AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांग्लादेशही भारताला GDP मध्ये मागे टाकणार, हे नरेंद्र मोदी सरकारचं ‘यश’, राहुल गांधींचं टीकास्त्र

कोरोना आणि लॉकडाऊनमुळं भारताच्या जीडीपीत तब्बल 10.3 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. नाणेनिधीचा हा अंदाज खरा ठरला तर भारताचा जीडीपी, गेली शतकानुशतके आपल्याहून कित्येकपट मागे असणाऱ्या बांगलादेशच्याही खाली जाईल.

बांग्लादेशही भारताला GDP मध्ये मागे टाकणार, हे नरेंद्र मोदी सरकारचं 'यश', राहुल गांधींचं टीकास्त्र
| Updated on: Oct 14, 2020 | 12:57 PM
Share

नवी दिल्ली : कोरोना आणि लॉकडाऊनचा भारताच्या अर्थव्यवस्थेला जबर फटका बसणार असल्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं वर्तवला आहे. हा फटका इतका जबरदस्त असेल की भारताच्या जीडीपीत तब्बल 10.3 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. नाणेनिधीचा हा अंदाज खरा ठरला तर भारताचा जीडीपी, गेली शतकानुशतके आपल्याहून कित्येकपट मागे असणाऱ्या बांगलादेशच्याही खाली जाईल. आयएमएफच्या अंदाजावरुन काँग्रेस नेते राहुल गांधींनी  पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. (Rahul Gandhi criticize Narendra Modi Govt about IMF projections over GDP )

जीडीपीमध्ये बांग्लादेश भारताच्या पुढे जाण्याच्या तयारीत आहे, हे मोदी सरकारच्या 6 वर्षे काळातील द्वेषानं भरलेल्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचं यश आहे, अशी टीका राहुल गांधींनी केली. त्यांनी याबाबत आयएमएफच्या अहवालाचा फोटो ट्विट केला आहे.

नाणेनिधीच्या अंदाजानुसार भारतीय व्यक्तीची सरासरी कमाई वर्षाला 1 हजार 877 डॉलर राहिल. तर बांगलादेशचा प्रतिव्यक्ती जीडीपी 4 टक्क्यांनी वाढून 1 हजार 888 डॉलरपर्यंत पोहचेल. त्यामुळं यंदाच्या वर्षात कमाईच्या बाबतीत बांगलादेशी भारतीयांच्याही पुढे जाऊ शकतात. मात्र, ही परिस्थिती जास्त काळ टिकणार नसल्याचंही नाणेनिधीनं स्पष्ट केलंय.

दक्षिण आशियात भारत तिसरा गरीब देश आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि वर्ल्ड इकोनॉमिक आऊटलुकनुसार दक्षिण आशियाई देशात भारत तिसरा गरीब देश ठरणार आहे. पाकिस्तान आणि नेपाळ या दोन देशांचा जीडीपी भारतापेक्षा कमी राहणार आहे. श्रीलंका, भूतान आणि मालदिव देशांचा जीडीपी भारतापेक्षा जास्त राहणार आहे.

2021 च्या वर्षात भारताच्या जीडीपीत चांगली वाढ होईल. आणि याप्रकारे भारत पुन्हा एकदा जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था बनेल असं नाणेनिधीनं म्हटलंय. पुढच्या वर्षात भारताच्या जीडीपीत 8.8 टक्क्यानं वाढण्याचा अंदाज आहे. तर चीनचा विकासदर 8.2 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. 2020 च्या वर्षात चीन एकमेव असा देश ठरेल, ज्याच्या विकासदरात 1.9 टक्क्यांची वाढ पाहायला मिळेल.

दरम्यान,  यंदाच्या आर्थिक वर्षात जगाच्या विकासदरात 4.4 टक्क्यांची घट येऊ शकते. मात्र,  2021मध्ये विकासदर जबरदस्त वाढ पाहायला मिळेल. त्यावेळी विकासदर 5.1 टक्क्यांच्या गतीनं वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

संबंधित बातम्या : 

ही गोष्ट खूपच धोकादायक; पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ व्हिडीओवर राहुल गांधींची प्रतिक्रिया

कांदा जमिनीच्या खाली उगवतो की वर, राहुल गांधींना काय कळतं?, भाजपचा हल्लाबोल

(Rahul Gandhi criticize Narendra Modi Govt about IMF projections over GDP )

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.