AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar | नितीश कुमारांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी 16 नोव्हेंबरला? सत्ता स्थापनेविषयी चर्चा सुरु

जनता दल यूनाइटेडचे नेते नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आहेत. Nitish Kumar will take oath as chief minister of Bihar on 16 November

Bihar | नितीश कुमारांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी 16 नोव्हेंबरला? सत्ता स्थापनेविषयी चर्चा सुरु
| Updated on: Nov 12, 2020 | 1:51 PM
Share

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत सत्ता कायम राखण्यात एनडीएनं यश मिळवलं आहे. एनडीएनं 243 जागांपैकी 125 जागांवर तर महाआघाडीनं 110 जागांवर विजय मिळवला. जनता दल यूनाइटेडचे नेते नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आहेत, मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा शपथविधी 16 नोव्हेंबरला होणार आहे. मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार सातव्यांदा शपथ घेतली. (Nitish Kumar will take oath as chief minister of Bihar on 16 November )

भाजप आणि जेडीयूचे नेत्यांमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करण्याविषयी चर्चा सुरु असल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. दोन्ही पक्षांचे नेते लवकरच राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा करतील.

नितीश कुमारचं मुख्यमंत्री

बिहार विधानसभेच्या 243 जागांपैकी भाजपनं 74, जेडीयूनं 43 आणि इतर मित्रपक्ष मिळून 125 जागांवर विजय मिळवला आहे. एनडीएमध्ये सर्वाधिक जागा भाजपनं मिळवल्या आहेत. मात्र, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार होणार असल्याचे भाजप नेत्यांनी जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिल्लीतील भाजप कार्यालयात विजयाचा जल्लोष साजरा करताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार होतील हे स्पष्ट केले. एनडीएमधील भाजप, जेडीयू हिंदुस्तान आवाम मोर्चा, विकासशील इन्सान पार्टी यांच्या सर्व आमदारांची बैठक होणार आहे. मात्र, त्याबद्दल निर्णय झालेला नाही,अशी सूत्रांची माहिती आहे.

श्रीकृष्ण सिंह यांचा विक्रम मोडण्याची संधी

श्रीकृष्ण सिंह यांच्या नावावर बिहारमध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम आहे. श्रीकृष्ण सिंह 1946 ते 1961 पर्यंत बिहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांना आधुनिक बिहारचा शिल्पकार असं बोललं जातं. श्रीकृष्ण सिंह हे 17 वर्षे 52 दिवस मुख्यमंत्रीपदी विराजमान होते.

नितीश कुमार यांच्याकडे सर्वाधिक काळ मु्ख्यमंत्रीपदावर राहण्याची संधी आहे. नितीश कुमार यांनी आतापर्यंत 14 वर्षे 82 दिवस मुख्यमंत्रीपद सांभाळलं आहे. तर माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव हे 7 वर्षे बिहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. बिहारने आतापर्यंत 5 दिवसांपासून ते 14 वर्षापर्यंतचे मुख्यमंत्री पाहिले आहेत.

नितीश कुमार यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत जेडीयूच्या खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, एका वर्षाच्या आतचं ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. 2015 च्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या राजद आणि काँग्रेससोबत आघाडी केली. यानिवडणुकीत विजय झाल्यानंतर नितीशकुमार मुख्यमंत्री आणि तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाले. मात्र, 2017 मध्ये नितीश कुमार यांनी राजीनामा देत पुन्हा एकदा भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. भाजपसोबत  सत्ता स्थापन करत नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले.

संबंधित बातम्या :

‘जदयू’ची 15 वर्षातील सर्वात खराब कामगिरी; मुख्यमंत्रिपदावरुन नितीश कुमारांचे मन उडाले, भाजपकडून मनधरणी

विकासाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केल्यानेच ‘त्यांचं’ डिपॉझिट जप्त; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर घणाघात

(Nitish Kumar will take oath as chief minister of Bihar on 16 November )

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.