AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात अनुकंपा धोरण लागू , सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास वारसदारांना नोकरी

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या सेवेत असताना कोणीही कर्मचारी किंवा अधिकारी यांचं निधन झाल्यास त्यांच्या पात्र वारसदारांना आता त्यांच्या जागी अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात अनुकंपा धोरण लागू , सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास वारसदारांना नोकरी
mantralaya building
| Updated on: Sep 01, 2026 | 10:26 PM
Share

उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्री म्हणून महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात अनुकंपा नियुक्ती धोरण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पात्र वारसांना संबंधित अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याचे धोरण आहे, मात्र, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ हे स्वायत्त मंडळ असल्याने या मंडळाला हा निर्णय लागू होत नव्हता. आज हा निर्णय लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच त्यासाठीचा शासनादेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात अनुकंपा तत्व लागू करण्यात आले आहे.

या निर्णयानुसार, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या सेवेत असताना कोणीही कर्मचारी किंवा अधिकारी यांचं निधन झाल्यास त्यांच्या पात्र वारसांना अनुकंपा धोरणानुसार शासकीय सेवेत त्यांच्या शैक्षणिक पात्रनेनुसार गट क किंवा ड मध्ये वक्फ मंडळात नियुक्ती मिळू शकेल. त्यासाठी पात्रता तारीख २१.०९.२०१७ अशी निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच या तारखेस किंवा त्यानंतर सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना मंडळात नियुक्ती मिळेल, तसंच ३१.१२.२००१ नंतर अशा कर्मचाऱ्यांना तिसरे अपत्य झालेले असल्यास त्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा धोरण लागू होणार नाही. यासाठीचा शासन आदेश शासकीय संकेतस्थळावर जारी करण्यात आला आहे.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा