AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona | आईपासून पाच मुलांना कोरोना संसर्ग, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

कोरोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने झारखंडमधील एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

Corona | आईपासून पाच मुलांना कोरोना संसर्ग, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jul 21, 2020 | 5:39 PM
Share

रांची : संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणूच्या विळख्यात अडकलं आहे (Mother And Five Sons Died Due To Corona). कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मात्र, तरीही अनेकांना अद्यापही याचं गांभीर्य कळलेलं नाही. अजूनही अनेकजण कोरोनाच्या नियमांचं पालन करताना दिसत नाही. कोरोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने झारखंडमधील एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. झारखंड येथील कोयलानगरी धनबादमध्ये एका चुकीमुळे हसतं-खेळतं कुटुंब कोरोनाच्या विळख्यात अडकलं. या कुटुंबातील आईसह पाच मुलांचा कोरोनाने जीव घेतला आहे. केवळ 17 दिवसांच्या आत या कुटुंबातील सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू (Mother And Five Sons Died Due To Corona) झाला.

चौधरी कुटुंब कोरोनाच्या विळख्यात

धनबादच्या कतरासमध्ये राहणाऱ्या चौधरी कुटुंबासाठी कोरोना काळ बनला. कोरोनाने चौधरी कुटुंबातील सहा जणांचा बळी घेतला. झारखंडच्या रिम्समध्ये दाखल असलेल्या चौधरी कुटुंबातील पाच मुलांचा मृत्यू झाला. या कुटुंबात कोरोनामुळे पहिला मृत्यू 4 जुलैला झाला होता. या पाच मुलांच्या 90 वर्षीय आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

चौधरी कुटुंबातील सर्वात वृद्ध महिलेने कोरोनाच्या नियमावलीकडे दुर्लक्ष केलं. त्या 27 जूनला नातवाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी दिल्लीला गेल्या. दिल्लीवरुन परतल्यानंतर या 90 वर्षीय वृद्धेची तब्येत बिघडली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर या वृद्धेला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं. मात्र, उपचाराअंती 4 जुलैला या वृद्धेचा मृत्यू झाला (Mother And Five Sons Died Due To Corona).

आईच्या अंत्यसंस्कारावेळी ICMR च्या निर्देशांकडे दुर्लक्ष

कोरोनामुळे वृद्धेचा मृत्यू झाल्यानंतरही कुटुंबाने ICMR च्या निर्देशांचं पालन न करता सामान्य पद्धतीने अंत्यसंस्कार केले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आणखी पसरला. त्यामुळे या वृद्धेच्या मुलांनाही कोरोनाची लागण झाली.

कुटुंबाची कोरोना चाचणी करण्यात आली. तेव्हा मृत महिलेच्या दोन मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आणि उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. त्यानंतर महिलेच्या आणखी दोन मुलांना संसर्ग झाला. मात्र, या दोघांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर पाचव्या मुलालाही कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्याचाही मृत्यू झाला. या महिलेचा सहावा मुलगा सध्या दिल्लीमध्ये आहे.

Mother And Five Sons Died Due To Corona

संबंधित बातम्या :

Corona Community Spread | भारतात बिकट स्थिती, कोरोनाचा समूह संसर्ग सुरु, IMA चा दावा

Follow Us
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?