन्टरी सर्टिफिकेटवर फ्यूमिगेशन आणि अतिरिक्त घोषणेच्या अटींमध्ये सूट देण्यात आली आहे. ही सूट 15 डिसेंबर 2020 पर्यंत असणार आहे.”

केंद्र सरकारने भारतीय उच्च आयुक्तांना संबंधित देशांमध्ये व्यापाऱ्यांशी संपर्क करुन कांदा आयात वाढवण्यावर भर देण्याचे निर्देश दिले आहेत. आयात करण्यात आलेला हा कांदा पीएससीवर फ्यूमिगेटशिवाय भारतीय बंदरात दाखल होणार आहे. तो भारतात आल्यावर आयात करणाऱ्याकडून फ्यूमिगेट करण्यात येईल. आयात करणाऱ्यांवर या कांद्याचा उपयोग केवळ वापरासाठी करण्याचे निर्बंध असणार आहेत. त्यामुळे हे कांदे साठवण करुन व्यापाऱ्यांना ठेवता येणार नाहीये.

सरकारने रब्बी हंगामात उत्पादन झालेल्या कांद्याचा बफर स्टॉक तयार केला आहे. कांद्याच्या किमती कमी होण्यासाठी या बफर स्टॉकमधील कांदे सप्टेंबर 2020 पासून बाजारात आणला जात आहे. आगामी काळात केंद्रीय भंडार, एनसीसीएफ आणि राज्य सरकारांसाठी देखील याबाबत काम केलं जाणार आहे.

पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या शेतातील कांद्याचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळेच सध्या बाजारात कांद्याचे दर (Onion Price) सातत्याने वाढत आहेत. नवरात्रीत उत्तर भारतासह देशातील अनेक भागांमध्ये कांदा खाल्ला जात नाही. यामुळे कांद्याची मागणी घटते. मात्र, असं असतानाही यंदा कांद्याच्या किमतीत कोणतीही घट झालेली नाही. मुंबईच्या बाजारात कांदा 67 रुपये प्रति किलो, चेन्नईत 73 रुपये, दिल्लीत 51 रुपये आणि कोलकात्यात 65 रुपये प्रति किलो आहे.

हेही वाचा :

परदेशातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात, जेएनपीटी बंदरात 600 टन कांदा दाखल

कांदा आयात केल्यास केंद्र व राज्यातील मंत्र्यांना फिरकू देणार नाही, शेतकरी संघटनेचा इशारा

Ban On Onion Export | निर्यातबंदी उठेपर्यंत कांद्याचा लिलाव बंदच, केंद्र सरकारविरोधात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा

Government relaxes important norms for onion import to reduce prices

Follow Us
मनीषा कायंदे यांचा संजय राऊतांवर घणाघात; शिंदेंची बाजू घेत सुनावलं...
Manisha Kayande On Sanjay Raut | संजय राऊतांसारखा बोगस माणूस भारतात दिसला नाही! मनीषा कायंदेंचा घणाघात; शिंदेंची बाजू घेत राऊतांना सुनावलं
अमरावती आश्रमशाळा वसतीगृहात 48 ऐवजी 110 मुली एका खोलीत
अमरावती आश्रमशाळा वसतीगृह: क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थिनी, जीवाशी खेळ सुरु
सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला,आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर
नांदेडमध्ये सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला: एटीएसकडून तपास सुरु, आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर छापा
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस राहणार बंद
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस बंद
मोठी बातमी! एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य
एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य: गांजा सेवनानंतर कठोर निर्णय
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ: परिवहन विभागाचा निर्णय
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी