AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Railway Recruitment 2020 : 10 वी पास तरुणांना रेल्वेत सरकारी नोकरीची संधी, परीक्षेशिवाय 561 जागा भरणार

भारतीय रेल्वे प्रशासनाने कोरोना संकंटादरम्यान 561 पदांची (Railway Recruitment 2020) भरती जारी केली आहे. विशेष म्हणजे फक्त दहावी पास उमेदवारदेखील नोकरीसाठी अर्ज दाखल करु शकतात.

Railway Recruitment 2020 : 10 वी पास तरुणांना रेल्वेत सरकारी नोकरीची संधी, परीक्षेशिवाय 561 जागा भरणार
कोव्हिड - 19 जीवघेण्या (COVID-19 Pandemic) संसर्गाला रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन कारावा लागला. या काळात अनेक लहान-मोठे उद्योग आणि व्यवसाय ठप्प झाले. याच लघू उद्योगांना पुन्हा चालना देण्यासाठी सरकारने महत्त्वाची पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
| Updated on: May 16, 2020 | 3:45 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने कोरोना संकंटादरम्यान 561 पदांची (Railway Recruitment 2020) भरती जारी केली आहे. विशेष म्हणजे फक्त दहावी पास उमेदवारदेखील नोकरीसाठी अर्ज दाखल करु शकतात. याशिवाय 561 पदांसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा होणार नाही. त्यामुळे दहावी पास उमेदवारांना चांगला फायदा होऊ शकतो. ईस्ट कोस्ट रेल्वेने ही भरती जारी केली आहे (Railway Recruitment 2020).

देशभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. मात्र, लॉकडाऊनदरम्यान स्थलांतरित मजुरांना घरी सोडण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकार आणि रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या पाठोपाठ रेल्वे प्रशासनाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने कोरोना संकंटाच्या दरम्यान 561 पदांची भरती जारी केली आहे.

कोणकोणत्या पदांसाठी भरती?

ईस्ट कोस्ट रेल्वेने जारी केलेल्या भरतीत नर्सिंग सुपरिटेंडेंट, फार्मासिस्ट, हॉस्पिटल अटेंडेट या पदांचा समावेश आहे. यामध्ये नर्सिंग सुपरिटेंडेंट या पदासाठी 255 पद, फार्मासिस्टसाठी 51 पद आणि हॉस्पिटल अटेंडेट, ओटीए, ड्रेसर या पदांसाठी 255 पद असे एकूण 561 पदांसाठी ही भरती जारी करण्यात आली आहे.

या पदांसाठी इच्छुक उमेदवार 22 मे 2020 पर्यंत अर्ज दाखल करु शकतात. या भरतीत विविध पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रतेची अट ठेवण्यात आली आहे. यात विशेष म्हणजे 10 पास उमेदवारही अर्ज दाखल करु शकतो. उमेदवारांची निवड ही मेरिट लिस्टनुसार केली जाईल.

हेही वाचा : तुम्ही पंतप्रधान असता तर कोणता निर्णय घेतला असता? राहुल गांधी म्हणतात…

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.