Lock Down | ‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’वर गर्दी, पोलिसांनी मार्ग रोखला

| Updated on: Mar 23, 2020 | 1:41 PM

राज्यात जमावबंदीचे आदेश देऊन 24 तासही (Mumbai Pune Express way closed) उलटले नसताना मुंबई-पुण्यातील अनेक लोक कामानिमित्ताने बाहेर पडले.

Lock Down | मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गर्दी, पोलिसांनी मार्ग रोखला
Follow us on

पुणे : राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस (Mumbai Pune Express way closed) वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लोकांनी ठिकठिकाणी गर्दी करु नये म्हणून जमावबंदीचे आदेशही देण्यात आले. पण मुंबई पुण्यात मात्र याउलट चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे, मुलुंड टोल नाका, सायन, नवी मुंबई यासह अनेक ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे बंद ठेवण्यात आला.

राज्यात जमावबंदीचे आदेश देऊन 24 तासही (Mumbai Pune Express way closed) उलटले नसताना मुंबई-पुण्यातील अनेक लोक कामानिमित्ताने बाहेर पडले. त्यामुळे अनेक टोलनाक्यांवर वाहनांची प्रचंड वाहनांची गर्दी पाहायला मिळाली.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे बंद

जमावबंदीमुळे सर्व सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांनी खाजगी वाहनाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे. तर टोल नाक्यावर मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहे. यात सर्वाधिक खासगी वाहन आहेत.

याच पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. दोन्ही प्रवेशद्वारावर बॅरेकेट्स लावून एक्सप्रेस वे वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईहून पुण्यात लोकांनी येऊ नये यासाठी हा महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळत आहे.

दरम्यान पुणे शहरात जमावबंदीचे आदेश असतानाही मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर फिरत आहे. त्यामुळे पुण्यातील रस्त्यांवर गर्दी होत आहे. त्यामुळे पुणे पोलिसांकडून दुपारी 3 वाजल्यांपासून शहरातील वाहन बंदी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत पोलीस प्रशासनाची महत्वाची बैठक सुरु आहे.

मुलुंड टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

तर ठाणे-कल्याणमधील अनेक लोक मुंबईच्या दिशेने खासगी वाहनांनी निघाले. त्यामुळे मुलुंड टोलनाक्यावर सकाळच्या सुमारास प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. मुलुंड टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या.

दरम्यान ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कळंबोलीमध्ये ट्राफिक पोलिसांनी वाहतूक अडवली. मुंबईहून पुणे आणि पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक कंळबोलीमध्ये अडवण्यात आली.

टोलनाक्यांवरील गर्दी कमी करण्याचे आदेश

मात्र मुंबई पोलिसांनी सजग राहत जे लोक अत्यावश्यक सेवेचा भाग आहेत, त्यांनाच मुंबईच्या दिशेने सोडत आहेत. तर इतर गाड्यांना परत माघारी पाठवत आहे. मुंबईतील सर्व टोलनाक्यांवरील गर्दी लवकरात लवकर कमी करण्याचे आदेश देण्यात आल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी (Mumbai Pune Express way closed) सांगितलं.