AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणेकरांसाठी खूशखबर, खडकवासाला धरण भरले

गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहर तसेच जिल्ह्यात चांगलाच पाऊस पडत आहे. यामुळे पुण्यातील खडकवासला धरणातील पाणी साठ्यात चांगलीच वाढ झाली असून, खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे.

पुणेकरांसाठी खूशखबर, खडकवासाला धरण भरले
| Updated on: Jul 28, 2019 | 2:43 PM
Share

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहर तसेच जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातील पाणीपातळीत वाढ होत आहे. दरम्यान पुण्यातील खडकवासला धरणातील पाणी साठ्यात चांगलीच वाढ झाली असून, खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे.

टेमघर, खडकवासला, पानशेत आणि वरसगाव या चार प्रमुख धरणांमधून पुण्याला पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून राज्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुण्याच्या धरण क्षेत्रात पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. पुण्याच्या चारही धरण क्षेत्रात सरासरी 66.59 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

सततच्या पावसामुळे खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे तब्बल 5 हजार 136 पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसेच खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने मुठा नदीला पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. त्याशिवाय पुण्यातील भिडे पुलाला लागून पाण्याचा प्रवाह होत आहे. सतत पाण्याचा विसर्ग सुरु राहिल्यास भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणांमधील खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. तर पानशेत धरण 74.49 टक्के, वरसगाव 58. 88 टक्के आणि टेमघर 52.3 टक्के भरले आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.