पुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या

पुण्यात 43 वर्षीय रिक्षाचालकाने आपल्या मुलीची हत्या करुन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्नी सोडून गेल्यामुळे विवंचनेतून त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे

पुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या
Follow us
| Updated on: Aug 19, 2019 | 1:17 PM

पुणे : पुण्यात पोटच्या मुलीची हत्या करुन बापाने आत्महत्या (Pune Father Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील सहकार नगर परिसरात राहणाऱ्या आशिष भोंगळेने आपल्या आठ वर्षांच्या चिमुरडीचा जीव घेतला, त्यानंतर स्वतःचं आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला.

काशीनाथ पाटील नगरमध्ये राहणारा 43 वर्षीय आशिष रिक्षाचालक म्हणून काम करत होता. आशिषला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आशिष आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरु होते. त्यामुळे पती-पत्नी वेगवेगळे राहत असून दोन्ही मुलांचा सांभाळ आशिषच करतो, मात्र मोठा मुलगा शिक्षणानिमित्त बाहेरगावी आहे.

आशिषने शनिवारी रात्री आई घरात नसल्याची संधी साधून आठ वर्षांच्या श्रद्धाची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर गळफास घेऊन आशिषने आपलंही आयुष्य संपवलं. आशिषची आई घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

कौटुंबिक वादातून आशिषने टोकाचं पाऊल गाठल्याचं म्हटलं जात आहे. पत्नी सोडून गेल्यामुळे आशिष विवंचनेत होता, त्याच रागातून त्याने लेकीची हत्या करुन आत्महत्या केल्याची शक्यता आहे. या घटनेमुळे सहकार नगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.