AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कटला, रोहू, मृगळ, तलावातील 6 टन मासे चोरीला, महाराष्ट्रात अजब चोरीचा प्रकार

4 ते 5 लाखांचे किमतीचे तब्बल 6 टन मासे चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नाशिकमधील येवला तालुक्यातील नायगावमध्ये हा प्रकार घडला आहे. (lasalgaon fishes stolen)

कटला, रोहू, मृगळ, तलावातील 6 टन मासे चोरीला, महाराष्ट्रात अजब चोरीचा प्रकार
| Updated on: Jan 13, 2021 | 3:53 PM
Share

नाशिक : आतापर्यंत सोने, चांदी आणि इतर मौल्यवान दागीने चोरीला गेल्याच्या घटना आपण ऐकल्या आहेत. मात्र, 4 ते 5 लाख किमतीचे तब्बल 6 टन मासे चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नाशिकमधील येवला तालुक्यातील नायगावमध्ये हा प्रकार घडला. (in lasalgaon 6 ton fishes has been stolen from lake)

मिळालेल्या माहितीनुसार नायगाव येथील ग्रामपंचायतीतर्फे मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून एक वर्षाच्या कालावधीसाठी पाझर तलावाचा लिलाव करण्यात आला होता. यावेळी लिलावात प्रशांत पानपाटील यांनी पाझर तलाव 20 हजार रुपयांच्या किमतीमध्ये एक वर्षाच्या कालावधीसाठी घेतला. या तलावात त्यांनी मत्यव्यवसाय करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी तलावात रोहू, मृगळ, कटला आणि कोंबडा या जातींचे मत्स्यबीज सोडले. त्यांच्यासोबत आणखी एक भागीदार होता. त्यानेसुद्धा पानपाटील यांच्यासोबत गुंतवणूक केली होती. दोखांनी मिळून 2 लाखांचे भांडवल गुंतवले होते.

व्यवसायात चांगले उत्पन्न मिळावे म्हणून त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यांच्या मेहनतीला चांगले फळ आले. तलावात सोडलेल्या माशांच्या बिजामधून एक ते अर्धा किले वजनाचे मासे तयार झाले. मात्र, पानपाटील एका कामानिमित्त बाहेर गेले असता काही चोरट्यांनी येऊन तळ्यातील सुमारे 5 ते 6 टन मासे रात्रीतून चोरून नेले. दरम्यान, या चोरीमुळे युवकांचे 4 ते 5 लाखांचे नुकसान झाले आहे. ही चोरी कोणी केली असेल याचा अंदाज बांधण्यात येतोय. मात्र, अद्याप कुणाचे नाव समोर आले नाही.

इंदापूर तालुक्यात माशांचा भावात वाढ

हिवाळा सुरु झाल्यामुळे राज्यात थंडी जाणवत आहे. पुण्यातील उजणी धरणातील पाणीसुद्धा थंड झाल्यामुळे येथील मच्छीमारांना मासेमारी करण्यास अडचण येत आहे. उजनी धरणामुळे इंदापूर तालुक्यात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावलेला आहे. राज्यात गोड्या पाण्याची सर्वात मोठी मासेमारी याच धरणात होते. त्यामुळे इंदापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा मासळी व्यवसाय मोठ्या प्रमाणात विस्तारलेला आहे. मात्र, आवक घटलेली असताना, ग्राहकांकडून मागणी वाढल्याने माशांचे भाव वधारले आहेत.

संबंधित बातम्या :

मत्स्यप्रेमींना हवाहवासा ‘जिताडा’ उरणमध्ये सापडला, 35 किलोच्या माशाची किंमत ऐकून थक्क व्हाल!

उल्हासनगर मच्छी मार्केटवर पालिकेची धडक कारवाई, गळ्यावर सुरा ठेवून विक्रेत्याचा विरोध

उजनी धऱण थंडीने गारठले, माशांच्या भावात वाढ; थंडी आणि दरवाढीचा काय संबंध?

(in lasalgaon 6 ton fishes has been stolen from lake)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.