AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेतीमाफियांमुळे शेतकरी देशोधडीला, प्रशासनाची डोळेझाक

रेतीमाफियांमुळे शेतकरी देशोधडीला लागल्याचा प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला आहे. उमरी तालुक्यातील राहाटी इथल्या रेतीच्या धक्क्यावर प्रचंड असा रेती उपसा सुरु आहे.

रेतीमाफियांमुळे शेतकरी देशोधडीला, प्रशासनाची डोळेझाक
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jun 09, 2019 | 3:27 PM
Share

राजीव गिरी, टीव्ही 9 मराठी, नांदेड : सध्या राज्यात भीषण दुष्काळ आहे. अशा परिस्थितीतही अनेक शेतकऱ्यांनी पोटच्या लेकरासारखं पीक वाढवण्याच काम केलं. मात्र, रेतीमाफियांमुळे शेतकरी देशोधडीला लागल्याचा प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला आहे. उमरी तालुक्यातील महाटी इथल्या रेतीच्या धक्क्यावर प्रचंड असा रेती उपसा सुरु आहे. बेकायदेशीरपणे जेसीबी मशीनचा वापर करत रात्रंदिवस इथून प्रचंड प्रमाणात रेती उपसल्या जात आहे.

रेतीचा उपसा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या नदी पात्रातील असलेल्या छोट्या-छोट्या विहिरी रेतीमाफियांनी जबरदस्तीने बुजवून टाकल्या आहेत. रेतीमाफियांची दादागिरी आणि मारण्याच्या धमक्या देऊन शेतकऱ्यांच्या नदीपात्रातील मोटारीही काढून फेकल्या आहेत. या प्रकारामुळे पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिके वाळून गेली आहेत. शेतकऱ्यांनी इतक्या भीषण दुष्काळात मोठ्या कष्टाने जगवलेला ऊस नष्ट होतो आहे.

या शेतकऱ्यांनी रेतीमाफियांच्या दादागिरीची तक्रार प्रशासनाकडे केली. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या रेती माफियाचा एक छुपा पार्टनर अधिकारी असल्याने त्याला शासकीय पाठबळ मिळत आहे. मुळात 2871 ब्रास रेतीचा उपसा करावा यासाठी या रेती घाटाचा लिलाव करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात या घाटावरून आतापर्यंत पन्नास हजाराहून अधिक ब्रास रेती काढून नेल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली.

रेतीच्या या अवैध उपसामुळे नदीपात्रात असलेलं पाणीही संपलं आहे. त्यातच आता पावसाळा लांबत चालल्याने ऊसाचं पीक वाचवावे कसं, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. रेतीमाफियाला जिल्हा प्रशासनाने मोकाट सोडल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय. विशेष म्हणजे या सर्व प्रकाराची औरंगाबाद इथल्या विभागीय आयुक्तांनी दखल तर घेतली. मात्र, नांदेड आणि उमरिच्या प्रशासनाने डोळेझाक केल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जाते आहे. या रेतीच्या घाटातून प्रशासनाला मिळणाऱ्या महसुलातून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. नांदेडच्या प्रशासनाकडून काहीच अपेक्षा नसल्याने नुकसानग्रस्त शेतकरी महसूलमंत्र्याची भेट घेणार आहेत.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा