Maharashtra Corona Update: राज्यात दिवसभरात 6330 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 110 मृत्यू

राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच आहे. आज दिवसभरात राज्यात 6330 रुग्णांची नोंद झाली (Maharashtra Corona Updates).....

Maharashtra Corona Update: राज्यात दिवसभरात 6330 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 110 मृत्यू
Follow us
| Updated on: Jul 03, 2020 | 12:34 AM

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच आहे. आज दिवसभरात राज्यात 6330 रुग्णांची नोंद झाली (Maharashtra Corona Updates). यासह राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 86 हजार 626 पर्यंत पोहचली आहे. आज दिवसभरात 8 हजार 018 कोरोना बाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले. आतापर्यंत एकूण 1 लाख 1 हजार 172 रुग्णं बरे झाले आहेत. यासह बरं होणाऱ्यांचं प्रमाण 54.21 इतकं आहे.

दिवसभरात 125 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यातील 110 मृत्यू मागील 48 तासांमधील आहेत. तर उर्वरित 15 मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 4.38 टक्के इतका आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण 10 लाख 20 हजार 368 नमुन्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यापैकी 1 लाख 86 हजार 626 नमुने कोरोना पॉझिटीव्ह आले. हे प्रमाण 18.29 टक्के इतकं आहे. राज्यात सध्या 64 शासकीय आणि 50 खासगी अशा एकूण 114 प्रयोगशाळा कोविड 19 च्या चाचणीसाठी सुरु आहेत. सध्या राज्यात 5 लाख 72 हजार 032 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 41 हजार 741 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

कोरोना संबंधितीची अद्ययावत आकडेवारी :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

दरम्यान, राज्यात अनलॉक-2 ची घोषणा झाली. मात्र, राज्यात (Lockdown Extended In Maharashtra Districts) अनलॉक होताच त्याचा विपरित परिणामही दिसू लागला आहे. अनलॉकनंतर ‘कोरोना’ चा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नवी मुंबई, ठाणे, बीड महापालिकांनी पुन्हा लॉकडाऊन जाहीर केला आहे. तर, मुंबईतही नाईट कर्फ्यू आणखी कडक करण्यात आला आहे (Lockdown Extended In Maharashtra Districts).

राज्यातील अनेक महापालिकांनी त्यांच्या हद्दीत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. करोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी आणि प्रसाराची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात कुठे-कुठे लॉकडाऊन?

ठाणे, कल्याण-डोंबिवलीत 2 जुलै ते 12 जुलैपर्यंत कडक निर्बंध

ठाणे, कल्याण-डोंबिवली आजपासून पुढील दहा दिवस कडक निर्बंध असतील. आज (2 जुलै) सकाळी 7 वाजता सुरु झालेला लॉकडाऊन रविवार 12 जुलै सकाळी 7 वाजेपर्यंत राहील. सर्व हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊनची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.

पनवेल, नवी मुंबईतही लॉकडाऊन

इतर शहरांपाठोपाठ पनवेल, नवी मुंबईतही लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. 4 जुलै ते 13 जुलैपर्यंत नवी मुंबई आणि पनवेलमध्ये लॉकडाउन असणार आहे.

रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने मीरा-भाईंदरमध्ये पुन्हा लॉकडाऊन

मीरा भाईंदर शहराची लोकसंख्या जवळपास 15 लाख आहे. शहरात रुग्णसंखेत वाढ होत असल्याने मीरा-भाईंदरमध्ये पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. हा लॉकडाऊन 1 जुलै ते 10 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत 10 दिवस असणार आहे. यादरम्यान औषधांची दुकानं वगळता इतर सर्व दुकानं बंद असणार आहेत.

अहमदनगरमध्ये राहाता तालुक्यात लॉकडाऊन

कोरोनाची वाढती संख्या पाहाता अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील दाढ, रुई आणि कोल्हार या गावांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

बीडमध्ये आजपासून 7 दिवस कडकडीत बंद

बीड जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर असतानाच काल आणखी एक कोरोना रुग्ण नकळतपणे अनेक नागरिकांच्या संपर्कात आल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी आजपासून (2 जुलै) 7 दिवस बीड शहर कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत (Lockdown Extended In Maharashtra Districts).

मलकापूर, नांदुरा, मोताळ्यात 15 जुलैपर्यंत लॉकडाऊन

बुलढाणा जिल्ह्यामध्ये आजपर्यंत 253 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी मलकापूर उपविभागात 116 कोरोना रुग्ण आहेत. तर मलकापूर तालुका हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याधिकारी यांनी मलकापूर तालुका लॉकडाऊन करण्याचे आदेश दोन दिवसांपूर्वी दिले होते. तर आता नांदुरा आणि मोताळा तालुक्यात सुद्धा 15 जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.

अकोटमध्ये 3 ते 9 जुलैपर्यंत ‘जनता कर्फ्यू’

अकोला जिल्ह्यातल्या अकोट शहरात कोरोनाचं संक्रमण वाढत आहे. त्यामुळे पालकमंत्री बच्चू कडू यांनी 3 जुलै ते 9 जुलै दरम्यान शहरात जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. नागरिकांनी स्वतःहून यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.

भिवंडीत 18 जूनपासून लॉकडाऊन

भिवंडी महानगरपालिकेने 18 जूनपासूनच 15 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. या लॉकडाऊनला सुरुवातीच्या आठवड्यात चांगला प्रतिसाद मिळत असतानाच शेवटच्या 7 दिवसात परिस्थितीत शिथिलता आली. त्यानंतर शहरात बहुसंख्य ठिकाणी काही दुकाने उघडली, तर काही दुकाने बंद असल्याचे पहायला मिळाले.

सिंधुदुर्गात 2 जुलै ते 8 जुलै लॉकडाऊन

2 जुलै ते 8 जुलै या कालावधीत सिंधुदुर्गात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोना रुगणांची संख्या वाढू लागल्याने 7 दिवसांचा लॉकडाऊन असणार आहे. यादरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद राहणार आहेत. आपत्ती व्यवस्थापन कार्यालयं वगळता सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये दहा टक्केच कर्मचाऱ्यांची उपस्थिती असणार आहे.

रत्नागिरीत ‘ब्रेक द चेन पॅटर्न’खाली पुन्हा लॉकडाऊन

रत्नागिरी जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन पॅटर्न’खाली कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लॉकडाऊनचा आजचा दुसरा दिवस आहे. जिल्ह्यात कडक लॉकडाऊन पाळला जात आहे.

अक्कलकोटमध्ये ‘जनता कर्फ्यू’

अक्कलकोट शहरात येत्या 6 जुलै ते 13 जुलैपर्यंत ‘जनता कर्फ्यू’ पुकारण्याचा निर्णय अक्कलकोट शहरातील नागरिकांनी घेतला आहे.

चंद्रपूरमधील ब्रम्हपुरी शहरात 3 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरात 3 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

हेही वाचा :

पुण्यात महिनाभरात तब्बल 32 हजार परप्रांतिय मजूर, नागरिक दाखल, मेट्रोच्या कामावर 1 हजार मजूर

राजेश टोपे उल्लू बनवत आहेत, मनसेचा आरोप, राजीनाम्याची मागणी

Lockdown Extended | ठाणे, नवी मुंबई, बीड, राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यात लॉकडाऊन?

Maharashtra Corona Updates

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.