AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

42 दिवसात 20 हजार शिक्षकांची भरती, विनोद तावडे यांची घोषणा

लातूर: आजपासून अर्थात 21 जानेवारीपासून 42 दिवसात म्हणजेच 5 मार्चपर्यंत एक दोन नव्हे तर तब्बल 20 हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्वत: याबाबतची माहिती दिली. लवकरच लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे आचारसंहिताही लागू होईल. मात्र आचारसंहितेपूर्वीच अर्थात 5 मार्चपर्यंत 20 हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहेत.  इतकंच […]

42 दिवसात 20 हजार शिक्षकांची भरती, विनोद तावडे यांची घोषणा
| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM
Share

लातूर: आजपासून अर्थात 21 जानेवारीपासून 42 दिवसात म्हणजेच 5 मार्चपर्यंत एक दोन नव्हे तर तब्बल 20 हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्वत: याबाबतची माहिती दिली. लवकरच लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे आचारसंहिताही लागू होईल. मात्र आचारसंहितेपूर्वीच अर्थात 5 मार्चपर्यंत 20 हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहेत.  इतकंच नाही तर येत्या 6 महिन्यात 24 हजार शिक्षकांची भरती करण्यात येईल, असं तावडे यांनी सांगितलं. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर इथं आयोजित शिक्षण परिषदेनंतर ते माध्यमांशी बोलत होते.

शिक्षकांची भरती करण्यासाठी जसे पात्र उमेदवार आतूर आहेत, अगदी तसंच सरकारही तयार आहे. मात्र काही संस्थाचालक न्यायालयात गेल्याने, या भरतीची प्रक्रिया थांबवावी लागली. आता मराठा आरक्षण आणि दहा टक्के आर्थिक मागास आरक्षण अशी सर्व प्रक्रिया पूर्ण करून, निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकार शिक्षकांची मोठी भरती करणार आहे, असं विनोद तावडे यांनी सांगितलं.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, 24 हजार शिक्षक भरती पुढच्या महिन्यानंतर होईल आणि त्यातही मराठ्यांना आरक्षण मिळेल. म्हणजेच 24 हजार शिक्षक भरतींमध्ये जवळपास 3 हजार 840 जागा या मराठ्यांसाठी राखीव असतील.

मराठा आरक्षण

लवकरच शिक्षक भरती होणार आहे, त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळणार का, असा प्रश्न भाजप आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी, मराठा समाजाला शिक्षक भरतीत  16 टक्के म्हणजेच 3 हजार 840 जागा राखीव असतील असं सांगितलं होतं.

संबंधित बातम्या 

शिक्षक भरतीचा मुहूर्त ठरला, जानेवारीपासून भरती सुरु    

आता मराठा तरुणांचीच मेगाभरतीविरोधात याचिका!  

शिक्षकांच्या 24 हजार जागांमध्ये मराठ्यांसाठी 16 टक्के जागा राखीव  

विनोद तावडेंकडून शिक्षकांसाठी गुड न्यूज 

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.