नाशिकमध्येही हेल्मेटसक्ती लागू, विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय

नाशिक : वाढत्या अपघातांची संख्या पाहता नाशिक पोलिसांनी शहरात हेल्मेटसक्ती केली आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी यापूर्वीच या निर्णयाची माहिती दिल होती. 13 मे म्हणजे आजपासून ही हेल्मेटसक्ती अंमलात आली असून शहरातील चौकाचौकात वाहतूक पोलीस नियमाची काटेकोरपणे अंमलबाजवणी करत आहेत. नाशिक पोलिसांनी हेल्मेट सक्तीसह बेशिस्त दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांसाठी विशेष मोहीम हाती घेतली […]

नाशिकमध्येही हेल्मेटसक्ती लागू, विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

नाशिक : वाढत्या अपघातांची संख्या पाहता नाशिक पोलिसांनी शहरात हेल्मेटसक्ती केली आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी यापूर्वीच या निर्णयाची माहिती दिल होती. 13 मे म्हणजे आजपासून ही हेल्मेटसक्ती अंमलात आली असून शहरातील चौकाचौकात वाहतूक पोलीस नियमाची काटेकोरपणे अंमलबाजवणी करत आहेत. नाशिक पोलिसांनी हेल्मेट सक्तीसह बेशिस्त दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

विश्वास नांगरे पाटील यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक असताना महामार्गांवर हेल्मेटसक्ती केली होती. यानंतर नाशिक शहरातही हा निर्णय घेण्यात आलाय. शहरात वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, एप्रिलपर्यंत रस्त्यावर झालेल्या अपघातांमध्ये 63 जणांचा मृत्यू झाला, 88 गंभीर तसेच 31 किरकोळ अपघातात 183 जण जखमी झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अपघाताचं प्रमाण काही अंशी कमी असलं तरी ते नियंत्रणात आणण्यासाठी शहर वाहतूक पोलीस आणि शहर पोलीस सक्रिय झाले आहेत.

विनाहेल्मेट दुचाकी चालवणे, विनासीटबेल्ट चारचाकी चालवणे, वाहतूक नियमांचे पालन न करणे अशा विविध कारणांमुळे अपघात होत असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढलाय. त्यामुळे अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टींवर अंमलबजावणी सुरु झाली आहे. दुचाकी अपघातात मृत्यू झालेल्या 38 जणांपैकी 35 जणांनी हेल्मेट घातलेलं नव्हतं. त्यामुळे हेल्मेटचा वापर किती आवश्यक आहे ते याच आकडेवारीतूनच दिसून येतं.

विनापरवाना वाहन चालवणे, दारु पिऊन वाहन चालवणे, वाहन चालवताना फोनवर बोलणे, सिग्नलचे उल्लंघन, एकेरी वाहतुकीच्या मार्गावर वाहन चालवणे, ट्रिपल सीट, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक आणि क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक होत असेल आणि नियमांचे उल्लंघन करत अपघाती मृत्यू झाला, तर वाहनचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत त्याचा परवाना निलंबनाची कारवाई करणात येईल. याबाबत प्रादेशिक परिवहन विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, असं विश्वास नांगरे पाटलांनी निर्णयाची माहिती देताना सांगितलं होतं.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.