AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांच्या पदरी निराशा, पावसामुळे कापूस वाळवत ठेवण्याची वेळ

धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कपाशी पिकाचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांना कापूस वाळत ठेवण्याची वेळ आहे. (Heavy rain in Dhule district)

शेतकऱ्यांच्या पदरी निराशा, पावसामुळे कापूस वाळवत ठेवण्याची वेळ
| Updated on: Oct 01, 2020 | 6:41 PM
Share

धुळे : वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील कपाशी पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना कापूस वाळवत ठेवण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील कापडणे गावासह संपूर्ण खानदेशात अतिवृष्टी झाल्याने सगळीकडे सारखीच परिस्थिती आहे. (Heavy rain along with hurricanes in Dhule district casuses bad effect on cotton farming)

कपाशी पीक पूर्णपणे भिजले, उन्हात वाळवत ठेवल्यास भाव कमी

पावसामुळे कापूस भिजल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. कापसाची फुटलेली बोंडे खराब झाली आहेत. ओला कापूस व्यापारी घेत नाहीत आणि काढलेला कापूस उन्हात वाळवत ठेवला, तर कापसाचे वजन कमी होते. त्यामुळे शेतकरी दुहेरी कात्रीत सापडल्याचे चित्र आहे. मागच्या वर्षीही पावसाळी हंगामाच्या शेवटी आणि परतीच्या पावसाने खानदेशात हाहा:कार माजवला होता. खरीप हंगामात पेरणी केलेल्या पिकांची नासधूस झाली होती. या वर्षी सुद्धा अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती सारखीच आहे.

हे ही वाचा : धुळे जिल्ह्याची कोव्हिड 19 लढाईत सर्वोत्कृष्ट कामगिरी, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडून अभिनंदन

कोरोना आणि अतिवृष्टीमुळे पिकांच्या कापणीला विलंब

देशात कोरोना संसर्गामुळेही शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. कोरोनाकाळात शेतीसाठी लागणारी औषधं, खतांची दुकानं बंद होती. परिणामी शेतकऱ्यांना वेळेवर फवारणी, खत पेरणी करता आला नाही. धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी तर खत आणि औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला. परिणामी शेतकऱ्यांना खत, औषधी चढ्या भावाने खरेदी करावी लागली. शेतकरी कोरोना संकटातून सुटतो न सुटतो तोच, अतिवृष्टीसारख्या अस्मानी संकटात तो सापडला. हाताशी आलेल्या पिकाला शेतकऱ्यांना मुकावे लागले. मोठा फटका सहन करावा लागला.

दरम्यान, धुळे जिल्ह्यात खरीप हंगामात कापसाची सर्वात जास्त लागवड झाली आहे. निसर्गराजा या वर्षी तरी साथ देईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. प्रत्यक्षात मात्र, धुळे जिल्ह्यातील शेतकरी कोरोना आणि अतिवृष्टीमुळे दुहेरी संकटाला तोंड देत आहेत. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करुन, लवकरात लवकर विम्याचा लाभ द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

संबंधित बातम्या :

Heavy Rain | धुळे, नंदुरबारमध्ये जोरदार पाऊस; अनेक सखल भागात गुडघाभर पाणी

Dada Bhuse | मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान – कृषीमंत्री दादा भुसे

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करा, भाजप आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

(Heavy rain along with hurricanes in Dhule district casuses bad effect on cotton farming)

Follow Us
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.