तांदूळ घेऊन आलेले ट्रकचालक उपाशी, नवी मुंबईत भुकेले ट्रकचालक मेटाकुटीला

मुंबईला धान्याचा पुरवठा करणाऱ्या ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनर यांच्यासाठी पिण्याचं पाणी आणि जेवणाची सुविधाही नसल्याचं समोर आलं आहे (Truck drivers suffering for food and Water in APMC).

तांदूळ घेऊन आलेले ट्रकचालक उपाशी, नवी मुंबईत भुकेले ट्रकचालक मेटाकुटीला
Follow us
| Updated on: May 02, 2020 | 12:19 AM

नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने देशभरात पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. या लॉकडाऊनच्या काळात मुंबईकरांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होऊ नये त्यासाठी हजारो किलोमीटर प्रवास करुन शेकडो ट्रक गहू, तांदूळ, डाळी आदी खाद्यपदार्थाची वाहतूक करतात. मात्र, याच ट्रकचे ड्रायव्हर आणि क्लिनर यांच्यासाठी पिण्याचं पाणी आणि जेवणाचीही सुविधा नसल्याचं समोर आलं आहे (Truck drivers suffering for food and Water in APMC). त्यामुळे या ट्रक चालकांना हालाखीच्या परिस्थितीत राहण्याची नामुष्की आली आहे.

मुंबई एपीएमसी परिसरात आणि ट्रक टर्मिनलमध्ये देशाच्या सर्व भागातून शेकडो धान्याच्या गाड्या येऊन थांबल्या आहेत. सध्या धान्य बाजारात कोरोनाचे 16 रुग्ण आढल्याने काही व्यापारी येत नाहीत. कोकण आयुक्त, एपीएमसी प्रशासनाने, व्यापारी आणि पोलिसांची एक बैठक घेतली. त्या बैठकीत धान्य मार्केटमध्ये दिवसभरात बाहेरुन येणाऱ्या कडधान्याच्या 300 गाड्या आत सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, काही व्यापाऱ्यांकडून जास्त माल मागवण्यात आला. मात्र, दुसरीकडे अनेक व्यापाऱ्यांच्या गोदामातही मोठ्या प्रमाणात कडधान्य पडून असल्याचं दिसत आहे. त्यामुळे एपीएमसी परिसरात आणि ट्रक टर्मिनलमध्ये मोठ्या प्रमाणात कडधान्याच्या गाड्या जवळपास 8 ते 10 दिवसांपासून उभ्या आहेत. या स्थितीत गाड्यांमध्ये असणाऱ्या ड्रायव्हर आणि क्लिनर लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

सध्या या चालकांसाठी गुरुद्वाराकडून काही प्रमाणात जेवणाचे वाटप होते. मात्र जेवण झालं की पिण्यासाठी पाण्याची सोय नाही, रस्त्यावर जसं पाणी मिळेल तेच अशुद्ध पाणी पिण्याची वेळ येत आहे. हे पाणी खूप खराब असल्याची तक्रार या चालकांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना केली आहे. इम्तियाज नावाचे चालक आंध्रप्रदेशमधून 6 दिवस झाले तसे तांदूळ घेऊन आले आहेत. त्यांना अजूनही टोकन मिळालेलं नाही. मात्र, काही दलाल 500 ते 1000 रुपये घेऊन गाडी आत सोडण्याचं काम करत असल्याचीही तक्रार चालकांकडून येत आहेत. इम्तियाज म्हणाले, “मुंबईमध्ये लोकांना जेवणाचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही हजार किलोमीटर प्रवास करुन आलो. मात्र, आम्हालाच जेवण मिळत नाही. व्यापाऱ्याला फोन केल्यावर ते कधी उचलतात, तर कधी उचलतही नाही. सरकारने आमच्याकडे लक्ष्य द्यायला पाहिजे.

इम्तियाजसारखे शेकडो ड्रायव्हर रात्रंदिवस हजारो किलोमीटर गाड्या चालवून मुंबईकरांना जेवण मिळेल यासाठी अन्नधान्याची वाहतूक करत आहेत. मात्र, त्यांनाच धान्य मार्केटमध्ये कोणतीही सोयी सुविधा मिळत नसल्यानं या चालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. आता 2 दिवस बाजार बंद असल्याने गेली 7 ते 10 दिवसांपासून हजारो टन धान्य गाड्यावर पडून असल्याचं दिसत आहे. एपीएमसी परिसरात आणि ट्रक टर्मिनलमध्ये 1 हजारपेक्षा अधिक गाड्या उभ्या आहेत. यामध्ये तांदूळ, गहू, डाळी, मसाले इत्यादी पदार्थांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 11,506 वर, आज एकाच दिवसात तब्बल 1008 रुग्णांची वाढ

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांना प्रवासाची परवानगी कशी मिळणार? गृहमंत्र्यांकडून नियमावली जाहीर

हैदराबादेतून 450 किमी चालत वर्ध्यात पोहोचला, गोंदियाला जाताना थकला, वाटेतच गळफास

Truck drivers suffering for food and Water in APMC

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.