AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? कोकणातल्या ‘या’ पर्यटनस्थळांना नक्की भेट द्या!

बरेच लोक फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतील. अशावेळी सगळ्यांच्या यादीत पहिल्याक्रमांकावर असते नाव म्हणजे ‘कोकण’.

फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? कोकणातल्या ‘या’ पर्यटनस्थळांना नक्की भेट द्या!
| Updated on: Dec 22, 2020 | 10:44 AM
Share

मुंबई : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपल्यापैकी अनेकांनी सुट्ट्या घेतल्या असतील. बरेच लोक तर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतील. अशावेळी सगळ्यांच्या यादीत पहिल्याक्रमांकावर असते नाव म्हणजे ‘कोकण’. काही लोकांचं आजोळ, तर काहींच्या मामाचं गावं… कोकणात फिरण्यासाठी मुळात कुठल्याही कारणाची गरज भासत नाही. पण, बऱ्याचदा कोकणातील पर्यटन स्थळे नक्की कोणती, तिथे कसं जायचं, कुठे फिरायचं, असे अनेक प्रश्नही पडतात (Vacation trip destination near kokan).

कोकणाला खरं तर महाराष्ट्रातील ‘कॅलिफोर्निया’ असे म्हटले गेले आहे. इथले समुद्रकिनारे, शुद्ध हवा, परिसर, हिरवळ या सगळ्याने मन प्रसन्न होऊन जाते. इतकंच नाही कोकणातल्या शुद्ध हवामानामुळे तब्येतही चांगली होते. इथली हवाच निराळी आहे. त्यामुळे रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून सुटका हवी असेल, तर कोकण सहल ही वर्षातून किमान एकदा तरी करायलाच हवी…

तारकर्ली :

कोकणात आल्यानंतर सर्वात जास्त ओढ लागते ती समुद्रकिनाऱ्यांची! त्यातही कोकणामध्ये आता तारकर्लीचा समुद्रकिनारा हा खूपच प्रसिद्ध झाला आहे. याचे कारण म्हणजे, या समुद्रकिनाऱ्यावर स्कुबा डायव्हिंग आणि अन्य वॉटर स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटीही सुरू करण्यात आल्या आहेत. कोकणातील सर्वच समुद्रकिनारे हे अतिशय स्वच्छ आहेत आणि त्यामध्ये तारकर्लीचा समुद्रकिनारा हा अग्रक्रमावर आहे असं म्हटलं जातं. या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनचे दर्शनही होते. खास डॉल्फिन बघण्यासाठीही अनेक जण कोकण सहल काढताना तारकर्लीच्या समुद्रकिनाऱ्याला मुद्दाम भेट देतात.

कसे पोहोचाल? : मडगाव स्टेशनला उतरून रिक्षा अथवा एसटीने तारकर्लीला पोहचू शकता.

रत्नदुर्ग किल्ला :

रत्नागिरीपासून साधारण दोन ते तीन किलोमीटरवर असणारा ‘रत्नदुर्ग’ किल्ला पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. इथे असलेलं भगवती देवी मंदिर प्रसिद्ध आहे. इथे एक भुयारी मार्गदेखील आहे. इथे येणारे पर्यटक इथल्या विहंगम दृष्यामुळे मोहून जातात. हा किल्ला समुद्राच्या काठावरील असणाऱ्या डोंगरावर बांधण्यात आला आहे. किल्ल्याच्या पाथथ्याशीच मिरकरवाडा हे बंदर आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतला होता.

कसे पोहोचाल? : रत्नागिरी रेल्वे स्थानकापासून रिक्षा (Vacation trip destination near kokan)

आरे वारे समुद्रकिनारा :

रत्नागिरीच्या अनेक समुद्रकिनाऱ्यांपैकी एक असणारा ‘आरे वारे बीच’ हा अतिशय स्वच्छ आणि शांत समुद्रकिनारा म्हणून प्रसिद्ध आहे. इथे मनाला मिळणारी शांतता आणि स्वच्छपणा हा पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. दोन्ही बाजूला डोंगर आणि मधोमध समुद्र, असा मनमोहक निसर्गाचा नजारा इथे पाहायला मिळतो. आरे वारेच्या समुद्रकिनाऱ्याला आता बरेच पर्यटक भेट देऊ लागले आहेत.

 कसे पोहोचाल? : रत्नागिरीवरून रिक्षा अथवा एसटी

थिबा राजवाडा :

कोकणात समुद्रकिनाऱ्यांपासून ते राजवाड्यापर्यंत सर्वकाही पाहण्यासारखे आहे. मुळातच कोकणाला एक इतिहास लाभला आहे. त्यापैकीच एक ऐतिहासिक स्थळ म्हणजे ‘थिबा राजवाडा’. रत्नागिरीमध्ये हा थिबा राजवाडा असून यामध्ये एक वस्तुसंग्रहालय देखील आहे. आताचे म्यानमार अर्थात पूर्वीच्या ब्रम्हदेशाच्या ‘थिबा मिन’ राजाला येथे नजरकैदेत ठेवण्यात आले होते. थिबाने वापरलेल्या अनेक गोष्टी येथे जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत. हा राजवाडा ब्रिटिशांनी बांधलेला असून, आता पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.

कसे पोहोचाल? : रत्नागिरी स्टेशनवरून रिक्षा

(Vacation trip destination near kokan)

हेही वाचा :

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.