AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची महापूजा, बळीराजाला सुखी करण्याचं साकडं

आषाढी एकादशी निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये महापूजा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विठुचरणी बळीराजाला सुखी करण्याचं साकडं घातलं

मुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची महापूजा, बळीराजाला सुखी करण्याचं साकडं
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 12, 2019 | 9:02 AM
Share

पंढरपूर : आषाढी एकादशी निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये महापूजा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विठुचरणी बळीराजाला सुखी करण्याचं साकडं घातलं. त्यांच्याबरोबर पांडुरंगाची महापूजा करण्याचा मान लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्याचे विठ्ठल मारुती चव्हाण आणि त्यांची पत्नी प्रयाग विठ्ठल चव्हाण या दामप्त्याला  मिळाला.

महापुजेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी विठ्ठलाची पूजा करायला मिळाल्याबद्दल मंदिर समितीचे आभार मानले. तसेच 2 वर्षांमध्ये मंदिर समितीने खूप चांगले काम केल्याचे म्हणत समितीच्या कामाचे कौतुकही केले. फडणवीस म्हणाले, “वारीच्या निमित्ताने सकारात्मक शक्तीचा अविष्कार पाहायला मिळतो. आमच्या संस्कृतीला जिवंत ठेवण्याचं काम वारी आणि वारकऱ्यांनी केलं आहे.”

‘नामामी चंद्रभागा हा मोठा कार्यक्रम हातात घेतला’

“निर्मल वारीला वारकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. नामामी चंद्रभागा हा मोठा कार्यक्रम हातात घेतला आहे. येत्या काळात चंद्रभागा पूर्वीसारखी निर्मल पाहायला मिळेल. देवाच्या दारी काही मागावं लागत नाही, पण मी विठुरायाला महाराष्ट्राला सुजलाम, सुफलाम करण्याची दुष्काळ मुक्ती निसर्गाचा लाभ देण्याची आणि बळीराजाला सुखी करण्याची मागणी केली आहे”, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

‘विठ्ठलरूपी जनता देखील पुन्हा 5 वर्षांसाठी सेवा करण्याची संधी देईल’

यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी मागील वर्षीच्या महापूजा वादावरही भाष्य केले. ते म्हणाले, मागील वर्षी विठुरायाचा आदेश होता की मी फक्त पंढरपुरात नाही, तुमच्या मनातही आहे. त्यामुळे पूजा घरी केली. विठुरायांबरोबर जनतेचा आशिर्वाद मिळाला म्हणून सगळे काम करू शकलो.” पंढरपूरला पुन्हा पुन्हा यायची संधी मिळेल असा विश्वास व्यक्त करताना फडणवीसांनी विठ्ठलरूपी जनता देखील पुन्हा 5 वर्षांसाठी सेवा करण्याची संधी देईल, अशी आशा व्यक्त केली.

पंढरपूर महापूजेचे मानाचे वारकरी

विठ्ठल मारुती चव्हाण (61) आणि प्रयाग विठ्ठल चव्हाण हे लातूर जिल्ह्यातील सुनेगाव गांडा (तालुका – अहमदपूर) येथील रहिवासी आहेत. शेतकरी असलेले विठ्ठल चव्हाण 10 वर्षे  गावचे उपसरपंच राहिले आहेत. सध्या तंटामुक्त समितीचे सदस्य म्हणूनही ते काम करतात. ते 1980 पासून (39 वर्षांपासून) सलग वारी करतात. त्यांना 2 मुलं आणि एक मुलगी आहे. मुलीचं लग्न झालं आहे. दोन्ही मुलं पुणे येथे नोकरीस आहेत.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा