AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंदिराचा पैसा पाण्यासाठी वापरला, तरी पाणी नाही!

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात जंगली तांडा येथील गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी चक्क देवाचा पैसा वापरावा लागला. पण त्यांच्या नशिबात पाणी काही मिळाले नाही. दोन महिन्यांपासून पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने गावकऱ्यांनी मंदिरातील दानपेटीतून जमा झालेला पैसा विहीर खोदण्यासाठी वापरला. गावकऱ्यांनी विहीर खोदली, पण पाणी काही लागलेच नाही. भीषण अशी दुष्काळ परिस्थिती सध्या या गावात निर्माण […]

मंदिराचा पैसा पाण्यासाठी वापरला, तरी पाणी नाही!
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM
Share

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात जंगली तांडा येथील गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी चक्क देवाचा पैसा वापरावा लागला. पण त्यांच्या नशिबात पाणी काही मिळाले नाही. दोन महिन्यांपासून पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने गावकऱ्यांनी मंदिरातील दानपेटीतून जमा झालेला पैसा विहीर खोदण्यासाठी वापरला. गावकऱ्यांनी विहीर खोदली, पण पाणी काही लागलेच नाही. भीषण अशी दुष्काळ परिस्थिती सध्या या गावात निर्माण झाली.

गावात गेल्या सात वर्षापासून सरकारचे एक ग्लासही पाणी मिळालेले नाही. सरकारने पाच वर्षांपूर्वी 80 लाख खर्च करून पाणी योजना राबवली, पण ती अर्धवट पडली. पाण्यासाठी गावात 35 खाजगी बोअर आहेत, पण एकही बोअर चालू नाही. अशी परिस्थिती जंगली तांडा गावाची आहे.

गावातल्या लोकांना पाणी हवे असेल, तर त्यांना विकत पाणी घ्यावं लागतं किंवा चार ते पाच किलोमीटर दूर जाऊन पाणी आणावं लागत. गावात येणाऱ्या टँकरमधून 40 रुपयाला पाच लीटर पाणी गावकऱ्यांना विकत घ्यावे लागतं. यामुळे गावकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. पाणी नसल्यामुळे जनावरांचेही हाल होत आहेत. इतकी भीषण परिस्थिती असतानाही सरकारकडून एकही टँकर दिले जात नाही.

राज्यातील अनेक गावात सध्या मोठ्या प्रमाणात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. नुकतेच नाशिकमध्ये पाण्याअभावी गायींचा मृत्यू झाला. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी सरकारकडून दुष्काळी गावांकडे दुर्लक्ष केलं जात आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.