चिपळूणजवळ आणखी एका धरणाला गळती, गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

तिवरे धरण फुटून आठवडाही झाला नाही, त्यातच मारवणे धरणामुळे ग्रामस्थांची भीती आणखी वाढली आहे. जीवाच्या सुरक्षेसाठी भयभीत ग्रामस्थांकडून पहारा दिला जातोय.

चिपळूणजवळ आणखी एका धरणाला गळती, गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
Follow us
| Updated on: Jul 08, 2019 | 8:28 PM

रत्नागिरी : महाराष्ट्रातील धरणं खरंच सुरक्षित आहेत का, असा हा प्रश्न पुन्हा उपस्थित होतोय. कारण, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुणातील तिवरे धरणापाठोपाठ मोरवणे धरणालाही गळती लागली आहे. तिवरे धरण फुटून आठवडाही झाला नाही, त्यातच मारवणे धरणामुळे ग्रामस्थांची भीती आणखी वाढली आहे. जीवाच्या सुरक्षेसाठी भयभीत ग्रामस्थांकडून पहारा दिला जातोय.

संततधार पावसामुळे मोरवणे धरण भरलं आहे. विशेष म्हणजे तिवरे धरणापेक्षा तिप्पट क्षमतेचं हे धरण आहे. 2000 साली पाटबंधारे खात्याने धरण बांधलं होतं. पण फक्त 19 वर्षातच धरणाला गळती लागली आहे. धरणातील पाणी सांडव्यावरून वाहू लागल्याने धोका आणखी वाढलाय. तिवरे धरण दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग आली आहे. सकाळपासूनच अधिकाऱ्यांनीही धरणाची पाहणी करुन परिस्थितीचा आढावा घेतला.

जालना जिल्ह्यात धामणा धरणाची परिस्थिती

भोकरदन तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने भोकरदन तालुक्यातील धामणा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. धामणा धरणाच्या सांडव्याला मोठे तडे गेल्याने धामणा धरणाच्या भिंतीतून पाणी वाहू लागलंय. भिंतीला तडे गेल्यामुळे धरण फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. धरण क्षेत्रातील सांडव्यामध्येच 2 दशलक्ष घनमीटर पाणी साठा आहे. जिल्हा प्रशासनाकडून या धरणावर सातत्याने लक्ष ठेवलं जातंय.

रायगड जिल्ह्यातील धरणाला गळती

रायगड जिल्ह्यातील उमटे धरणाच्या सांडव्याच्या भिंतीचे दगड निखळल्याने सांडवा फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील हे धरण 1980 मध्ये बांधण्यात आलं होतं. धरणाची दुरूस्‍ती करावी अशी मागणी ग्रामस्‍थांनी केली आणि त्यासाठी सातत्‍याने पत्रव्यवहार केला. पावसाळयात सांडव्‍याची भिंत कोसळून दुर्घटना झाली तर खालील बाजूस असलेल्‍या 10 ते 12 गावांना धोका होऊ शकतो.

संबंधित बातम्या :

जालना जिल्ह्यातलं धरण फुटण्याची भीती, गावकऱ्यांचं स्थलांतर, NDRF अलर्टवर

शाहू महाराजांनी बांधलेलं राधानगरी धरण, 100 वर्षांनंतरही ना गळती, ना धोका

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.