कोरोनाची परिस्थिती निवळल्याशिवाय कॉलेज सुरु होणार नाहीत : उदय सामंत

शहरी भागात ही जबाबदारी महापालिकेवर असणार आहे," असेही उदय सामंतांनी नमूद केले. (Uday Samant On College Reopen After Covid Pandemic)

कोरोनाची परिस्थिती निवळल्याशिवाय कॉलेज सुरु होणार नाहीत : उदय सामंत
. राज्यात महाविकासआघाडीची सत्ता आल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांनी पक्षप्रमुख असताना जी भूमिका घेतली तीच भूमिका मुख्यमंत्री झाल्यावरही कायम आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले.
Follow us
| Updated on: Oct 06, 2020 | 12:53 PM

पुणे : “राज्यातील कोरोनाचा प्रसार किती होतो आहे, यावर कॉलेज सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल. कोरोनाची परिस्थिती पूर्ण निवळल्याशिवाय राज्यातील कॉलेज सुरु होणार नाही,” अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. (Uday Samant On College Reopen After Covid Pandemic)

केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी देशभरातील शाळा उघडण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे. येत्या 15 ऑक्टोबरपासून देशातील शाळा उघडण्यासाठी केंद्र सरकारने अनलॉकअंतर्गत हिरवा कंदील दाखवला आहे. त्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांना कॉलेज सुरु करण्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा उदय सामंत यांनी ही माहिती दिली.

“पुण्यात एकूण अडीच लाख विद्यार्थी अंतिम वर्षाची परीक्षा देणार आहेत. त्यापैकी दोन लाख विद्यार्थी हे ऑनलाईन परीक्षा देणार आहेत. तर 50 हजार विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देतील,” अशी माहितीही उदय सामंत यांनी दिली.

“जे 50 हजार विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देणार आहेत. त्या सेंटरवर सॅनिटायझेशन केलं जाईल. ग्रामीण भागात ही जबाबदारी जिल्हा परिषदेवर असेल. तर शहरी भागात ही जबाबदारी महापालिकेवर असणार आहे,” असेही उदय सामंतांनी नमूद केले.

“सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करुन आम्ही परीक्षा घेतो आहे. युजीसीने जर आम्हाला मे महिन्यात परीक्षा घ्यायला सांगितली असती, तर आम्ही मेमध्येही परीक्षा घेतली असती,” असेही ते म्हणाले.

ग्रंथालयही सुरु करण्याचे प्रयत्न

“तसेच अंतिम वर्षातील दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी 20 मिनिटं वेळ वाढवून दिला जाणार आहे. त्यामुळे एकाही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही. तसेच येत्या काही दिवसात ग्रंथालयही सुरु करण्याचे प्रयत्न केले जात आहे. यासंदर्भात एक बैठकही पार पडली आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केलं.

“मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारने स्पष्ट भूमिका मांडली आहे. सरकारने दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. आरक्षणाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल,” असेही उदय सामंत म्हणाले. (Uday Samant On College Reopen After Covid Pandemic)

संबंधित बातम्या : 

कोरोनामुळे विधिमंडळ कर्मचाऱ्यांवर ‘कुणी घर देता का घर’ म्हणण्याची वेळ

फी न भरल्याने परीक्षेला बसू देण्यास नकार; कल्याणच्या ‘प्रतिष्ठित’ शाळेतील प्रकार

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.