AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुलवामा हल्ल्याचा बदला कसा घ्यायचा? लेफ्टनंट जनरल निंभोरकर म्हणतात…

पुणे : लोकभावना जरी तीव्र असल्या तरी घाईत कुठलाही निर्णय घेता येणार नाही, शत्रूला गाफील ठेवून कारवाई करण्याची गरज असून, भारताला पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करता येणार नाही, असे मत लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी मांडले. निंभोरकर यांनी 2016 साली सर्जिकल ट्राईक्स यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर नेमके काय म्हणाले? […]

पुलवामा हल्ल्याचा बदला कसा घ्यायचा? लेफ्टनंट जनरल निंभोरकर म्हणतात...
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:26 PM
Share

पुणे : लोकभावना जरी तीव्र असल्या तरी घाईत कुठलाही निर्णय घेता येणार नाही, शत्रूला गाफील ठेवून कारवाई करण्याची गरज असून, भारताला पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करता येणार नाही, असे मत लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी मांडले. निंभोरकर यांनी 2016 साली सर्जिकल ट्राईक्स यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर नेमके काय म्हणाले?

“लोकभावना जरी तीव्र असल्या तरी घाईत कुठलाही निर्णय घेता येणार नाही, शत्रूला गाफील ठेवून कारवाई करण्याची गरज असून, भारताला पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करता येणार नाही.” असे लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर म्हणाले. तसेच, बदला घेण्याची वेळ मात्र नक्की आली असून त्यासाठी योग्य निर्णय घेण्याची गरज असल्याचंही निंभोरकर म्हणाले.

एवढ्या मोठ्या प्रमाणात साठा येण्यासाठी स्थानिकांची नक्कीच मदत असणार आहे. तसेच हे काही गुप्तचर यंत्रणांचे अपयश आहे असं म्हणता  येणार नाही, असंही निंभोरकर यांनी यावेळी सांगितले.

पाकिस्तानचा मोस्ट फेवरबेल नेशनचा दर्जा काढून पाकिस्तानला काही फरक पडणार नाहीय. त्यांच्याविरोधात आणखी काय कारवाई करता येईल, यावर विचार होण्याची गरज आहे. मात्र बदला जरुर घ्यावा, असं लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी म्हटलं.

पुलवामा हल्ला

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Pulwama Attack) जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) मोठा दहशतवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे जवळपास 40 जवान शहीद झाले. दहशतवाद्यांनी हायवेवर उभ्या असलेल्या एका गाडीमध्ये आयईडी स्फोट केला आणि त्यानंतर सीआरपीएफच्या ताफ्यावर फायरिंग सुरु केली. सीआरपीएफच्या वाहनामध्येही आयईडी ब्लास्ट करण्यात आल्याची माहिती आहे. काही जवान जागेवरच शहीद झाले, तर काही जवानांना उपचारासाठी नेताना ते शहीद झाले. ज्या ताफ्यावर हल्ला झाला, त्या ताफ्यामध्ये अडीच हजार जवान होते.

पुलवामा हल्ल्याचा भारताने बदला घ्यावा, अशी जनभावना प्रकट होते आहे. त्यामुळे सरकार काय पावलं उचलतं आहे, याकडे देशवासियांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं