आता कोल्हापूर-रत्नागिरी हाकेच्या अंतरावर, काजिर्डा घाटाने मोठा प्रवास टळणार!

काजिर्डा घाट ( Kajirda) या नव्या रस्त्यामुळे अवघड वळणाचा घाट वाचणार आहे. नवा घाट एकदम सोपा आहे, वळणं नाहीत. त्यामुळे तब्बल तासाभराचा प्रवास आणि 20 ते 30 किमी प्रवास वाचणार आहे.

आता कोल्हापूर-रत्नागिरी हाकेच्या अंतरावर, काजिर्डा घाटाने मोठा प्रवास टळणार!
Kolhapur Ratnagiri Kajirda ghat
Follow us
| Updated on: Mar 10, 2021 | 5:38 PM

रत्नागिरी : पश्चिम महाराष्ट्र ( Western Maharashtra) आता कोकणाच्या ( Konkan ) आणखी जवळ येणार आहे. कारण, एका घाटमार्गाने कोल्हापूर ( Kolhapur) आणि रत्नागिरीतील ( Ratnagiri ) अंतर कमी केलं जातंय. हा रस्ता गगनबावडा, भुईबावडा आणि अणुस्कुरा घाटालाही पर्याय ठरणार आहे. या नव्या घाटाचं नाव आहे, काजिर्डा घाट ( Kajirda) या नव्या रस्त्यामुळे अवघड वळणाचा घाट वाचणार आहे. नवा घाट एकदम सोपा आहे, वळणं नाहीत. त्यामुळे तब्बल तासाभराचा प्रवास आणि 20 ते 30 किमी प्रवास वाचणार आहे. (Kolhapur-Ratnagiri distance will be reduced after Kajirda Ghat )

रत्नागिरीतल्या राजापूरमध्ये अतिदुर्गम परिसरात वसलेलं काजिर्डा गाव. कोल्हापूर जिल्हा यांना हाकेच्या अंतरावर. पण प्रशासनाच्या लालफितीने हाकेचं अंतर काही मैलाचं झालं. रस्ता व्हावा यासाठी 1977 पासून हे गावकरी धडपडत आहेत. मात्र, कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाला हा आवाज कधी ऐकूच आला नाही. त्यामुळेच आता गावकऱ्यांनी एकजुटीची तलवार उपसली आणि घाटरस्ता करण्याचे प्रयत्न सुरु झाले. मनसेची शॅडोकॅबिनेट मदतीसाठी पुढं आली आहे.

तब्बल 60 गावं जोडणार

काजिर्डा गावातून हा रस्ता थेट जातो कोल्हापुरातल्या बाजार भोगावमध्ये. हे अंतर आहे केवळ 20 ते 25 किलोमीटरचं. हा रस्ता झाला तर कोल्हापुरातील तब्बल 60 गावं थेट रत्नागिरीला जोडले जातील. 1977 ला हा घाट फोडण्यात आला, पण रस्ता कुणी केला नाही. त्यामुळेच आता सरकारी निधीची वाट न पाहता, ग्रामस्थांनीच लोकवर्गणीतून निधी जमा केला. तर मनसेच्या शॅडोकॅबिनेटकडून रस्ता बनवण्यासाठी अत्याधुनिक मशिनरी दिली जाणार आहेत.

वेळ वाचणार

हा रस्ता झाला तर सर्वात कमी वेळात कोल्हापुरातून कोकण आणि कोकणातून कोल्हापूर गाठता येईल. शिवाय, शेतमालाची ने-आणही सोपी होईल. इतर घाटांपेक्षा हा घाट सोपा असल्याने दुर्घटनांचं प्रमाणही कमी होईल असं गावकरी सांगतात. त्यामुळं येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी हा घाट सुरु झाला, तर अनेक गावं विकासाच्या महामार्गावर येतील.

संबंधित बातम्या 

फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? कोकणातल्या ‘या’ पर्यटनस्थळांना नक्की भेट द्या!

(Kolhapur-Ratnagiri distance will be reduced after Kajirda Ghat )

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.