AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ac Local News : एसी लोकलमध्ये घुसखोरी करणाऱ्यांनो सावधान, रेल्वेने घेतला महत्वाचा निर्णय

मध्य रेल्वेच्या एसी लोकलला सध्या उन्हाचा तडाखा वाढल्याने चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे एसी लोकलला मोठी गर्दी होत आहे. या गर्दीचा फायदा घेत काही विनातिकीट किंवा अनधिकृत प्रवासी एसी लोकल आणि फर्स्टक्लासच्या डब्यात शिरकाव करीत आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मध्य रेल्वेने एक उपाय योजला आहे.

Ac Local News : एसी लोकलमध्ये घुसखोरी करणाऱ्यांनो सावधान, रेल्वेने घेतला महत्वाचा निर्णय
mumbai ac local (file Photo)
| Updated on: May 25, 2024 | 3:26 PM
Share

मध्य रेल्वे प्रशासनाने एसी लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सावधानतेचा इशारा दिला आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून उष्णता भयंकर वाढली आहे. त्यामुळे एसी लोकलने प्रवास करण्यासाठी प्रवासी प्राधान्य देत आहेत. अशावेळी विनातिकीट एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणीचा आणि गर्दीचा सामना करावा लागत आहेत. यामुळे मध्य रेल्वेच्या टास्क फोर्सने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. एसी लोकल आणि साध्या लोकलच्या फर्स्टक्लासने प्रवास करताना विनातिकीट किंवा साधे तिकीट असतानाही घुसखोरी करुन गर्दी करणाऱ्या प्रवाशांना धडा शिकविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मध्य रेल्वेवर दररोज 66 एसी लोकल फेऱ्या

मध्य रेल्वेवर सध्या दररोज 33 लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. तसेच दररोज 1810 लोकल फेऱ्या चालविल्या जात आहेत. मध्य रेल्वेवर दररोज एसी लोकलच्या 66 फेऱ्या चालविल्या जात आहेत. सध्या उन्हाळ्याचा तडाका मोठा आहे. त्यामुळे एसी लोकलला मागणी वाढली आहे. एसी लोकलचे एकेरी प्रवासाचे तिकीट दर गेल्यावर्षी निम्याने कमी केले होते. त्यामुळे मध्य रेल्वेच्या 66 एसी लोकल फेऱ्यातून दररोज साधारण 78,323 प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यामुळे उन्हाच्या तडाक्यात एसी लोकलला प्रवासी प्राधान्य देत आहेत. यातील सर्वाधिक एसी लोकलच्या फेऱ्या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या मार्गावर चालविण्यात येत आहेत. एसी लोकलमधून सुरक्षित आणि वेळेत प्रवास करता येत आहे.परंतू एसी लोकलमधून काही विनातिकीट प्रवासी घसुखोरी करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी आता मध्य रेल्वेच्या एसी टास्क फोर्स नियमित तिकीट तपासणी बरोबरच आता आणखी एक निर्णय घेतला आहे.

काय घेतला निर्णय

एसी लोकल किंवा साध्या लोकलच्या फर्स्टक्लासच्या डब्यातून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर जरब बसण्यासाठी आता मध्य रेल्वेच्या एसी टास्क फोर्सने नवीन व्हॉट्सॲप तक्रार क्रमांक 7208819987 जारी केला आहे. या हेल्पलाईनवर जर प्रवाशांना प्रवासात काही अनधिकृत व्यक्ती प्रवास करताना आढळल्या तर त्यांची तक्रार करण्याची सोय आहे. या व्हॉट्सॲप तक्रार क्रमांकांवर केवळ मॅसेज करण्याची सोय आहे. प्रवाशांच्या या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी मध्य रेल्वेने खास स्पेशल मॉनिटरींग टीमची स्थापना केली आहे. या क्रमांकावर तक्रार करताच ही टीम कारवाई करणार आहे. जर लागलीच तक्रारीचे निवारण केले नाही तर ही टीम दुसऱ्या दिवशी डब्यात साध्या वेशात पाळत ठेवून कारवाई करणार असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Follow Us
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली उपस्थिती; नेमकी भानगड काय?
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
Sanjay Raut On Dharavi | 'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता मुंब्य्रात...