AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्याचं एक थेंबही दूध शिल्लक राहणार नाही, दुग्धविकास मंत्र्यांची ग्वाही

दुधाचा एकही थेंब शिल्लक ठेवणार नाही, अशी ग्वाही दुग्धविकास मंत्री सुनील केदार (Minister Sunil Kedar) यांनी दिली आहे.

शेतकऱ्याचं एक थेंबही दूध शिल्लक राहणार नाही, दुग्धविकास मंत्र्यांची ग्वाही
| Updated on: Apr 01, 2020 | 6:22 PM
Share

वर्धा : राज्यात कोरोणा विषाणूंचा प्रादूर्भाव वाढल्यामुळे त्याचा फटका दुग्ध व्यवसायालाही बसत आहे. या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे पूर्ण दूध संकलित केले जाईल. दुधाचा एकही थेंब शिल्लक ठेवणार नाही, अशी ग्वाही दुग्धविकास मंत्री सुनील केदार (Minister Sunil Kedar) यांनी दिली आहे. सुनील केदार आज वर्धा जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी वर्ध्यात शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली (Minister Sunil Kedar).

“शेतकऱ्यांचा दुधाचा व्यवसाय विस्कळीत झाला आहे. हा व्यवसाय सुरळीत करण्यासाठी शासनाने पुढाकार घेत शिल्लक दुधाचे दूध पावडर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शासनाने 200 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शेतकरी आणि शेतमजूर तसेच विस्थापित मजुरांना प्राधान्य देऊन कुणीही उपाशी राहणार नाही यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे”, असं सुनील केदार म्हणाले.

सध्याच्या परिस्थितीत अडचणीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला धान्य पुरविण्याची जबाबदारी शासनाची आहे. या कठीण प्रसंगात शेतकरीही अडचणीत आहे. धान्य पिकवणारा एकही शेतकरी, शेतमजूर उपाशी राहणार नाही, याची जबाबदारी प्रशासन घेत आहे. प्रशासनाकडून शेतकऱ्यांना धान्य दिलं जाणार आहे. मात्र, इतर जिल्ह्यातील अडकलेल्या कामगारांकडे रेशन कार्ड नाही. या सर्वांना 2014 च्या अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत धान्य दिल जावं, अशी मागणी वर्ध्यातील सर्वसामान्यांकडून केली जात आहे.

राज्य सरकार दररोज 10 लाख लिटर दुधाची खरेदी करणार

“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांकडून दररोज 10 लाख लिटर दुधाची 25 रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करेल. येत्या चार-पाच दिवसात हे संकलन सुरु होईल आणि कोरोनाचा प्रादुर्भाव संपेपर्यंत पुढचे दोन महिने ही खरेदी सुरु राहील”, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात काल (31 मार्च) झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

संबंधित बातमी : शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, राज्यात दररोज 10 लाख लिटर दुधाची खरेदी करणार

Follow Us
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.