AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“कोणीही बाहुबलीने रस्त्यावर येऊन आंदोलन करुन दाखवावं”, राजू शेट्टींचा चक्काजाम आंदोलनात विरोधकांना इशारा

कृषी कायद्याला देशभरातील शेतकऱ्यांचा विरोध आहे हे दाखवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात राज्यात विविध ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. (Swabhimani Shetkari Sanghtana  agitation against agriculture act passed by central Govt)

कोणीही बाहुबलीने रस्त्यावर येऊन आंदोलन करुन दाखवावं, राजू शेट्टींचा चक्काजाम आंदोलनात विरोधकांना इशारा
| Updated on: Nov 05, 2020 | 1:57 PM
Share

सांगली : केंद्राच्या कृषी कायद्याला होत असलेल्या विरोधाला प्रादेशिक आणि जातीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय. मात्र, कृषी कायद्याला देशभरातील शेतकऱ्यांचा विरोध आहे हे दाखवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात राज्यात विविध ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बुलडाणा जिल्ह्यांमध्ये स्वाभिमानीने आंदोलन केले. केंद्रीय कृषी विधेयकांच्या विरोधात यापुढील आंदोलने दिल्लीत होतील, असे राजू शेट्टी यांनी सांगितले. “कोणीही बाहुबलीने रस्त्यावर येऊन आंदोलन करुन दाखवावे,” असे आव्हान राजू शेट्टी यांनी विरोधकांनी दिले आहे. (Swabhimani Shetkari Sanghtana  agitation against agriculture act passed by central Govt)

कोल्हापूर- सांगली जिल्ह्याच्या हददीवरील अंकली पुलावर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात चक्का जाम आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त लावला असून स्वाभिमानी शेतकरी संघटना गमिनी काव्याने आंदोलन करत असल्यामुळे जयसिंगपूर पोलीस सर्वच ठिकाणी सतर्क आहेत. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यामुळे अंकली उदगाव मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

सांगली

उसाला एक रकमी एफआरपी आणि मागील वर्षीची थकित एफआरपी मिळावी, केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करत आहे. एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी, अशी मागणी देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातील लक्ष्मी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

सोलापूर

सोलापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राळेरास येथील बार्शी रस्त्यावर चक्काजाम आंदोलन केलं. शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊसदर ( एफ.आर.पी) जाहीर करावा, अशी मागणी या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. स्वाभिमानीचे सोलापूर जिल्हाध्य पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन विजय रणदिवे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं आहे.

बुलडाणा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बुलडाणा- अजिंठा महामार्गावर देऊळघाट येथे रस्ता रोको करण्यात आला. तब्बल 2 तास चालेल्या या रास्तारोको मुळे बुलडाणा- अजिंठा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या रास्तारोकोमध्ये शेतकरी विरोधी कृषी कायदे सरकारने रद्द करावे,अशी मागणी करण्यात आली.

रविकांत तुपकरांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दोन्ही गंभीर नसल्याची टीका केली. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मग शेतकऱ्यांच्या उद्रेकाला केंद्रा सह राज्य सरकारला सामोरे जावे लागेल , असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला.

संबंधित बातम्या :

ऊस शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर साखरेचा एक कणही कारखान्यातून बाहेर पडू देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा

Raju Shetti | ऊस शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी अधिक 14 टक्के वाढ मिळालीच पाहिजे : राजू शेट्टी

(Swabhimani Shetkari Sanghtana  agitation against agriculture act passed by central Govt)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.