चंद्रपूर, गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्यासाठी सुमारे अडीच लाख निवेदने; मंत्रालयात हालचालींना वेग

गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून हालचाली सुरू होत्या. दोन्ही जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यासाठी राज्य सरकारकडे २ लाख ४० हजार अर्ज निवेदने आले होते.

चंद्रपूर, गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्यासाठी सुमारे अडीच लाख निवेदने; मंत्रालयात हालचालींना वेग
Follow us
| Updated on: Oct 01, 2020 | 12:55 PM

मुंबई: चंद्रपूर आणि गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्यासाठी राज्य सरकारकडे सुमारे अडीच लाख निवेदने आल्यानंतर या दोन्ही जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या संदर्भात काल मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठकही पार पडली असून दोन्ही जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Vijay Wadettiwar Wants lifting liquor ban in Chandrapur and Gadchiroli)

गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून हालचाली सुरू होत्या. दोन्ही जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यासाठी राज्य सरकारकडे २ लाख ४० हजार अर्ज निवेदने आले होते. तर दारूबंदी उठवू नये म्हणून अवघे २५ हजार निवेदने आले होते. त्यामुळे मंत्रालयात दारूबंदी उठवण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. काल मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून दोन्ही जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याबाबत विचार करण्यात आला असल्याचं मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. दोन्ही जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार असून ही समिती दीड महिन्यात कॅबिनेटसमोर अहवाल सादर करणार असल्याचंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.

दारूबंदी केल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात अैध दारूची विक्री वाढली होती. बनावट दारू प्यायल्याने अनेकांचा मृत्यूही झाला असून गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. त्यामुळे चंद्रपूर-गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्यासाठी वडेट्टीवार यांनी उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना २७ ऑगस्टला पत्र लिहून दारूबंदी उठवण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता या दोन्ही जिल्ह्याची दारूबंदी उठवण्यासाठी स्थापन करण्यात येणारी समिती काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Vijay Wadettiwar Wants lifting liquor ban in Chandrapur and Gadchiroli)

संबंधित बातम्या: 

चंद्रपूरची दारूबंदी : सरकारला महसूल महत्वाचा की नागरिकांचे आरोग्य?

विदर्भातील पूरग्रस्तांसोबत अन्याय, आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला तरी पानं पुसू नका : देवेंद्र फडणवीस

(Vijay Wadettiwar Wants lifting liquor ban in Chandrapur and Gadchiroli)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.