AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांनो सावध व्हा! दुष्काळाचं महासंकट घोंगावतंय, हवामानाच्या नव्या अंदाजाने चिंता वाढली

Maharashtra Vidarbha Drought : विदर्भावर पावसाच्या तुटीचे संकट अधिक गडद झाले असून, ऑगस्ट महिन्यात अपेक्षेच्या तुलनेत तब्बल 58 टक्के कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

शेतकऱ्यांनो सावध व्हा! दुष्काळाचं महासंकट घोंगावतंय, हवामानाच्या नव्या अंदाजाने चिंता वाढली
IMD Rain short stats farmer worriedImage Credit source: Google
| Updated on: Sep 01, 2026 | 11:48 PM
Share

राज्यासह विदर्भातील शतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. विदर्भावर पावसाच्या तुटीचे संकट अधिक गडद झाले असून, ऑगस्ट महिन्यात अपेक्षेच्या तुलनेत तब्बल 58 टक्के कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी शेतीसह आगामी काळातील जलसाठ्यांवरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यात संपूर्ण विदर्भात सरासरी 297 मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता. मात्र, प्रत्यक्षात केवळ 125 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात विदर्भातील पावसाची तूट तब्बल 58 टक्क्यांवर पोहोचली आहे. यामुळे दुष्काळाचं महासंकट उभे राहण्याची शक्यता आहे.

अकोल्याला सर्वाधिक फटका

हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण कुमार यांच्या माहितीनुसार, पावसाच्या तुटीचा सर्वाधिक फटका अकोला जिल्ह्याला बसला आहे. अकोल्यात ऑगस्ट महिन्यात तब्बल 84 टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली. त्यापाठोपाठ अमरावतीमध्ये 82 टक्के, यवतमाळमध्ये 78 टक्के, वर्ध्यात 73 टक्के, तर नागपूर आणि वाशिममध्ये प्रत्येकी 71 टक्के पावसाची तूट राहिली आहे. ऑगस्ट महिन्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत निम्म्यापेक्षाही कमी पाऊस झाल्याने खरीप पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पावसाची कमतरता कायम राहिल्यास भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा तसेच सिंचनाच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो.

2 ते 5 सप्टेंबरदरम्यान पावसाची शक्यता

दरम्यान, विदर्भासाठी काहीशी दिलासादायक बातमीही समोर आली आहे. 2 सप्टेंबर ते 5 सप्टेंबरदरम्यान विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते दमदार पाऊस पडण्याची शक्यता नागपूर हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या सुरुवातीला होणाऱ्या पावसामुळे ऑगस्ट महिन्यात निर्माण झालेली मोठी तूट काही प्रमाणात भरून निघते का, याकडे आता शेतकऱ्यांसह प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

हवामान तज्ञ एस डी सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ऑगस्ट कोरडा गेला असतानाच, आता सप्टेंबरमध्येही सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एलनिनो सक्रिय झाला असून इंडियन ओशन डायपोल तटस्थ आहे. या प्रभावामुळे मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे भविष्यात चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा