AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एअर फोर्सने सरकारला पुरावे दिले, 80 टक्के बॉम्ब अचूक निशाण्यावर

नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या हल्ल्यानंतर, देशभरात विरोधी पक्षाकडून पुराव्याची मागणी केली जात होती. मात्र आता या हल्लाचे फोटो रॉयटर्स न्यूज एजन्सीने प्रसिद्ध केले आहेत. भारतीय वायूसेनेने हल्ला केलेल्या पाकिस्तानातील बालाकोट परिसराचे फोटो सॅटेलाईटद्वारे काढण्यात आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय वायूसेनेने एअरस्ट्राईक संदर्भातील अनेक पुरावे भारत सरकारकडे सोपवले आहेत. यामध्ये एअरस्ट्राईकच्या फोटोंचाही […]

एअर फोर्सने सरकारला पुरावे दिले, 80 टक्के बॉम्ब अचूक निशाण्यावर
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या हल्ल्यानंतर, देशभरात विरोधी पक्षाकडून पुराव्याची मागणी केली जात होती. मात्र आता या हल्लाचे फोटो रॉयटर्स न्यूज एजन्सीने प्रसिद्ध केले आहेत. भारतीय वायूसेनेने हल्ला केलेल्या पाकिस्तानातील बालाकोट परिसराचे फोटो सॅटेलाईटद्वारे काढण्यात आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय वायूसेनेने एअरस्ट्राईक संदर्भातील अनेक पुरावे भारत सरकारकडे सोपवले आहेत. यामध्ये एअरस्ट्राईकच्या फोटोंचाही समावेश असल्याचे म्हटलं जात आहे.

भारतीय वायूसेनेने हल्ला केल्यानंतर अनेकांनी पुराव्याची मागणी केली. वायूसेनेने सरकारला 12 पानांचा अहवाल सादर केला आहे. यामध्ये वायूसेनेने बालाकोटमधील हाय रिजोल्यूशनचे फोटोही दिले आहेत. दरम्यान वायूसेनेने दिलेला रिपोर्ट मोदी सरकार सर्वांसमोर सादर करणार का? याबद्दल अजून काही माहिती मिळालेली नाही.

वायूसेनेच्या माहितीनुसार, बालाकोटमध्ये 80 टक्के निशाणे अचूक लागल्याचे बोललं जात आहे. जे बॉम्ब टाकण्यात आले ते बॉम्ब बालाकोटमध्ये असलेल्या इमारतींच्या आतामध्ये गेले आहेत. यामुळे जे काही नुकसान झालं आहे ते इमारतींच्या आतमध्ये झालं आहे.

26 फेब्रुवारीच्या पहाटे एअर स्ट्राईक

14 फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मद ने पुलवामा येथे दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानमध्ये घुसून एअरस्ट्राईक करत तेथील दहशतवादी तळ उडवण्यात आले. एअरस्ट्राईकमध्ये मिराज-2000 विमानांचा वापर करण्यात आला होता. मात्र पाकिस्तान सतत दावा करत होते की आमचे काही नुकसान झालेले नाही फक्त काही झाडे पडली आहेत.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली