AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जनादेश नितीश कुमारांविरोधात, फक्त 40 जागा जिंकून मुख्यमंत्रिपद कसे? राजदचा सवाल

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे जेडीयू नेते नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. (RJD leader Manoj Jha on CM Nitish Kumar).

जनादेश नितीश कुमारांविरोधात, फक्त 40 जागा जिंकून मुख्यमंत्रिपद कसे? राजदचा सवाल
| Updated on: Nov 15, 2020 | 3:27 PM
Share

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे जेडीयू नेते नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. राज्यपालांनी हा दावा स्वीकारला आहे. त्यामुळे नितीश कुमार उद्या (16 नोव्हेंबर) पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, याच गोष्टीवरुन महागठबंधनच्या नेत्यांकडून सडकून टीका केली जात आहे. राजद नेते आणि राज्यसभेचे खासदार मनोज झा यांनी ‘एएनआय’ला दिलेल्या प्रतिक्रियेत नितीश कुमार यांच्या सत्ता स्थापनेच्या दाव्यावर आक्षेप घेतला आहे (RJD leader Manoj Jha on CM Nitish Kumar).

“एखादी व्यक्ती फक्त 40 जागांवर विजय मिळवून मुख्यमंत्री कसं बनू शकते? कारण जनादेश त्यांच्याविरोधात आहे. त्यांनी राज्याची पूर्ण वाट लावली. त्यांनी यावर विचार करायला हवा”, असं मनोज झा म्हणाले.

“बिहार नक्की यावर काहीतरी उपाय शोधेल. या प्रक्रियेला दहा दिवस, एक आठवडा किंवा एक महिना लागू शकतो”, असा इशारा मनोज झा यांनी दिला (RJD leader Manoj Jha on CM Nitish Kumar).

दरम्यान, बिहारमध्ये सत्तास्थापनेच्या घडामोडी आणि बैठकांचे सत्र सुरु आहे. नितीशकुमार यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. नितीश कुमार सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. उद्या (सोमवार 16 नोव्हेंबर) दुपारी 11:30 ते 3 वाजण्याच्या दरम्यान शपथविधी होण्याची शक्यता आहे.

सुशील कुमार मोदी यांनी जवळपास 13 वर्षे बिहारमध्ये उपमुख्यमंत्रिपद भूषवले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ते उपमुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी जवळीक असल्याने सुशीलकुमार मोदींची वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाजपला अधिक मंत्रिपदं मिळण्याची चिन्हं

नितीशकुमारांच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान देण्यात येईल, याची चर्चा सुरु झाली आहे. भाजप एनडीएतील सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे मंत्रिमंडळात भाजपच्या कोट्यातून 18 ते 20 मंत्री केले जाऊ शकतात. त्याचबरोबर जेडीयूच्या कोट्यातून 12-14 मंत्री केले जाऊ शकतात. याशिवाय हिंदुस्थानी आवाम मोर्चा आणि व्हीआयपी या पक्षांना प्रत्येकी एक मंत्रीपद दिलं जाण्याची चर्चा आहे.

संबंधित बातम्या :

बिहारच्या उपमुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडून नवा चेहरा?

बिहारमध्ये राजकीय हालचाली वाढल्या; मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शिफारस

देवेंद्र फडणवीस एनडीएच्या बैठकीसाठी पाटण्याला, बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अधिकृत निर्णय होणार

Follow Us
पंतप्रधानांच्या आवाहनाचे अनोखे स्वागत! महापौरांनी इलेक्ट्रिक बाईकने...
पंतप्रधानांच्या आवाहनाचे अनोखे स्वागत! महापौरांनी इलेक्ट्रिक बाईकने....
पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना फडणवीसांनी सुनावलं
पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना फडणवीसांनी सुनावलं.
सरकारी ताफ्याला ब्रेक! वर्षा ते विधान भवन, मुख्यमंत्री ऑन बाईक......
सरकारी ताफ्याला ब्रेक! वर्षा ते विधान भवन, मुख्यमंत्री ऑन बाईक.......
25 लाखात चक्क 16 महिने... 20 वर्ष जुन्या हत्या प्रकरणाचा निकाल, NCP...
25 लाखात चक्क 16 महिने... 20 वर्ष जुन्या हत्या प्रकरणाचा निकाल, NCP....
मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की... 10 विधान परिषद सदस्यांनी घेतली शपथ
मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की... 10 विधान परिषद सदस्यांनी घेतली शपथ.
तुम्हालाही हे माहीत हवं... फडणवीस सरकारचा काटकसरीचा फॉर्म्युला!
तुम्हालाही हे माहीत हवं... फडणवीस सरकारचा काटकसरीचा फॉर्म्युला!.
VIP गाडी नाही, थेट बसने प्रवास! नितीन गडकरींची पुण्यातील एंट्री चर्चेत
VIP गाडी नाही, थेट बसने प्रवास! नितीन गडकरींची पुण्यातील एंट्री चर्चेत.
भयंकर! चालत्या बसमध्ये महिलेसोबत नको नको ते घडलं, बस चालकावर गंभीर आरो
भयंकर! चालत्या बसमध्ये महिलेसोबत नको नको ते घडलं, बस चालकावर गंभीर आरो.
अवकाळीचा कहर! साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, झाडं कोसळली, 40 घरांचे...
अवकाळीचा कहर! साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, झाडं कोसळली, 40 घरांचे....
भाजपचे वरिष्ठ नेते सुद्धा! खरातच्या दरबारात कुणा कुणाची नांदी, अंजली..
भाजपचे वरिष्ठ नेते सुद्धा! खरातच्या दरबारात कुणा कुणाची नांदी, अंजली...