AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहशतवाद्यांचा पुन्हा 26/11 हल्ला घडवण्याचा कट? पंतप्रधान मोदींची अमित शाह आणि अजित डोवाल यांच्यासोबत बैठक

मुंबईच्या 26/11 हल्ल्याला यावर्षी बारा वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र, येत्या 26 नोव्हेंबरलादेखील अतिरेकी भारतात मोठा घातपात घडवण्याचा डाव आखत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे (Terrorists were planning big attack on 26 November).

दहशतवाद्यांचा पुन्हा 26/11 हल्ला घडवण्याचा कट? पंतप्रधान मोदींची अमित शाह आणि अजित डोवाल यांच्यासोबत बैठक
दहशतवादी कारवायांचा तत्काळ पर्दाफाश होणार
| Updated on: Nov 20, 2020 | 6:40 PM
Share

नवी दिल्ली : भारतात येत्या 26 नोव्हेंबर रोजी दहशतवाद्यांचा मोठा घातपात घडवण्याचा डाव असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. त्यानंतर जम्मू-काश्मीरच्या नागरोटा येथे काल (19 नोव्हेंबर) भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार अतिरेक्यांचा भारतीय जवानांनी खात्मा केला. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (20 नोव्हेंबर) उच्चस्तरीय बैठक बोलवली आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गुप्तचर यंत्रणाचे अधिकारी उपस्थित आहेत (Terrorists were planning big attack on 26 November).

मुंबईच्या 26/11 हल्ल्याला यावर्षी बारा वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र, येत्या 26 नोव्हेंबरलादेखील अतिरेकी भारतात मोठा घातपात घडवण्याचा डाव आखत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. त्यानंतर काल नागरोटा येथे भारतीय जवान आणि अतिरेकी आमनेसामने आले (Terrorists were planning big attack on 26 November).

नागरोटा येथे टोल नाक्याजवळ पोलीस आणि सैन्यदालाच्या जवानांनी एका ट्रकला थांबवलं. या ट्रकमध्ये चार अतिरेकी लपून बसले होते. पोलिसांनी ट्रक थांबवताच अतिरेक्यांनी पळून जण्याचा प्रयत्न केला. मात्र, जवानांनी त्यांना बरोबर हेरलं. त्यानंतर काल सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास जवान आणि अतिरेकी यांच्यात चकमक सुरु झाली. या चकमकीत चार अतिरेकी मारले गेले. त्यांच्याजवळ मिळालेले 11 एके-47 रायफल, तीन पिस्तूल, 29 ग्रेनेड आणि इतर स्फोटक साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे.

मुंबई हल्ल्यात 166 लोकांचा मृत्यू

मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी मोठा अतिरेकी हल्ला झाला होता. या हल्ल्याची मुंबईकरांना आजही आठवण आली तर अंगावर शहारे येतात. लष्कर-ए-तोय्यबा या दहशतवादी संघटनेच्या 10 अतिरेक्यांनी संपूर्ण मुंबईत हाहा:कार माजवला होता. या हल्ल्यात 166 निरापराध लोकांचा मृत्यू झाला होता. तर 300 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले होते. या हल्ल्यावेळी अतिरेकी समुद्रमार्गे भारतात दाखल झाले होते. या अतिरेकी हल्ल्यात मुंबई पोलीस, एटीएस आणि एनएसजीचे 11 जवान शहीद झाले होते.

संबंधित व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

घुसखोरी करणारा एकही अतिरेकी जिवंत परतणार नाही; लष्करप्रमुखांचा निर्वाणीचा इशारा

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.