AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना दिलासा, 5 टक्के सवलत जाहीर

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरता खुल्या आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 5 टक्के सवलत देण्याचा निर्णय झाल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिलीय. उमेद संस्थेबद्दल देखील सामंत यांनी भाष्य केले.

अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना दिलासा, 5 टक्के सवलत जाहीर
| Updated on: Oct 11, 2020 | 9:15 PM
Share

रत्नागिरी:अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरता खुल्या आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 5 टक्के सवलत देण्याचा निर्णय झाल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिलीय. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उमेद संस्थेबद्दल ही सामंत यांनी भाष्य केले. (Uday Samant declared govt take decision for five percentage relief for engineering students)

बारावीला पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा जीवशास्त्र) या फॉर्म्युल्यानुसार खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांकरता 50 टक्के आणि मागासवर्गातील विद्यार्थ्यांकरता 45 टक्क्यांची अट होती. पण, आता घेण्यात आलेल्या निर्णयामुळे खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 45 टक्के आणि मागासवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 40 टक्के करण्यात आल्याचं सामंत यांनी सांगितले. शिवाय, याचा फायदा जे विद्यार्थ्यी राज्याबाहेर जात होते, अशा जवळपास 1 लाख विद्यार्थ्यांना होणार आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली

आरे कारशेड कांजूर येथे करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. त्यानंतर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या टीकेला देखील दय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. निवडणुकीच्या अगोदरच कारशेडबाबत लोकांना शब्द दिलेला होता. मुख्यमंत्र्यांनी लोकांना हवा असलेला निर्णय घेतला आहे. काही लोकांना चांगल्या निर्णयावर देखील टीका करावी वाटते, असा टोला उदय सामंत यांनी दरेकरांना लगावला.

उमेद या संस्थेबाबत अनेक गैरसमज होते. या संस्थेचं खासगीकरण केले जाणार असून कर्मचाऱ्यांना देखील कमी केले जाणार असल्याचं बोललं जात होतं. पण, त्यामध्ये काहीही तथ्य नसून उमेद बंद होणार नाही. केवळ कर्मचाऱ्यांच पगार हे दुसऱ्या संस्थेमार्फत काढले जातील. शिवाय, त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं कंत्रात नव्यानं केलेले नाही, अशांची यादी तयार केली असून त्यांचे पगार आणि कंत्राट देखील पुन्हा केले जाईल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

संबंधित बातम्या:

कोरोनाची परिस्थिती निवळल्याशिवाय कॉलेज सुरु होणार नाहीत : उदय सामंत

राज ठाकरेंनी फोन केल्याने ग्रंथालय सुरु करण्याचा निर्णय घेतलेला नाही, उदय सामंतांचा टोला

(Uday Samant declared govt take decision for five percentage relief for engineering students)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.